शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'या' पाच जिल्ह्यात वाढणार अति तापमान, पडणार अति पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2022 08:00 IST

Nagpur News मध्य महाराष्ट्रातील यवतमाळ, अमरावती, धुळे, अहमदनगर, जालना यांच्यासह मध्य प्रदेशातील बालाघाट आणि मंडला हे जिल्हे हवामान बदलाच्या परिणामाने संवेदनशील झाले आहेत.

ठळक मुद्देअमरावती, यवतमाळ, नगर, धुळे, जालना संवेदनशीलजर्मन संस्थेचा अभ्यास

 

निशांत वानखेडे

नागपूर : मध्य महाराष्ट्रातील यवतमाळ, अमरावती, धुळे, अहमदनगर, जालना यांच्यासह मध्य प्रदेशातील बालाघाट आणि मंडला हे जिल्हे हवामान बदलाच्या परिणामाने संवेदनशील झाले आहेत. या सात जिल्ह्यांना २०५० ते २०८०पर्यंत अत्याधिक तापमान आणि अत्याधिक पावसाचा सामना करावा लागेल.

जर्मन फेडरल मिनिस्ट्री फॉर एकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट, बोन, जर्मनीच्या वतीने येथील पोट्सडेम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट चेंज इम्पॅक्ट रिसर्चने ‘नासा’च्या उपग्रहीय साधनांच्या आधारे संवेदनशील मानल्या जाणाऱ्या मध्य भारतातील या सात जिल्ह्यांचा अभ्यास केला आहे. सरासरी पाऊस, पावसाचे चक्र, अति पावसाची वारंवारता, सरासरी तापमान, अत्यंत उष्ण दिवस आणि काेरडे दिवस या सात निकषांवर अभ्यास करून २०३०, २०५० आणि २०८० साली या जिल्ह्यांची स्थिती काय असेल, याचा अंदाज लावण्यात आला आहे. यासाठी हवामानाच्या ८ ते ९ माॅडेल्सचा अभ्यास करण्यात आला आहे. ग्रीन प्लॅनेट साेसायटीचे प्रा. सुरेश चाेपणे यांनी याबाबत माहिती दिली.

 

सात जिल्ह्यांत पावसाची स्थिती

- सरासरी पावसात २०३० ते २०५०पर्यंत १५ ते २० टक्के आणि २०५० ते २०८०पर्यंत २३ ते ३७ टक्के वाढ हाेईल.

- पावसाची तीव्रता २०५०पर्यंत ७ ते ११ मि. मी. आणि २०८०पर्यंत ८ ते १३ मि. मी.पर्यंत वाढेल.

- अति पावसाचे दिवस २०५०पर्यंत २५ ते ३० दिवस आणि २०८०पर्यंत ५५ ते ६५ दिवस वाढतील.

- अत्याधिक पावसाची वारंवारता १ दिवस आणि ३ दिवसांपर्यंत वाढेल.

- अत्याधिक पावसाची तीव्रता २०५०पर्यंत १५, १८ ते २० टक्के आणि २०८०पर्यंत १८ ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढेल.

तापमानाची स्थिती काय राहील?

- २०३० ते २०५०पर्यंत १.५ अंश आणि २०५० ते २०८०पर्यंत २.७ अंशापर्यंत वाढलेले असेल.

- अति तापमानाचे २०५०पर्यंत २५ ते ३० आणि २०८०पर्यंत ५५ ते ६५ दिवस वाढतील.

- अत्याधिक काेरडे दिवस २०३० ते २०५०पर्यंत २ ते ३ आणि २०५० ते २०८०पर्यंत ४ ते ६ दिवस वाढतील.

- अमरावती आणि यवतमाळमध्ये ही तीव्रता अधिक राहण्याचा अंदाज

अभ्यासाची आकडेवारी धक्कादायक आहे. प्रत्यक्ष त्याकाळात याची जाणीव तीव्र आणि असहनीय ठरेल. संस्थेने संबंधित जिल्ह्यांचा अभ्यास केला असला, तरी विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांत ही स्थिती निर्माण हाेईल. त्यामुळे हरित वायू आणि एकूणच प्रदूषणावर नियंत्रण आणणे ही काळाची गरज आहे.

- प्रा. सुरेश चाेपणे, हवामान अभ्यासक

टॅग्स :Rainपाऊस