शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

राज्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 01:44 IST

केंद्र आणि राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. असे असताना शेतकरी आत्महत्येचे प्रमाण मात्र थांबविण्यात शासनाला यश येऊ शकले नाही. होय, हे खरे आहे. शेतकरी आत्महत्यासंदर्भातील प्रश्न खा. कृपाल तुमाने यांनी लोकसभेत उपस्थित केला होता. त्याचे उत्तर आता मिळालेले असून त्यात २०१३ पासून शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाल्याचे केंद्र शासनाने मान्य केले आहे.

ठळक मुद्देकेंद्र शासनाची कबुली : कृपाल तुमाने यांनी विचारला होता प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र आणि राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. असे असताना शेतकरी आत्महत्येचे प्रमाण मात्र थांबविण्यात शासनाला यश येऊ शकले नाही. होय, हे खरे आहे. शेतकरी आत्महत्यासंदर्भातील प्रश्न खा. कृपाल तुमाने यांनी लोकसभेत उपस्थित केला होता. त्याचे उत्तर आता मिळालेले असून त्यात २०१३ पासून शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाल्याचे केंद्र शासनाने मान्य केले आहे.राज्यात गेल्या काही दिवसात शेतकरी आत्महत्या वाढलेल्या असून त्या चिंताजनक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात. राज्यात २०१३, २०१४ आणि २०१५ मध्ये किती शेतकरी आत्महत्या झाल्या या अनुषंगाने खा. तुमाने यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी केंद्रीय कृषिमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी याबाबतची लेखी माहिती उपलब्ध करून देण्याची सूचना केली होती. त्यानुसार तुमाने यांना लेखी स्वरुपात माहिती देण्यात आली. त्या उत्तरानुसार, महाराष्ट्रात २०१३ मध्ये ३१४६, २०१४ मध्ये ४००४ तर २०१५ मध्ये ४२०१ अशा एकूण ११ हजार ३५१ शेतकरी आत्महत्या तीन वर्षात झाल्याचे केंद्र शासनाने कळविले. यावरून २०१३ पासून शेतकरी आत्महत्यांमध्ये राज्यात वाढ होत असल्याचे स्पष्ट होते.शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत तुमाने यांनी माहिती विचारली होती. त्यावर उत्तर देताना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राज्य आणि जिल्हा स्तरावर समित्या गठित करण्यात आल्या आहेत. या समित्या शेतकरी आत्महत्या करण्याच्या समस्यांवर समीक्षा करून उपाययोजना करीत असल्याचे सांगण्यात आलेले आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याKrupal Tumaneकृपाल तुमाने