शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

दिवसा जमावबंदीची अंमलबजावणी कुठेच दिसेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 00:58 IST

Curfew was not seen anywhere राज्य शासनासह महापालिका आयुक्तांनी विविध निर्बंधासह पूर्णत: टाळेबंदी लागू केली. त्या अनुषंगाने रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदीचे आदेशही निर्गमित केले. मात्र, या आदेशाचे तंतोतंत पालन होताना कुठेच दिसत नाही.

ठळक मुद्दे निर्बंधाचे वाजताहेत तीनतेरा : हॉस्पिटल्स, किराणा दुकानात जमताहेत पाचपेक्षा अधिक लोकटी-स्नॅक सेंटर्समध्येही पार्सल घेण्यासाठी लागताहेत रांगा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य शासनासह महापालिका आयुक्तांनी विविध निर्बंधासह पूर्णत: टाळेबंदी लागू केली. त्या अनुषंगाने रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदीचे आदेशही निर्गमित केले. मात्र, या आदेशाचे तंतोतंत पालन होताना कुठेच दिसत नाही. अनेक ठिकाणी पाचपेक्षा अधिक लोक एकत्र आलेले दिसून येत आहेत. एकीकडे शहरात कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे आणि दुसरीकडे नागरिक कुठलेच निर्बंध पाळत नसल्याने चिंता वाढायला लागली आहे.

३० एप्रिलपर्यंत असलेल्या टाळेबंदी अंतर्गत मॉल्स, बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याच अनुषंगाने रात्री पूर्णत: संचारबंदी आणि दिवसा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास अर्थात जमावबंदी घोषित केली आहे. मात्र, या दोन्ही घोषणांकडे नागरिकांनी सारासार दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. रात्री रस्त्यावर फिरण्यास निघालेल्या लोकांची भलमार असल्याचे दिसून येते. जगनाडे चौक ते केडीके कॉलेजदरम्यान हे चित्र रात्री १२ वाजतापर्यंत दिसत आहे. शिवाय, दिवसा जमावबंदीच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. हॉस्पिटल्स, किराणा दुकाने, बाजारपेठांमध्ये टाळेबंदीच्या विरोधासाठी एकत्र आलेले व्यापारी संसर्गाची कुठलीही भीती न बाळगता एकत्र आल्याचे दिसून येते. टाळेबंदीत टी-स्नॅक सेंटर्स, रेस्टाॅरंटना पार्सल सुविधेची मुभा देण्यात आली आहे. मात्र, येथे पार्सल घेण्यासाठीच रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. चहा पार्सलने नेण्याची वस्तू नसल्याने अनेक जण टी-पॉईंट्सवरच चहा घेताना दिसत आहेत. अशीच स्थिती फेरीवाल्यांची आहे. फळे, नारळ पाणी विक्रेत्यांच्या ठेल्यावरही अशीच स्थिती दिसून येत आहे. विशेष म्हणजे, याबाबत पोलीस किंवा प्रशासकीय यंत्रणाही टोकत नसल्याचे दिसून येत आहे.

बाजारपेठा बंद तरी रस्ते फुल्ल

टाळेबंदी अंतर्गत बाजारपेठा बंद आहेत. मात्र, रस्त्यावर गर्दी ओसरलेली दिसत नाही. खासगी आस्थापनांना सरकारने बंद ठेवण्याचे व पर्यायी व्यवस्था म्हणून वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत. मात्र, सरकारच्या या निर्णयाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने कर्मचारी आपल्या नियोजित वेळेत घराबाहेर पडत आहेत. नोकरदार वर्ग रस्त्यावर उतरत असल्याने गर्दी कमी झालेली नाही. अशा या विसंगत धोरणामुळेही व्यापारी क्रोधीत झाल्याचे दिसून येत आहे. कोरोना संक्रमण बाजारपेठातूनच पसरतो का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मास्क नाहीच, कारवाईसुद्धा जुजबी

रस्त्यावर अनेक जण विनामास्क उतरत असल्याचे दिसून येत आहे. काही तरुण विनामास्क, विना हेल्मेट ट्रिपल सीटने फिरताना दिसत आहेत. पूर्वीसारखी पोलिसांची तैनाती नसल्याने अशांचे फावते आहे. काही ठिकाणी पोलिसांकडून मास्क व हेल्मेट संदर्भातील जुजबी कारवाई होत असल्याचेही दिसून येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार