शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

आडनावावरून जाती आणि ओबीसी लोकसंख्येचा अंदाज घेणे अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2022 20:05 IST

Nagpur News राज्य सरकारद्वारे ओबीसी आरक्षणावरील स्थगिती हटविण्याकरिता इम्पेरिकल डेटा गोळा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, आडनावावरून जाती आणि ओबीसी लोकसंख्येचा अंदाज घेणे अशक्य आहे.

ठळक मुद्दे इतर धर्मातील ओबीसींचा कसा शोध लावणार?

नागपूर : राज्य सरकारद्वारे ओबीसी आरक्षणावरील स्थगिती हटविण्याकरिता इम्पेरिकल डेटा गोळा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पहिले राज्य मागासवर्गीय आयोग त्यानंतर बांठीया समितीद्वारे हा प्रयत्न केला जात आहे. या प्रक्रियेकरिता सरकारद्वारे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीची तपासणी केली जात आहे. त्याकरिता मतदार यादीतील आडनावाचा वापर करण्यात येणार आहे. मात्र, आडनावावरून जाती आणि ओबीसी लोकसंख्येचा अंदाज घेणे अशक्य आहे. तसेच मुस्लीम, शीख आणि ख्रिश्चन व बौद्ध धर्मातील ओबीसींचा कसा शोध लावणार, असा प्रश्न कायम आहे.

राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचे मुख्य संयोजक नितीन चौधरी पत्रकार परिषदेत म्हणाले, सामाजिक वर्ग आणि विशेष आडनाव किंवा जात आणि आडनाव असे कोणतेही जातसूत्र नाही, असा कोणताही सरळसरळ संबंध दिसून येत नाही. आडनावाचा आधार क्षेत्र, स्थान, परंपरागत काम, पूर्वपरंपरागत हुद्दा, व्यवसाय, शिवाय स्वतः स्वीकारलेले, बहाल केलेले असा प्रकार दिसतो. पूर्वकाळात काही भागात व्यक्तीच्या नावामागे केवळ जात नमूद केलेली दिसून येते. गाव कोतवाल नक्कलमध्ये, शेतीच्या सात बारामध्ये हा प्रकार दिसून येतो. परंतु आडनाव त्यात दिसत नव्हते, त्याऐवजी जात नमूद असायची. आडनाव प्रकार केव्हा सुरू झाला, त्यामागील आधाराबाबत अभ्यासाचा अभाव आहे. एकाच आडनावाच्या व्यक्ती हे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सामान्य वर्गातही आढळून येताना दिसतात. त्यामुळे याद्वारे ओबीसींची लोकसंख्या निश्चित करण्यावर प्रश्नचिन्ह लागू शकते. शिवाय या प्रक्रियेच्या निष्कर्षावर न्यायालयात आव्हान मिळू शकते.

एकाच आडनावाच्या व्यक्ती या वेगवेगळ्या सामाजिक वर्गात आढळून आल्यास, त्याची प्रत्यक्ष तपासणी घरी जाऊन केली जाणार आहे. परंतु हा प्रयत्न किती व्यक्ती संबंधाने करणार? कारण एक समान आडनाव व विविध सामाजिक वर्ग याची यादी भरपूर होऊ शकते. त्याकरिताचा वेळ व तपासनीस अधिकारी याचे व्यवस्थापन शक्य आहे काय, असा सवाल उपस्थित राहतो. आधीच ओबीसी संबंधाने इम्पिरिकल डेटा अहवाल तयारीस भरपूर वेळ खर्ची लागला आहे. त्यात ही प्रस्तावित किचकट पद्धती, अधिक वेळ व व्यवस्थापन खर्चिक ठरणारी आहे, असेही चौधरी यांनी सांगितले. यावेळी संयोजक भूषण दडवे, महिला अध्यक्ष गीता महाले, अमोल तळखंडे, ॲड. अशोक यावले, शकील मोहम्मदी, असलम खातमी, संजय भोगे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक