शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

'या' पाच जिल्ह्यात वाढणार अति तापमान, पडणार अति पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2022 08:00 IST

Nagpur News मध्य महाराष्ट्रातील यवतमाळ, अमरावती, धुळे, अहमदनगर, जालना यांच्यासह मध्य प्रदेशातील बालाघाट आणि मंडला हे जिल्हे हवामान बदलाच्या परिणामाने संवेदनशील झाले आहेत.

ठळक मुद्देअमरावती, यवतमाळ, नगर, धुळे, जालना संवेदनशीलजर्मन संस्थेचा अभ्यास

 

निशांत वानखेडे

नागपूर : मध्य महाराष्ट्रातील यवतमाळ, अमरावती, धुळे, अहमदनगर, जालना यांच्यासह मध्य प्रदेशातील बालाघाट आणि मंडला हे जिल्हे हवामान बदलाच्या परिणामाने संवेदनशील झाले आहेत. या सात जिल्ह्यांना २०५० ते २०८०पर्यंत अत्याधिक तापमान आणि अत्याधिक पावसाचा सामना करावा लागेल.

जर्मन फेडरल मिनिस्ट्री फॉर एकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट, बोन, जर्मनीच्या वतीने येथील पोट्सडेम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट चेंज इम्पॅक्ट रिसर्चने ‘नासा’च्या उपग्रहीय साधनांच्या आधारे संवेदनशील मानल्या जाणाऱ्या मध्य भारतातील या सात जिल्ह्यांचा अभ्यास केला आहे. सरासरी पाऊस, पावसाचे चक्र, अति पावसाची वारंवारता, सरासरी तापमान, अत्यंत उष्ण दिवस आणि काेरडे दिवस या सात निकषांवर अभ्यास करून २०३०, २०५० आणि २०८० साली या जिल्ह्यांची स्थिती काय असेल, याचा अंदाज लावण्यात आला आहे. यासाठी हवामानाच्या ८ ते ९ माॅडेल्सचा अभ्यास करण्यात आला आहे. ग्रीन प्लॅनेट साेसायटीचे प्रा. सुरेश चाेपणे यांनी याबाबत माहिती दिली.

 

सात जिल्ह्यांत पावसाची स्थिती

- सरासरी पावसात २०३० ते २०५०पर्यंत १५ ते २० टक्के आणि २०५० ते २०८०पर्यंत २३ ते ३७ टक्के वाढ हाेईल.

- पावसाची तीव्रता २०५०पर्यंत ७ ते ११ मि. मी. आणि २०८०पर्यंत ८ ते १३ मि. मी.पर्यंत वाढेल.

- अति पावसाचे दिवस २०५०पर्यंत २५ ते ३० दिवस आणि २०८०पर्यंत ५५ ते ६५ दिवस वाढतील.

- अत्याधिक पावसाची वारंवारता १ दिवस आणि ३ दिवसांपर्यंत वाढेल.

- अत्याधिक पावसाची तीव्रता २०५०पर्यंत १५, १८ ते २० टक्के आणि २०८०पर्यंत १८ ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढेल.

तापमानाची स्थिती काय राहील?

- २०३० ते २०५०पर्यंत १.५ अंश आणि २०५० ते २०८०पर्यंत २.७ अंशापर्यंत वाढलेले असेल.

- अति तापमानाचे २०५०पर्यंत २५ ते ३० आणि २०८०पर्यंत ५५ ते ६५ दिवस वाढतील.

- अत्याधिक काेरडे दिवस २०३० ते २०५०पर्यंत २ ते ३ आणि २०५० ते २०८०पर्यंत ४ ते ६ दिवस वाढतील.

- अमरावती आणि यवतमाळमध्ये ही तीव्रता अधिक राहण्याचा अंदाज

अभ्यासाची आकडेवारी धक्कादायक आहे. प्रत्यक्ष त्याकाळात याची जाणीव तीव्र आणि असहनीय ठरेल. संस्थेने संबंधित जिल्ह्यांचा अभ्यास केला असला, तरी विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांत ही स्थिती निर्माण हाेईल. त्यामुळे हरित वायू आणि एकूणच प्रदूषणावर नियंत्रण आणणे ही काळाची गरज आहे.

- प्रा. सुरेश चाेपणे, हवामान अभ्यासक

टॅग्स :Rainपाऊस