शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
3
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
4
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
5
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
6
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
7
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
8
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
9
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
10
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
11
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
12
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
13
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
14
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
15
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
16
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
17
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
18
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
19
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
20
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?

वाघ वाढतायेत, जंगल कुठे आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 22:54 IST

वाघांची वाढती संख्या लक्षात घेता व वन्यजीव लोकवस्तीकडे न जाता केवळ जंगलात राहावे, तसेच मनुष्य-वन्यजीव संघर्ष टाळता यावा यासाठी त्यांना अतिरिक्त जंगल उपलब्ध करून देण्याबाबत वनविभागाने सहा आठवड्यात आराखडा सादर करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.

ठळक मुद्देअतिरिक्त जंगल विकासाचा आराखडा सादर करा : हायकोर्टाचे वन विभागाला आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाघांची वाढती संख्या लक्षात घेता व वन्यजीव लोकवस्तीकडे न जाता केवळ जंगलात राहावे, तसेच मनुष्य-वन्यजीव संघर्ष टाळता यावा यासाठी त्यांना अतिरिक्त जंगल उपलब्ध करून देण्याबाबत वनविभागाने सहा आठवड्यात आराखडा सादर करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्रातील गावांमध्ये टी-१ वाघिणीने मागील वर्षभरापासून धुमाकूळ घातला आहे. तसेच १० नागरिकांचे प्राण घेतले, असे वन विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांनी वाघिणीला ठार मारण्याची विनंती केली आहे. वन विभागाने गोळा केलेल्या नमुन्यांवरून वाघिण नरभक्षक असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट झाले. या वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी वनविभागाच्या पथकाने तीन महिन्यांपासून जंगल पालथे घातले. मात्र, तिला पकडण्यात वन विभागाला अपयश आले होते. यामुळे प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी २९ जानेवारीला तिला दिसताक्षणीच गोळ्या घालून ठार मारण्याचे आदेश दिले. या आदेशाला वन्यजीवप्रेमी सरिता सुब्रमण्यम यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर वाघिणीला ठार मारण्याऐवजी बेशुद्ध करण्याचे आदेश दिले होते.याप्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्याने न्यायालयाला सांगितले की, टिपेश्वर व ताडोबा वनक्षेत्रात वाघांची संख्या वाढली आहे. या वनक्षेत्रातील अनेक वाघांचे पांढरकवडा वनक्षेत्रात स्थलांतर झाले आहेत. मात्र, याठिकाणी गवती जंगलाचे प्रमाण कमी असल्याने हरीण व इतर प्राण्यांची संख्या नगण्य आहे. यामुळे वाघाने अन्नाच्या शोधात गावाकडे आपला मोर्चा वळविला असून मनुष्य-वन्यजीव संघर्षात वाढ झाली आहे. राज्य सरकारने वन विकास महामंडळाला (एफडीसीएम) ३१ हजार हेक्टर आरक्षित जंगल विकासासाठी दिले आहे. या जंगलाचा काही भाग पांढरकवडा वनक्षेत्राला लागून आहे. तो भाग शासनाने परत घेऊन त्या ठिकाणी वाघांना अन्नासाठी अनुकूल राहील अशा अतिरिक्त जंगलाचा विकास करावा. जेणेकरून वन्यजीव लोकवस्तीकडे न जाता केवळ जंगलात राहतील व मनुष्य-वन्यजीव संघर्ष टाळता येईल, ही बाब याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. याची दखल घेत न्यायालयाने वन्यजीवांसाठी अतिरिक्त जंगल उपलब्ध करून देण्यासंर्भातील विकास आराखडा सादर करण्याचे वन विभागाला आदेश दिले. याप्रकरणी याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. रवींद्र खापरे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयTigerवाघ