शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

'या' पाच जिल्ह्यात वाढणार अति तापमान, पडणार अति पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2022 08:00 IST

Nagpur News मध्य महाराष्ट्रातील यवतमाळ, अमरावती, धुळे, अहमदनगर, जालना यांच्यासह मध्य प्रदेशातील बालाघाट आणि मंडला हे जिल्हे हवामान बदलाच्या परिणामाने संवेदनशील झाले आहेत.

ठळक मुद्देअमरावती, यवतमाळ, नगर, धुळे, जालना संवेदनशीलजर्मन संस्थेचा अभ्यास

 

निशांत वानखेडे

नागपूर : मध्य महाराष्ट्रातील यवतमाळ, अमरावती, धुळे, अहमदनगर, जालना यांच्यासह मध्य प्रदेशातील बालाघाट आणि मंडला हे जिल्हे हवामान बदलाच्या परिणामाने संवेदनशील झाले आहेत. या सात जिल्ह्यांना २०५० ते २०८०पर्यंत अत्याधिक तापमान आणि अत्याधिक पावसाचा सामना करावा लागेल.

जर्मन फेडरल मिनिस्ट्री फॉर एकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट, बोन, जर्मनीच्या वतीने येथील पोट्सडेम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट चेंज इम्पॅक्ट रिसर्चने ‘नासा’च्या उपग्रहीय साधनांच्या आधारे संवेदनशील मानल्या जाणाऱ्या मध्य भारतातील या सात जिल्ह्यांचा अभ्यास केला आहे. सरासरी पाऊस, पावसाचे चक्र, अति पावसाची वारंवारता, सरासरी तापमान, अत्यंत उष्ण दिवस आणि काेरडे दिवस या सात निकषांवर अभ्यास करून २०३०, २०५० आणि २०८० साली या जिल्ह्यांची स्थिती काय असेल, याचा अंदाज लावण्यात आला आहे. यासाठी हवामानाच्या ८ ते ९ माॅडेल्सचा अभ्यास करण्यात आला आहे. ग्रीन प्लॅनेट साेसायटीचे प्रा. सुरेश चाेपणे यांनी याबाबत माहिती दिली.

 

सात जिल्ह्यांत पावसाची स्थिती

- सरासरी पावसात २०३० ते २०५०पर्यंत १५ ते २० टक्के आणि २०५० ते २०८०पर्यंत २३ ते ३७ टक्के वाढ हाेईल.

- पावसाची तीव्रता २०५०पर्यंत ७ ते ११ मि. मी. आणि २०८०पर्यंत ८ ते १३ मि. मी.पर्यंत वाढेल.

- अति पावसाचे दिवस २०५०पर्यंत २५ ते ३० दिवस आणि २०८०पर्यंत ५५ ते ६५ दिवस वाढतील.

- अत्याधिक पावसाची वारंवारता १ दिवस आणि ३ दिवसांपर्यंत वाढेल.

- अत्याधिक पावसाची तीव्रता २०५०पर्यंत १५, १८ ते २० टक्के आणि २०८०पर्यंत १८ ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढेल.

तापमानाची स्थिती काय राहील?

- २०३० ते २०५०पर्यंत १.५ अंश आणि २०५० ते २०८०पर्यंत २.७ अंशापर्यंत वाढलेले असेल.

- अति तापमानाचे २०५०पर्यंत २५ ते ३० आणि २०८०पर्यंत ५५ ते ६५ दिवस वाढतील.

- अत्याधिक काेरडे दिवस २०३० ते २०५०पर्यंत २ ते ३ आणि २०५० ते २०८०पर्यंत ४ ते ६ दिवस वाढतील.

- अमरावती आणि यवतमाळमध्ये ही तीव्रता अधिक राहण्याचा अंदाज

अभ्यासाची आकडेवारी धक्कादायक आहे. प्रत्यक्ष त्याकाळात याची जाणीव तीव्र आणि असहनीय ठरेल. संस्थेने संबंधित जिल्ह्यांचा अभ्यास केला असला, तरी विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांत ही स्थिती निर्माण हाेईल. त्यामुळे हरित वायू आणि एकूणच प्रदूषणावर नियंत्रण आणणे ही काळाची गरज आहे.

- प्रा. सुरेश चाेपणे, हवामान अभ्यासक

टॅग्स :Rainपाऊस