शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

१०० ग्रामसभांनी मिळविले ११.६५ कोटींचे उत्पन्न

By admin | Updated: June 9, 2017 02:40 IST

वनहक्क कायदा २००६ व पेसा या कायद्यामुळे वनांवर उपजीविका करणाऱ्यांना भरपूर लाभ मिळाला आहे.

तेंदू संकलनात ग्रामसभेची यशस्वी वाटचाल : २० हजारावर आदिवासी कुटुंबीयांना लाभलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वनहक्क कायदा २००६ व पेसा या कायद्यामुळे वनांवर उपजीविका करणाऱ्यांना भरपूर लाभ मिळाला आहे. या कायद्यामुळे सामूहिक वनहक्कांतर्गत गौणवनोपजाचे स्वामित्व स्थानिक ग्रामसभांना प्राप्त झाले आहे. ग्रामसभेला मिळालेल्या हक्कामुळे गोंदिया, गडचिरोलीसह नागपूर, अमरावती व यवतमाळ येथील १०० ग्रामसभेने तेंदू संकलन व व्यवस्थापनाची यशस्वी प्रक्रिया राबविली आहे. यावर्षी या १०० ग्रामसभांनी ११.६५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. देशात ग्रामसभेच्या माध्यमातून तेंदू व्यवस्थापनाचा यशस्वी उपक्रम या पाच जिल्ह्यात सुरू आहे. ग्रामसभेच्या माध्यमातून तेंदूपत्ता संकलनाची प्रक्रिया २०१३ पासून सुरू गोंदिया, गडचिरोली, अमरावती व यवतमाळ येथे १६ गावात राबविण्यात आली होती. आज १०० गावांच्यावर ग्रामसभा या प्रक्रियेत जुळल्या आहे. २०१३ - २०१४ व २०१४-१५ मध्ये ग्रामसभेद्वारे करण्यात आलेल्या तेंदूपत्त्याच्या संकलनात कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे दोन वर्ष ग्रामसभेचे मोठे नुकसान झाले. गेल्यावर्षी एका व्यापाऱ्याने ग्रामसभेने केलेले तेंदूचे संकलन हस्तांतरित करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे यावर्षी पाचही जिल्ह्यातील ग्रामसभेने या व्यापाऱ्याला संकलित केलेला तेंदूपत्ता हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. ग्रामसभेने व्यापाऱ्याशी स्पर्धात्मक दर निश्चित करून व्यवहार केला. ग्रामसभेने घेतलेल्या या पुढाकारामुळे २० हजार आदिवासी कुटुंबीयांना त्याचा लाभ झाला. तेंदूपत्त्याचे संकलन करणाऱ्या कुटुंबीयांना निधीचे वाटपही करण्यात आले आहे. ग्रामसभेच्या माध्यमातून तेंदू संकलनामुळे वनांचेही संवर्धन झाले आहे. वनांमध्ये आगी लागल्या नाहीत. बुटा कटाई झाली नाही. एकप्रकारे पर्यावरण व जैवविविधतेचे संरक्षण झाल्याचे या पाचही जिल्ह्यातील ग्रामसभेच्या अध्यक्ष व सचिवांनी पत्रकार परिषदेत सांगितले.