शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

राज्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 01:44 IST

केंद्र आणि राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. असे असताना शेतकरी आत्महत्येचे प्रमाण मात्र थांबविण्यात शासनाला यश येऊ शकले नाही. होय, हे खरे आहे. शेतकरी आत्महत्यासंदर्भातील प्रश्न खा. कृपाल तुमाने यांनी लोकसभेत उपस्थित केला होता. त्याचे उत्तर आता मिळालेले असून त्यात २०१३ पासून शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाल्याचे केंद्र शासनाने मान्य केले आहे.

ठळक मुद्देकेंद्र शासनाची कबुली : कृपाल तुमाने यांनी विचारला होता प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र आणि राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. असे असताना शेतकरी आत्महत्येचे प्रमाण मात्र थांबविण्यात शासनाला यश येऊ शकले नाही. होय, हे खरे आहे. शेतकरी आत्महत्यासंदर्भातील प्रश्न खा. कृपाल तुमाने यांनी लोकसभेत उपस्थित केला होता. त्याचे उत्तर आता मिळालेले असून त्यात २०१३ पासून शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाल्याचे केंद्र शासनाने मान्य केले आहे.राज्यात गेल्या काही दिवसात शेतकरी आत्महत्या वाढलेल्या असून त्या चिंताजनक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात. राज्यात २०१३, २०१४ आणि २०१५ मध्ये किती शेतकरी आत्महत्या झाल्या या अनुषंगाने खा. तुमाने यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी केंद्रीय कृषिमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी याबाबतची लेखी माहिती उपलब्ध करून देण्याची सूचना केली होती. त्यानुसार तुमाने यांना लेखी स्वरुपात माहिती देण्यात आली. त्या उत्तरानुसार, महाराष्ट्रात २०१३ मध्ये ३१४६, २०१४ मध्ये ४००४ तर २०१५ मध्ये ४२०१ अशा एकूण ११ हजार ३५१ शेतकरी आत्महत्या तीन वर्षात झाल्याचे केंद्र शासनाने कळविले. यावरून २०१३ पासून शेतकरी आत्महत्यांमध्ये राज्यात वाढ होत असल्याचे स्पष्ट होते.शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत तुमाने यांनी माहिती विचारली होती. त्यावर उत्तर देताना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राज्य आणि जिल्हा स्तरावर समित्या गठित करण्यात आल्या आहेत. या समित्या शेतकरी आत्महत्या करण्याच्या समस्यांवर समीक्षा करून उपाययोजना करीत असल्याचे सांगण्यात आलेले आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याKrupal Tumaneकृपाल तुमाने