शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
3
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
4
"पुरस्कार घेण्यास परदेशात गेलीस तर…’’, नोबेल विजेत्या महिलेला सरकारने दिली धमकी  
5
क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! २४ तासांत १७ लाख कोटींची फोडणी, क्रिप्टो मार्केट आपटलं; Bitcoin ७% पेक्षा अधिक घसरलं
6
धक्कादायक खुलासा! डॉक्टर शाहीन निघाली दहशतवादी फंडिंगची मास्टरमाईंड; बिटकॉइन आणि हवालातून कोट्यवधींचा व्यवहार
7
ST महामंडळाचा आर्थिक शिस्तीवर भर; नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर, पारदर्शकतेसाठी विशेष नोंदवही
8
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
9
आमदार-खासदारांशी कसं वागावे? शासनानं काढलं परिपत्रक; कर्मचाऱ्यांना दिला ९ कलमी कार्यक्रम
10
IND vs SA 2nd Test Pitch Report: गुवाहाटीत ‘मुंबई पॅटर्न’? पिच ‘कोणाला’ देणार साथ?
11
Health Crisis: कितीही अँटिबायोटिक खाल्ले तरीही होईना काही परिणाम; जीवाणूंची शक्ती वाढली, आरोग्य धोक्यात!
12
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
13
एक-एक घुसखोराला हाकलून लावू..; गृहमंत्री अमित शांहाचा हल्लाबोल
14
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
15
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
16
JCB वर बसून काढत होते पदयात्रा, अचानक घडलं असं काही, रस्त्यावर धपकन पडले भाजपाचे नेते 
17
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
18
Sangli: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नवा अध्याय; 'तारा'चा मुक्त संचार सुरू, रेडिओ कॉलरद्वारे ठेवणार लक्ष
19
BMC Election: शरद पवार गट मुंबईत कोणाशी करणार युती, उद्धवसेना की काँग्रेस?
20
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
Daily Top 2Weekly Top 5

कळमना भाजी बाजारात खरेदी-विक्री वेळ वाढवावी; अडतियांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 22:09 IST

कळमना भाजी बाजारात व्यवसायाची वेळ वाढवून सकाळी १० पर्यंत करावी. त्यामुळे शेतकऱ्यांना भाव आणि किरकोळ विके्रत्यांना भाज्या खरेदीसाठी पुरेसा वेळ मिळेल तसेच ग्राहकांना ठराविक बाजारातून किफायत भावात भाज्यांची खरेदी करता येईल, अशी स्पष्टोक्ती अडतियांनी समितीकडे पाठविलेल्या पत्रात दिली आहे.

ठळक मुद्देविक्रेत्यांना भाज्या विक्रीला वेळ मिळावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेक दिवसानंतर शनिवारपासून सुरू करण्यात आलेल्या कळमना भाजी बाजारात व्यवसायाची वेळ वाढवून सकाळी १० पर्यंत करावी. त्यामुळे शेतकऱ्यांना भाव आणि किरकोळ विके्रत्यांना भाज्या खरेदीसाठी पुरेसा वेळ मिळेल तसेच ग्राहकांना ठराविक बाजारातून किफायत भावात भाज्यांची खरेदी करता येईल, अशी स्पष्टोक्ती अडतियांनी समितीकडे पाठविलेल्या पत्रात दिली आहे.अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर गौर म्हणाले, बाजारात २०५ अडतिया असून दररोज ५० च्या बॅचला व्यवसाय करायचा आहे. व्यवसायाची वेळ रात्री १ ते सकाळी ७ पर्यंत ठेवली आहे. त्यानंतर व्यवसाय करणाऱ्यांना दंड भरावा लागणार आहे. तसेच प्रत्येक अडतियाला दोन गाड्या भाज्या विकण्याची परवानगी आहे. शनिवारी पहिल्या दिवशी सकाळी ६.३० पासूनच समितीच्या कर्मचाºयांनी बाजार बंद करायला सुरुवात केली आणि सकाळी ७ वाजता बाजार बंद केला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना भाज्या विक्रीविना परत जावे लागले. हीच स्थिती रविवारी होती. भाज्या विक्रीसाठी एक तर कमी वेळ मिळाला शिवाय दुचाकीला प्रतिबंध आणि ठराविक संख्येत तीनचाकीला परवानगी असल्याने फार कमी विक्रेते ग्राहक बाजारात आले. त्यामुळे बाजाराची वेळ पहाटे ४ ते सकाळी १० पर्यंत केल्यास किरकोळ विक्रेत्यांना खरेदीला वेळ मिळेल आणि शेतकऱ्यांच्या भाज्यांची विक्री होईल, असे गौर म्हणाले.गर्दी होऊ नये म्हणून समितीने बाजाराला मुख्य भाजी बाजार, १ ते ६ इमारतीतील १४४ गाळे, आणि न्यू गे्रन मार्केट अशा तीन भागात विभागले आहे. हे अंतर कळमन्याच्या चिखली बाजारापासून अर्धा ते पाऊण किमी आहे. त्यामुळे ग्राहक न्यू ग्रेन मार्केटमधील भाजी बाजारात जात नाहीत. शनिवारी आणि रविवारी ग्राहक या बाजाराकडे फिरकले नाहीत. अखेर शेतकऱ्यांना भाज्या परत न्याव्या लागल्या. भाज्या कुठे विकायच्या, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. अखेर गेटबाहेर बसून त्यांना विक्री करावी लागली. तेथूनही कर्मचारी आणि पोलिसांना त्यांना हाकलून लावले. समितीने वेळ निश्चित करताना अडतिया आणि व्यापाऱ्यांना विश्वासात घ्यायला हवे होते. वेळ वाढल्यास भाज्यांच्या खरेदी-विक्रीची सुविधा होईल, असे गौर म्हणाले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस