शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

कळमना भाजी बाजारात खरेदी-विक्री वेळ वाढवावी; अडतियांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 22:09 IST

कळमना भाजी बाजारात व्यवसायाची वेळ वाढवून सकाळी १० पर्यंत करावी. त्यामुळे शेतकऱ्यांना भाव आणि किरकोळ विके्रत्यांना भाज्या खरेदीसाठी पुरेसा वेळ मिळेल तसेच ग्राहकांना ठराविक बाजारातून किफायत भावात भाज्यांची खरेदी करता येईल, अशी स्पष्टोक्ती अडतियांनी समितीकडे पाठविलेल्या पत्रात दिली आहे.

ठळक मुद्देविक्रेत्यांना भाज्या विक्रीला वेळ मिळावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेक दिवसानंतर शनिवारपासून सुरू करण्यात आलेल्या कळमना भाजी बाजारात व्यवसायाची वेळ वाढवून सकाळी १० पर्यंत करावी. त्यामुळे शेतकऱ्यांना भाव आणि किरकोळ विके्रत्यांना भाज्या खरेदीसाठी पुरेसा वेळ मिळेल तसेच ग्राहकांना ठराविक बाजारातून किफायत भावात भाज्यांची खरेदी करता येईल, अशी स्पष्टोक्ती अडतियांनी समितीकडे पाठविलेल्या पत्रात दिली आहे.अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर गौर म्हणाले, बाजारात २०५ अडतिया असून दररोज ५० च्या बॅचला व्यवसाय करायचा आहे. व्यवसायाची वेळ रात्री १ ते सकाळी ७ पर्यंत ठेवली आहे. त्यानंतर व्यवसाय करणाऱ्यांना दंड भरावा लागणार आहे. तसेच प्रत्येक अडतियाला दोन गाड्या भाज्या विकण्याची परवानगी आहे. शनिवारी पहिल्या दिवशी सकाळी ६.३० पासूनच समितीच्या कर्मचाºयांनी बाजार बंद करायला सुरुवात केली आणि सकाळी ७ वाजता बाजार बंद केला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना भाज्या विक्रीविना परत जावे लागले. हीच स्थिती रविवारी होती. भाज्या विक्रीसाठी एक तर कमी वेळ मिळाला शिवाय दुचाकीला प्रतिबंध आणि ठराविक संख्येत तीनचाकीला परवानगी असल्याने फार कमी विक्रेते ग्राहक बाजारात आले. त्यामुळे बाजाराची वेळ पहाटे ४ ते सकाळी १० पर्यंत केल्यास किरकोळ विक्रेत्यांना खरेदीला वेळ मिळेल आणि शेतकऱ्यांच्या भाज्यांची विक्री होईल, असे गौर म्हणाले.गर्दी होऊ नये म्हणून समितीने बाजाराला मुख्य भाजी बाजार, १ ते ६ इमारतीतील १४४ गाळे, आणि न्यू गे्रन मार्केट अशा तीन भागात विभागले आहे. हे अंतर कळमन्याच्या चिखली बाजारापासून अर्धा ते पाऊण किमी आहे. त्यामुळे ग्राहक न्यू ग्रेन मार्केटमधील भाजी बाजारात जात नाहीत. शनिवारी आणि रविवारी ग्राहक या बाजाराकडे फिरकले नाहीत. अखेर शेतकऱ्यांना भाज्या परत न्याव्या लागल्या. भाज्या कुठे विकायच्या, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. अखेर गेटबाहेर बसून त्यांना विक्री करावी लागली. तेथूनही कर्मचारी आणि पोलिसांना त्यांना हाकलून लावले. समितीने वेळ निश्चित करताना अडतिया आणि व्यापाऱ्यांना विश्वासात घ्यायला हवे होते. वेळ वाढल्यास भाज्यांच्या खरेदी-विक्रीची सुविधा होईल, असे गौर म्हणाले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस