शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

 नागपुरातील चार तलावातील पाण्याची गुणवत्ता सुधारली; गणपती विसर्जनास प्रतिबंध घालण्याचे परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 22:45 IST

Nagpur News गेल्या दोन वर्षांपासून शहरातील तलावांवर गणपती विसर्जनास प्रतिबंध घातल्यामुळे तलावातील पाण्याच्या गुणवत्तेत सुधार झाला आहे. नागपुरातील ग्रीन विजिल फाउंडेशन या संस्थेने शहरातील ४ तलावांतील पाण्याचे परीक्षण केले.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गेल्या दोन वर्षांपासून शहरातील तलावांवर गणपती विसर्जनास प्रतिबंध घातल्यामुळे तलावातील पाण्याच्या गुणवत्तेत सुधार झाला आहे. नागपुरातील ग्रीन विजिल फाउंडेशन या संस्थेने शहरातील ४ तलावांतील पाण्याचे परीक्षण केले. त्यांच्या निरीक्षणात पाण्याच्या गुणवत्तेत सुधार झाल्याचे निदर्शनास आले आहे. (mproved water quality in four lakes; Consequences of preventing Ganpati immersion)

तलावातील पाण्याची गुणवत्ता ही पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण, गढूळपणा व पाण्यातील क्षाराचे प्रमाण या आधारावर नोंदली जाते. ही संस्था गेल्या ९ वर्षांपासून पाण्याची गुणवत्ता परीक्षणाचे काम करते. गणपती विसर्जनापूर्वी, विसर्जनानंतर व फेब्रुवारी महिन्यात अशा तीन वेळा परीक्षण केले जाते. संस्थेद्वारे हा डाटा अर्थइको इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय संस्थेला पाठविला जातो. ‘अर्थइको’ ही संस्था दरवर्षी देशातील नदी व तलावांच्या गुणवत्तेचा डाटा प्रकाशित करते. ग्रीन विजिलचे मेहुल कोसुरकर, शीतल चौधरी, सुरभी जैस्वाल यांनी हे परीक्षण केले.

- सक्करदरा तलावाची स्थिती वाईट

या परीक्षणात सक्करदरा तलावाची स्थिती अतिशय खराब आढळली. तलावात पाणी खूप कमी आहे. चारही बाजूने जलकुंभी, गवत पसरले आहे. तलावातील पाण्यात ऑक्सिजनची मात्र ३ मि.ग्रा.प्रति लीटर आढळली आहे. गढूळपणा ५५ जेटीयू नोंदविण्यात आला आहे. क्षारचे प्रमाण ७.८ पीएच आढळले आहे.

- गेल्या काही वर्षात गणपती विसर्जनापूर्वी घेतलेल्या निरीक्षणात यावर्षी फुटाळा, गांधीसागर, सोनेगाव तलावात सुधार दिसून आला आहे. तलावातील ऑक्सिजनची मात्रा वाढविण्यासाठी कृत्रिम ऑक्सिजन पुरवठा होणे आवश्यक आहे. त्यासाठी तलावात फाऊंटेन लावणे गरजेचे आहे. शिवाय गणपती विसर्जन जसे बॅन केले. तसेच इतरही ज्या सणांमध्ये विसर्जन करण्यात येते. तेसुद्धा थांबविणे गरजेचे आहे.

सुरभी जैस्वाल, टीम लीडर, ग्रीन विजिल फाउंडेशन

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण