शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

जिल्हा न्यायालयात सुरक्षा सुविधा वाढवा

By admin | Updated: February 12, 2016 03:31 IST

जिल्हा न्यायालय इमारतीत सुरक्षा सुविधा वाढविण्याचे निर्देश उच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई आणि न्या. प्रदीप देशमुख यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले.

हायकोर्ट : राज्य सरकारला निर्देशनागपूर : जिल्हा न्यायालय इमारतीत सुरक्षा सुविधा वाढविण्याचे निर्देश उच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई आणि न्या. प्रदीप देशमुख यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले. न्यायमंदिर इमारतीमध्ये सुविधांचा अभाव असून त्या उपलब्ध करण्याची मागणी करणारी जनहित याचिका जिल्हा वकील संघटनेचे (डीबीए) माजी सचिव अ‍ॅड. मनोज साबळे यांनी दाखल केली होती. ही याचिका गुरुवारी सुनावणीस आली असता न्यायालयाने राज्य सरकारला दोन आठवड्यात शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले. याचिकेनुसार न्यायमंदिर इमारत १९७६ साली बांधण्यात आली होती. त्यावेळी केवळ ६०० वकील न्यायालयात वकिली करायचे. आता ही संख्या सहा हजाराच्या वर गेली आहे. प्रलंबित प्रकरणांची आणि न्यायाधीशांची संख्याही वाढली आहे. उपलब्ध सुविधा अपुऱ्या पडत आहेत. सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी मेटल डिटेक्टर, सीसीटीव्ही कॅमेरे, बॅग स्कॅनर आदी अत्याधुनिक उपकरणे बसविण्याची आवश्यकता आहे. सध्या केवळ मेटल डिटेक्टर असून एवढी सुविधा पुरेशी नाही, असे याचिकेत नमूद आहे. नागपूर जिल्ह्यातील जिल्हा व तालुकास्तरातील न्यायालय इमारतींच्या विकासाकरिता धोरण निश्चित करण्यासाठी न्यायाधीश आणि वकिलांची समिती स्थापन करण्यात यावी, उच्च न्यायालय वकील संघटना, जिल्हा वकील संघटना आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील न्यायालय इमारतींचे निरीक्षण करावे, आवश्यक सुविधांचा अहवाल सादर करावा, जिल्हा न्यायालयाच्या पूरक इमारतीच्या बांधकामाच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्यात यावा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांसोबत चर्चा करून सुयोग इमारत परिसरातील मोकळ्या जागेवर न्यायालय व वकिलांसाठी अतिरिक्त बांधकाम करण्यात यावे, सध्या अस्तित्वात असलेले नॅशनल फायर कॉलेज काटोल रोडवरील इमारतीमध्ये स्थानांतरित करून ही जागा न्यायालयासाठी दिली जाऊ शकते, अशी विनंतीही याचिकाकर्त्याने केली. या याचिकेवर यापूर्वी उच्च न्यायालयाने केंद्रीय नगरविकास सचिव, गृह विभागाचे सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, गृह सचिव, हायकोर्ट बार असोसिएशन आणि जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षांना नोटीस बजावली होती. न्यायालयात याचिकाकर्त्याच्या वतीने अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर, सरकारच्या वतीने मुख्य सरकारी वकील भारती डांगरे आणि केंद्र सरकारच्या वतीने अ‍ॅड. मुग्धा चांदूरकर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)