शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅफिक वाढतेय !

By admin | Updated: May 11, 2015 02:15 IST

नागपुरातील सिव्हिल लाईन्समधील चार-पाच रस्ते सोडल्यास इतर सर्वच रस्त्यांवर नेहमीच दिसणारी ...

नागपूर : नागपुरातील सिव्हिल लाईन्समधील चार-पाच रस्ते सोडल्यास इतर सर्वच रस्त्यांवर नेहमीच दिसणारी वाहतुकीची कोंडी, सतत बाहेर पडणारा कार्बन डायआॅक्साईड, कानठळ्या बसवणारे कर्णकर्कश्श हॉर्न, वाढते अपघात असे प्रश्न असले तरी दिवसेंदिवस नव्या वाहनांची संख्या वाढत आहे. सार्वजनिक वाहनांची तोकडी सोय आणि खासगी वाहनांच्या संख्येत दरवर्षी पडणारी भर हेच या मागचे मुख्य कारण आहे. खासगी वाहनांच्या तुलनेत सार्वजनिक वाहनांची संख्या केवळ १० टक्केही नाही. शहरात २०१४ पर्यंत १२ लाख ७२ हजार ७० विविध वाहनांची नोंद झाली आहे. सामाजिक कार्यकर्ता अभय कोलारकर यांना मिळालेल्या माहितीच्या अधिकारात ही माहिती समोर आली आहे. शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे आपल्याकडे पायी चालणारे, हातठेले, बैलगाडीसारख्या हळू चालणाऱ्या वाहनांपासून ते जलद धावणाऱ्या मोटार सायकल, जीप, मोटारी व ट्रक ट्रॅक्टरसारखी अवजड वाहने एकाच रस्त्याचा वापर करतात. यामुळे वाहतूक व्यवस्था प्रभावी होते. त्यातच वाहने थांबविण्याच्या व उभ्या करण्याच्या जागा मर्यादित असल्याने व रस्त्यावरील अतिक्र मणांमुळे ही परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. रस्त्यावर दुचाकीचे साम्राज्यइतर खासगी वाहनांच्या तुलनेत रस्त्यावर दुचाकीचे साम्राज्य असल्याचे दिसून येते. २०१३ मध्ये १० लाख ३२ हजार ६०७ झाली तर २०१४ मध्ये ही संख्या १० लाख ६४ हजार ५७४ वर गेली आहे. दुचाकीच्या पाठोपाठ चारचाकीमध्ये मोटार कार्सची संख्या मोठी आहे. २०१४ मध्ये १ लाख ८ हजार १९५वर गेली आहे. (प्रतिनिधी)खासगी वाहनांची वाढती संख्या, वाहतूक कोंडीचे कारणनागपूरची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीही वाढतेय, अशी ओरड केली जाते. मात्र गेल्या १० वर्षात नागपूरची लोकसंख्या सुमारे ३५ टक्क्यांनीच वाढली. याच्या तुलनेत खासगी वाहनांत ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. खासगी वाहनांची वाढती संख्या हेच वाहतूक कोंडीचे खरे कारण ठरत आहे. २०१२ मध्ये खासगी वाहनांची संख्या ११ लाख ५७ हजार ३४ होती, मागील वर्षांपर्यंत ही संख्या पावणेतेरा लाखांपर्यंत पोहचली आहे. वाहतूक कोंडी वा प्रदूषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी खासगी वाहनांच्या संख्येवर नियंत्रण ठेवून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करणे गरजेचे असल्याचे जनआक्रोश या सामाजिक संस्थेचे सचिव रवी कासखेडीकर यांचे म्हणणे आहे. खासगी वाहनांची संख्या ५५ पटींनी अधिक शहरातील कोणत्याही मुख्य चौकात गर्दीच्या तासांमध्ये तासभरही उभे राहणे कठीण झाले आहे. यावेळी रस्त्यांवर सार्वजनिक वाहतुकीच्या तुलनेत (स्टार बसेस) खासगी वाहनांची संख्या ५५ पटींनी अधिक असल्याचे दिसून येते. यात सर्वात जास्त दुचाकी, कार, आॅटोरिक्षा, कमी वजनांची मालवाहू वाहने, बस, ट्रक आदी वाहने असतात.