शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

प्रभाव लोकमतचा : ठेवीची रक्कम परत करण्याचे जिल्हा उपनिबंधकांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 01:06 IST

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांतर्फे संचालित एसबीआय एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीत सेवानिवृत्तीनंतर अडकलेली डॉ. प्रदीप येळणे यांच्या ठेवीची रक्कम परत करण्याचे आदेश सहकारी संस्था, नागपूरचे जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांनी सोसायटीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकाला दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांतर्फे संचालित एसबीआय एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीत सेवानिवृत्तीनंतर अडकलेली डॉ. प्रदीप येळणे यांच्या ठेवीची रक्कम परत करण्याचे आदेश सहकारी संस्था, नागपूरचे जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांनी सोसायटीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकाला दिले आहेत. यासंदर्भात ११ ऑगस्टला सोसायटीला पत्र पाठविले आहे.बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या १० कोटींच्या ठेवी सोसायटीत फसल्या असून, अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकाऱ्यांनी परत न केल्याच्या संदर्भातील बातमी लोकमतने ‘एसबीआय एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीत अडकले १० कोटी’ या मथळ्याखाली प्रकाशित केली होती, शिवाय डॉ. येळणे यांनीही जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली होती. लोकमतच्या वृत्ताची दखल घेत जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांनी सोसायटीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकाला उपरोक्त आदेश दिले आहेत. तक्रार/निवेदनाची दखल घेऊन नियमानुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी आणि कार्यालयाला अवगत करावे, अन्यथा अध्यक्ष व व्यवस्थापकाविरुद्ध पुढील आवश्यक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधकांनी पत्रात नमूद केले आहे.प्राप्त माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडियात कार्यरत अनेक अधिकारी आणि कर्मचारी सोसायटीचे सदस्य असून, ते दर महिन्याला ठराविक भागाची व ठेवीची रक्कम जमा करतात. सदस्य बँकेतून निवृत्त झाल्यानंतर सोसायटीत जमा केलेली रक्कम त्यांना परत मिळते आणि त्यांचे सभासदत्व कमी करण्यात येते. पण तब्बल एक वर्षानंतरही डॉ. प्रदीप येळणे यांची ठेवीची रक्कम सोसायटीने परत केली नाही आणि सभासदत्वही कमी केले नाही. यासंदर्भात त्यांनी जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत कडू यांनी उपरोक्त आदेश दिले आहेत.