शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

वाघ वाढतायेत, जंगल कुठे आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 22:54 IST

वाघांची वाढती संख्या लक्षात घेता व वन्यजीव लोकवस्तीकडे न जाता केवळ जंगलात राहावे, तसेच मनुष्य-वन्यजीव संघर्ष टाळता यावा यासाठी त्यांना अतिरिक्त जंगल उपलब्ध करून देण्याबाबत वनविभागाने सहा आठवड्यात आराखडा सादर करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.

ठळक मुद्देअतिरिक्त जंगल विकासाचा आराखडा सादर करा : हायकोर्टाचे वन विभागाला आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाघांची वाढती संख्या लक्षात घेता व वन्यजीव लोकवस्तीकडे न जाता केवळ जंगलात राहावे, तसेच मनुष्य-वन्यजीव संघर्ष टाळता यावा यासाठी त्यांना अतिरिक्त जंगल उपलब्ध करून देण्याबाबत वनविभागाने सहा आठवड्यात आराखडा सादर करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्रातील गावांमध्ये टी-१ वाघिणीने मागील वर्षभरापासून धुमाकूळ घातला आहे. तसेच १० नागरिकांचे प्राण घेतले, असे वन विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांनी वाघिणीला ठार मारण्याची विनंती केली आहे. वन विभागाने गोळा केलेल्या नमुन्यांवरून वाघिण नरभक्षक असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट झाले. या वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी वनविभागाच्या पथकाने तीन महिन्यांपासून जंगल पालथे घातले. मात्र, तिला पकडण्यात वन विभागाला अपयश आले होते. यामुळे प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी २९ जानेवारीला तिला दिसताक्षणीच गोळ्या घालून ठार मारण्याचे आदेश दिले. या आदेशाला वन्यजीवप्रेमी सरिता सुब्रमण्यम यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर वाघिणीला ठार मारण्याऐवजी बेशुद्ध करण्याचे आदेश दिले होते.याप्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्याने न्यायालयाला सांगितले की, टिपेश्वर व ताडोबा वनक्षेत्रात वाघांची संख्या वाढली आहे. या वनक्षेत्रातील अनेक वाघांचे पांढरकवडा वनक्षेत्रात स्थलांतर झाले आहेत. मात्र, याठिकाणी गवती जंगलाचे प्रमाण कमी असल्याने हरीण व इतर प्राण्यांची संख्या नगण्य आहे. यामुळे वाघाने अन्नाच्या शोधात गावाकडे आपला मोर्चा वळविला असून मनुष्य-वन्यजीव संघर्षात वाढ झाली आहे. राज्य सरकारने वन विकास महामंडळाला (एफडीसीएम) ३१ हजार हेक्टर आरक्षित जंगल विकासासाठी दिले आहे. या जंगलाचा काही भाग पांढरकवडा वनक्षेत्राला लागून आहे. तो भाग शासनाने परत घेऊन त्या ठिकाणी वाघांना अन्नासाठी अनुकूल राहील अशा अतिरिक्त जंगलाचा विकास करावा. जेणेकरून वन्यजीव लोकवस्तीकडे न जाता केवळ जंगलात राहतील व मनुष्य-वन्यजीव संघर्ष टाळता येईल, ही बाब याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. याची दखल घेत न्यायालयाने वन्यजीवांसाठी अतिरिक्त जंगल उपलब्ध करून देण्यासंर्भातील विकास आराखडा सादर करण्याचे वन विभागाला आदेश दिले. याप्रकरणी याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. रवींद्र खापरे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयTigerवाघ