शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

'या' पाच जिल्ह्यात वाढणार अति तापमान, पडणार अति पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2022 08:00 IST

Nagpur News मध्य महाराष्ट्रातील यवतमाळ, अमरावती, धुळे, अहमदनगर, जालना यांच्यासह मध्य प्रदेशातील बालाघाट आणि मंडला हे जिल्हे हवामान बदलाच्या परिणामाने संवेदनशील झाले आहेत.

ठळक मुद्देअमरावती, यवतमाळ, नगर, धुळे, जालना संवेदनशीलजर्मन संस्थेचा अभ्यास

 

निशांत वानखेडे

नागपूर : मध्य महाराष्ट्रातील यवतमाळ, अमरावती, धुळे, अहमदनगर, जालना यांच्यासह मध्य प्रदेशातील बालाघाट आणि मंडला हे जिल्हे हवामान बदलाच्या परिणामाने संवेदनशील झाले आहेत. या सात जिल्ह्यांना २०५० ते २०८०पर्यंत अत्याधिक तापमान आणि अत्याधिक पावसाचा सामना करावा लागेल.

जर्मन फेडरल मिनिस्ट्री फॉर एकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट, बोन, जर्मनीच्या वतीने येथील पोट्सडेम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट चेंज इम्पॅक्ट रिसर्चने ‘नासा’च्या उपग्रहीय साधनांच्या आधारे संवेदनशील मानल्या जाणाऱ्या मध्य भारतातील या सात जिल्ह्यांचा अभ्यास केला आहे. सरासरी पाऊस, पावसाचे चक्र, अति पावसाची वारंवारता, सरासरी तापमान, अत्यंत उष्ण दिवस आणि काेरडे दिवस या सात निकषांवर अभ्यास करून २०३०, २०५० आणि २०८० साली या जिल्ह्यांची स्थिती काय असेल, याचा अंदाज लावण्यात आला आहे. यासाठी हवामानाच्या ८ ते ९ माॅडेल्सचा अभ्यास करण्यात आला आहे. ग्रीन प्लॅनेट साेसायटीचे प्रा. सुरेश चाेपणे यांनी याबाबत माहिती दिली.

 

सात जिल्ह्यांत पावसाची स्थिती

- सरासरी पावसात २०३० ते २०५०पर्यंत १५ ते २० टक्के आणि २०५० ते २०८०पर्यंत २३ ते ३७ टक्के वाढ हाेईल.

- पावसाची तीव्रता २०५०पर्यंत ७ ते ११ मि. मी. आणि २०८०पर्यंत ८ ते १३ मि. मी.पर्यंत वाढेल.

- अति पावसाचे दिवस २०५०पर्यंत २५ ते ३० दिवस आणि २०८०पर्यंत ५५ ते ६५ दिवस वाढतील.

- अत्याधिक पावसाची वारंवारता १ दिवस आणि ३ दिवसांपर्यंत वाढेल.

- अत्याधिक पावसाची तीव्रता २०५०पर्यंत १५, १८ ते २० टक्के आणि २०८०पर्यंत १८ ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढेल.

तापमानाची स्थिती काय राहील?

- २०३० ते २०५०पर्यंत १.५ अंश आणि २०५० ते २०८०पर्यंत २.७ अंशापर्यंत वाढलेले असेल.

- अति तापमानाचे २०५०पर्यंत २५ ते ३० आणि २०८०पर्यंत ५५ ते ६५ दिवस वाढतील.

- अत्याधिक काेरडे दिवस २०३० ते २०५०पर्यंत २ ते ३ आणि २०५० ते २०८०पर्यंत ४ ते ६ दिवस वाढतील.

- अमरावती आणि यवतमाळमध्ये ही तीव्रता अधिक राहण्याचा अंदाज

अभ्यासाची आकडेवारी धक्कादायक आहे. प्रत्यक्ष त्याकाळात याची जाणीव तीव्र आणि असहनीय ठरेल. संस्थेने संबंधित जिल्ह्यांचा अभ्यास केला असला, तरी विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांत ही स्थिती निर्माण हाेईल. त्यामुळे हरित वायू आणि एकूणच प्रदूषणावर नियंत्रण आणणे ही काळाची गरज आहे.

- प्रा. सुरेश चाेपणे, हवामान अभ्यासक

टॅग्स :Rainपाऊस