शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल नोंदणी करणाऱ्यांना पक्ष संघटनेत महत्त्वाचे स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 21:58 IST

Nagpur News डिजिटल नोंदणी मोहिमेत जे चांगले काम करतील, त्यांना पक्ष संघटनेत महत्त्वाचे स्थान दिले जाईल, असे माजी केंद्रीय राज्यमंत्री व अ. भा. काँग्रेस समितीचे पीआरओ पल्लम राजू यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देसामान्यांची नोंदणी करून पक्ष बळकटीचे आवाहन

नागपूर : अ. भा. काँग्रेस कमिटीतर्फे डिजिटल सदस्य नोंदणी अभियान राबविले जात आहे. ३१ मार्चपर्यंत प्रत्येक कार्यकर्ता व पदाधकाऱ्यांनी सामान्य माणसापर्यंत पोहोचवून त्यांची डिजिटल नोंदणी करावी. या नोंदणी मोहिमेत जे चांगले काम करतील, त्यांना पक्ष संघटनेत महत्त्वाचे स्थान दिले जाईल, असे माजी केंद्रीय राज्यमंत्री व अ. भा. काँग्रेस समितीचे पीआरओ पल्लम राजू यांनी स्पष्ट केले. देवडिया काँग्रेस भवन येथे शुक्रवारी पल्लम राजू यांनी डिजिटल नोंदणी अभियानाचा नागपूर शहर व ग्रामीणचा आढावा घेतला. यावेळी माजी मंत्री विलास मुत्तेमवार, शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, आ. वीरेंद्र जगताप, आ. अभिजित वंजारी, माजी मंत्री अनीस अहमद, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, प्रदेश सचिव अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार आदी उपस्थित होते.

याप्रसंगी पल्लम राजू म्हणाले, देशात जास्तीत जास्त डिजिटल सदस्य नोंदणी करून लोकांपर्यंत पोहोचण्याचे राहुल गांधी यांचे स्वप्न आहे. महाराष्ट्रात या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ब्लॉक व वॉर्ड स्तरापर्यंत नोंदणीवर अधिक लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली. या मोहिमेचा आपण दर आठ दिवसांनी प्रमुखांकडून आढावा घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. आ. विकास ठाकरे यांनी नागपूर शहर डिजिटल सदस्य नोंदणीत महाराष्टात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगत ३१ मार्चपूर्वी राज्यात पहिल्या क्रमाकांवर राहील, असा विश्वास व्यक्त केला.

टॅग्स :congressकाँग्रेस