शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर व चंद्रपूर येथील कोळसा व्यावसायिकांवर आयकर धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 21:26 IST

पाच वर्षांपासून कोळसा खाणीतून बेकायदेशीररीत्या कोळशाचे उत्खनन करून कंपन्यांना बाजारभावाने विक्री करून कोट्यवधींचा आयकर बुडविणारे तीन कोळसा व्यावसायिक आणि एका वाहतूकदारांची जवळपास १५ प्रतिष्ठाने आणि निवासस्थानावर आयकर विभागाने गुरुवारी सकाळी एकाचवेळी धाडी टाकल्या. धाडीत अधिकाऱ्यांनी कोट्यवधींच्या व्यवहाराची कागदपत्रे, रोख तसेच पासपोर्ट आणि विविध बँकांमधील लॉकर्सची कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. धाडीमुळे कोळसा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे करचुकवेगिरी : कोट्यवधींच्या व्यवहाराची कागदपत्रे जप्त, कारवाई उद्याही सुरू राहणार

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर/चंद्रपूर : पाच वर्षांपासून कोळसा खाणीतून बेकायदेशीररीत्या कोळशाचे उत्खनन करून कंपन्यांना बाजारभावाने विक्री करून कोट्यवधींचा आयकर बुडविणारे तीन कोळसा व्यावसायिक आणि एका वाहतूकदारांची जवळपास १५ प्रतिष्ठाने आणि निवासस्थानावर आयकर विभागाने गुरुवारी सकाळी एकाचवेळी धाडी टाकल्या. धाडीत अधिकाऱ्यांनी कोट्यवधींच्या व्यवहाराची कागदपत्रे, रोख तसेच पासपोर्ट आणि विविध बँकांमधील लॉकर्सची कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. धाडीमुळे कोळसा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.नितीन उपरे, संजय अग्रवाल, रणजित छाबडा व मित्तल हे चंद्रपूर येथील स्वामी फ्युएल कंपनीचे संचालक तर संजय अग्रवाल हे सूर्या ट्रान्सपोर्टचे संचालक आहेत. कंपनीचे मुख्य कार्यालय चंद्रपूर येथे असून सर्व संचालकांचे निवासस्थान नागपुरात आहेत. कंपनीचे चंद्रपूर, वणी, घुग्घुस व उमरेड येथेही कार्यालय आहेत. अधिकाऱ्यांनी नितीन उपरे यांच्या नागपुरातील रामदासपेठ तर संजय अग्रवाल यांच्या छाप्रूनगर, वर्धमाननगर, सूर्यनगर आणि कोराडी येथील कार्यालय व निवासस्थानावर धाडी टाकल्याचे सूत्रांनी सांगितले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भद्रावती येथील कर्नाटक-एम्टा कोळसा खाण कर्नाटक पॉवर प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आली होती. पुढे प्रकल्प बंद झाला. त्यामुळे सन २०१२ मध्ये खाणीतून कोळशाचे उत्खननही बंद झाले. पण वेकोलिच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने या खाणीतून गेल्या पाच वर्षांपासून कोळशाचे अवैध उत्खनन सुरू आहे. महिन्याला एक लाख टन कोळशाचे उत्खनन करण्यात येते. ८०० रुपये टन किमतीच्या कोळशाची कंपन्यांना ६ हजार रुपये टन भावाने विक्री करण्यात येत होती. २०० रुपये वाहतूक खर्च वगळता व्यावसायिक एका टनामागे ५ हजार रुपये नफा कमवित होते. या व्यवहारात चारही व्यावसायिकांनी करचुकवेगिरी करीत काही वर्षांतच कोट्यवधींचे उत्पन्न मिळविले आहे. याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आयकर विभागाच्या जवळपास १०० पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गुरुवारी एकत्रितरीत्या धाडी टाकल्या. इतक्या मोठ्या प्रमाणावर धाडी घालण्याची ही पहिलीच वेळ आहे. कारवाईबाबत अधिकाऱ्यांनी कमालीची गोपनीयता बाळगली आहे. कारवाई आणखी दोन दिवस सुरू राहील, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सraidधाड