शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

१०० ग्रामसभांनी मिळविले ११.६५ कोटींचे उत्पन्न

By admin | Updated: June 9, 2017 02:40 IST

वनहक्क कायदा २००६ व पेसा या कायद्यामुळे वनांवर उपजीविका करणाऱ्यांना भरपूर लाभ मिळाला आहे.

तेंदू संकलनात ग्रामसभेची यशस्वी वाटचाल : २० हजारावर आदिवासी कुटुंबीयांना लाभलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वनहक्क कायदा २००६ व पेसा या कायद्यामुळे वनांवर उपजीविका करणाऱ्यांना भरपूर लाभ मिळाला आहे. या कायद्यामुळे सामूहिक वनहक्कांतर्गत गौणवनोपजाचे स्वामित्व स्थानिक ग्रामसभांना प्राप्त झाले आहे. ग्रामसभेला मिळालेल्या हक्कामुळे गोंदिया, गडचिरोलीसह नागपूर, अमरावती व यवतमाळ येथील १०० ग्रामसभेने तेंदू संकलन व व्यवस्थापनाची यशस्वी प्रक्रिया राबविली आहे. यावर्षी या १०० ग्रामसभांनी ११.६५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. देशात ग्रामसभेच्या माध्यमातून तेंदू व्यवस्थापनाचा यशस्वी उपक्रम या पाच जिल्ह्यात सुरू आहे. ग्रामसभेच्या माध्यमातून तेंदूपत्ता संकलनाची प्रक्रिया २०१३ पासून सुरू गोंदिया, गडचिरोली, अमरावती व यवतमाळ येथे १६ गावात राबविण्यात आली होती. आज १०० गावांच्यावर ग्रामसभा या प्रक्रियेत जुळल्या आहे. २०१३ - २०१४ व २०१४-१५ मध्ये ग्रामसभेद्वारे करण्यात आलेल्या तेंदूपत्त्याच्या संकलनात कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे दोन वर्ष ग्रामसभेचे मोठे नुकसान झाले. गेल्यावर्षी एका व्यापाऱ्याने ग्रामसभेने केलेले तेंदूचे संकलन हस्तांतरित करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे यावर्षी पाचही जिल्ह्यातील ग्रामसभेने या व्यापाऱ्याला संकलित केलेला तेंदूपत्ता हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. ग्रामसभेने व्यापाऱ्याशी स्पर्धात्मक दर निश्चित करून व्यवहार केला. ग्रामसभेने घेतलेल्या या पुढाकारामुळे २० हजार आदिवासी कुटुंबीयांना त्याचा लाभ झाला. तेंदूपत्त्याचे संकलन करणाऱ्या कुटुंबीयांना निधीचे वाटपही करण्यात आले आहे. ग्रामसभेच्या माध्यमातून तेंदू संकलनामुळे वनांचेही संवर्धन झाले आहे. वनांमध्ये आगी लागल्या नाहीत. बुटा कटाई झाली नाही. एकप्रकारे पर्यावरण व जैवविविधतेचे संरक्षण झाल्याचे या पाचही जिल्ह्यातील ग्रामसभेच्या अध्यक्ष व सचिवांनी पत्रकार परिषदेत सांगितले.