शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 01:44 IST

केंद्र आणि राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. असे असताना शेतकरी आत्महत्येचे प्रमाण मात्र थांबविण्यात शासनाला यश येऊ शकले नाही. होय, हे खरे आहे. शेतकरी आत्महत्यासंदर्भातील प्रश्न खा. कृपाल तुमाने यांनी लोकसभेत उपस्थित केला होता. त्याचे उत्तर आता मिळालेले असून त्यात २०१३ पासून शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाल्याचे केंद्र शासनाने मान्य केले आहे.

ठळक मुद्देकेंद्र शासनाची कबुली : कृपाल तुमाने यांनी विचारला होता प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र आणि राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. असे असताना शेतकरी आत्महत्येचे प्रमाण मात्र थांबविण्यात शासनाला यश येऊ शकले नाही. होय, हे खरे आहे. शेतकरी आत्महत्यासंदर्भातील प्रश्न खा. कृपाल तुमाने यांनी लोकसभेत उपस्थित केला होता. त्याचे उत्तर आता मिळालेले असून त्यात २०१३ पासून शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाल्याचे केंद्र शासनाने मान्य केले आहे.राज्यात गेल्या काही दिवसात शेतकरी आत्महत्या वाढलेल्या असून त्या चिंताजनक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात. राज्यात २०१३, २०१४ आणि २०१५ मध्ये किती शेतकरी आत्महत्या झाल्या या अनुषंगाने खा. तुमाने यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी केंद्रीय कृषिमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी याबाबतची लेखी माहिती उपलब्ध करून देण्याची सूचना केली होती. त्यानुसार तुमाने यांना लेखी स्वरुपात माहिती देण्यात आली. त्या उत्तरानुसार, महाराष्ट्रात २०१३ मध्ये ३१४६, २०१४ मध्ये ४००४ तर २०१५ मध्ये ४२०१ अशा एकूण ११ हजार ३५१ शेतकरी आत्महत्या तीन वर्षात झाल्याचे केंद्र शासनाने कळविले. यावरून २०१३ पासून शेतकरी आत्महत्यांमध्ये राज्यात वाढ होत असल्याचे स्पष्ट होते.शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत तुमाने यांनी माहिती विचारली होती. त्यावर उत्तर देताना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राज्य आणि जिल्हा स्तरावर समित्या गठित करण्यात आल्या आहेत. या समित्या शेतकरी आत्महत्या करण्याच्या समस्यांवर समीक्षा करून उपाययोजना करीत असल्याचे सांगण्यात आलेले आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याKrupal Tumaneकृपाल तुमाने