शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

दहीहंडीत सुरक्षेवर देणार जास्त भर; थरावर थर पण नियमांचे पालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 06:00 IST

विदर्भात अन्य शहरांच्या तुलनेत नागपुरात लहान-मोठी ३० पेक्षा जास्त मंडळे आहेत. या सर्व मंडळातर्फे दहीहंडी उत्साहात साजरा करण्यात येते. दहीहंडी फोडण्यापेक्षा थरावर थर लावण्याची मोठी स्पर्धा असते. पथक या उंचीवर न पोहोचल्यास थर कमी करण्यात येतो.

ठळक मुद्देतीन वर्षांत पाच गोविंदा झाले जायबंदी; गोपिकांची पथके, हजारोंची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कृष्ण जन्माष्टमीचा आनंद दहीहंडीतून अधिक द्विगुणित करण्यात येत असला तरी, थरावर थर चढवून विक्रम करण्याच्या नादात अनेक गोविंदा उंचावरून पडून जखमी झाले आहेत. सुरक्षेचे अनेक नियम असूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष झाल्याने गेल्या तीन वर्षांत नागपुरात पाच गोविंदा जायबंदी झाले आहेत. सुदैवाने गेल्या काही वर्षांत जीवितहानी झालेली नाही. दहीहंडी करा परंतु दुर्घटना टाळण्यासाठी नियम पाळा, असे सांगण्याची वेळ आली आहे.दहीहंडी फोडण्याचा वेगळा उत्साह तरुणाईत जास्त दिसून येतो. विदर्भात अन्य शहरांच्या तुलनेत नागपुरात लहान-मोठी ३० पेक्षा जास्त मंडळे आहेत. या सर्व मंडळातर्फे दहीहंडी उत्साहात साजरा करण्यात येते. दहीहंडी फोडण्यापेक्षा थरावर थर लावण्याची मोठी स्पर्धा असते. पथक या उंचीवर न पोहोचल्यास थर कमी करण्यात येतो. प्रारंभी सर्वात उंच थरासाठी लाखो रुपयांचे बक्षीस होते. थर जसजसे कमी होतात, तशीतशी बक्षिसांची रक्कमही कमी होते. या उत्सवामुळे स्थानिक युवक सक्रिय होतात. वरच्या थरावरून गोविंदा पथकातून कुणी खाली पडला तर सुरक्षेच्या सर्व सुविधा उपलब्ध असतात. त्यामुळे गोविंदाला इजा होत नाही. प्रसंगी उपचारासाठी डॉक्टर्स आणि अ‍ॅम्ब्युलन्स असते. इतवारीतील गोपिकांच्या दहीहंडीसाठी थर कमी असतो. सुरक्षा व्यवस्था तगडी असते. गोपिकांच्या पथकांना उपस्थितांकडून प्रोत्साहन दिले जाते. नागपुरात दहीहंडी उत्सवाची जवळपास ५० वर्षांची परंपरा आहे. काही मंडळांनी सुरक्षेच्या कारणांनी दहीहंडी बंद केली असली तरीही, अनेक मंडळातील तरुणांनी यंदा दहीहंडी उत्साहात साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सुरक्षेबाबत दक्षता घेतली जाणार आहे.

नागपूरची परंपरा उत्सवाची राहिली आहे. येथे सर्व धर्माचे लोक मिळून उत्सव साजरे करतात. ही परंपरा कायम राहावी. स्वत:ची आणि इतरांची सुरक्षा सांभाळून दहीहंडीचा उत्सव साजरा करा. धोका पत्करू नका आणि कुणालाही धोका निर्माण होईल, असे वागू नका. अफवांवर विश्वास ठेवू नका.- डॉ. भूषणकुमार उपाध्यक्ष, पोलीस आयुक्त, नागपूर शहर.

नागपुरात सहा वर्षांपासून गोपिकांच्या दहीहंडी उत्सवाने वेगळी परंपरा सुरू केली आहे. अर्थात, हा साहसी क्रीडा प्रकार असून त्यामुळे सुरक्षिततेचे सर्व नियम पाळतो. उंचीबाबत हायकोर्टाचे नियम पाळण्यात येतात. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील गोविंदाची पथके सहभागी होतात. या उत्सवात दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक सहभागी होतात. गेल्या ३८ वर्षांपासून कोणतीही दुर्घटना घडलेली नाही.

- संजय खुळे, अध्यक्ष, इतवारी नवयुवक मंडळ.

दहीहंडी उत्सवात मध्य प्रदेश व छत्तीसगडचे गोविंदा पथकपूर्व, मध्य आणि दक्षिण नागपुरात दहीहंडीचा उत्सवाचा जोर दिसून येतो. संपूर्ण नागपुरात ३० पेक्षा जास्त मंडळ असले तरीही इतवारी, हिवरीनगर, संगम टॉकीज, नंदनवन, अयोध्यानगर, सहकारनगर या भागातील जुन्या मंडळाच्या उत्सवाचे स्वरूप व्यापक आहे. या ठिंकाणी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी होते. एक-दोन वर्षांपासून या उत्सवाला कॉर्पोरेट स्वरूप आले आहे. त्यामुळे स्पर्धा वाढते. यावर्षी नंदनवन भागातही उत्सवाचे स्वरूप मोठे राहणार आहे. इतवारीतील एकमेव गोपिकांच्या दहीहंडी उत्सवात जवळपास पाचे पथके असतात. याशिवाय मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील आणि तालुक्यातील युवकांची पथके येतात. पाच ते सात थराच्या पलीकडे ते जात नाहीत.

अशी आहे नियमावली१८ वर्षांखालील गोविंदाचा सहभाग नसावा.२० फुटापेक्षा अधिक उंच दहीहंडी नसावी.सुरक्षिततेची उपकरणे अत्यावश्यक.मानवी मनोऱ्यावर पाण्याचा मारा करू नये.कच्च्या, जुन्या इमारतीला दहीहंडी बांधू नये.कायदा सुव्यवस्थेची खबरदारी घ्यावी.दहीहंडीच्या ठिकाणी कर्कश डीजेचा वापर शक्यतो टाळावा.आपात्कालीन व्यवस्था असावी.

टॅग्स :Dahi Handiदहीहंडी