शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

नागपूर व चंद्रपूर येथील कोळसा व्यावसायिकांवर आयकर धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 21:26 IST

पाच वर्षांपासून कोळसा खाणीतून बेकायदेशीररीत्या कोळशाचे उत्खनन करून कंपन्यांना बाजारभावाने विक्री करून कोट्यवधींचा आयकर बुडविणारे तीन कोळसा व्यावसायिक आणि एका वाहतूकदारांची जवळपास १५ प्रतिष्ठाने आणि निवासस्थानावर आयकर विभागाने गुरुवारी सकाळी एकाचवेळी धाडी टाकल्या. धाडीत अधिकाऱ्यांनी कोट्यवधींच्या व्यवहाराची कागदपत्रे, रोख तसेच पासपोर्ट आणि विविध बँकांमधील लॉकर्सची कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. धाडीमुळे कोळसा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे करचुकवेगिरी : कोट्यवधींच्या व्यवहाराची कागदपत्रे जप्त, कारवाई उद्याही सुरू राहणार

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर/चंद्रपूर : पाच वर्षांपासून कोळसा खाणीतून बेकायदेशीररीत्या कोळशाचे उत्खनन करून कंपन्यांना बाजारभावाने विक्री करून कोट्यवधींचा आयकर बुडविणारे तीन कोळसा व्यावसायिक आणि एका वाहतूकदारांची जवळपास १५ प्रतिष्ठाने आणि निवासस्थानावर आयकर विभागाने गुरुवारी सकाळी एकाचवेळी धाडी टाकल्या. धाडीत अधिकाऱ्यांनी कोट्यवधींच्या व्यवहाराची कागदपत्रे, रोख तसेच पासपोर्ट आणि विविध बँकांमधील लॉकर्सची कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. धाडीमुळे कोळसा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.नितीन उपरे, संजय अग्रवाल, रणजित छाबडा व मित्तल हे चंद्रपूर येथील स्वामी फ्युएल कंपनीचे संचालक तर संजय अग्रवाल हे सूर्या ट्रान्सपोर्टचे संचालक आहेत. कंपनीचे मुख्य कार्यालय चंद्रपूर येथे असून सर्व संचालकांचे निवासस्थान नागपुरात आहेत. कंपनीचे चंद्रपूर, वणी, घुग्घुस व उमरेड येथेही कार्यालय आहेत. अधिकाऱ्यांनी नितीन उपरे यांच्या नागपुरातील रामदासपेठ तर संजय अग्रवाल यांच्या छाप्रूनगर, वर्धमाननगर, सूर्यनगर आणि कोराडी येथील कार्यालय व निवासस्थानावर धाडी टाकल्याचे सूत्रांनी सांगितले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भद्रावती येथील कर्नाटक-एम्टा कोळसा खाण कर्नाटक पॉवर प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आली होती. पुढे प्रकल्प बंद झाला. त्यामुळे सन २०१२ मध्ये खाणीतून कोळशाचे उत्खननही बंद झाले. पण वेकोलिच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने या खाणीतून गेल्या पाच वर्षांपासून कोळशाचे अवैध उत्खनन सुरू आहे. महिन्याला एक लाख टन कोळशाचे उत्खनन करण्यात येते. ८०० रुपये टन किमतीच्या कोळशाची कंपन्यांना ६ हजार रुपये टन भावाने विक्री करण्यात येत होती. २०० रुपये वाहतूक खर्च वगळता व्यावसायिक एका टनामागे ५ हजार रुपये नफा कमवित होते. या व्यवहारात चारही व्यावसायिकांनी करचुकवेगिरी करीत काही वर्षांतच कोट्यवधींचे उत्पन्न मिळविले आहे. याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आयकर विभागाच्या जवळपास १०० पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गुरुवारी एकत्रितरीत्या धाडी टाकल्या. इतक्या मोठ्या प्रमाणावर धाडी घालण्याची ही पहिलीच वेळ आहे. कारवाईबाबत अधिकाऱ्यांनी कमालीची गोपनीयता बाळगली आहे. कारवाई आणखी दोन दिवस सुरू राहील, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सraidधाड