शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

निवडणुकीचा विकास योजनांवर परिणाम

By admin | Updated: May 12, 2014 00:29 IST

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा जिल्हा परिषदेच्या विविध योजनांवर परिणाम झाला आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनांसोबतच रस्ते दुरुस्ती, दलित वस्त्यातील विकास कामे, ...

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा जिल्हा परिषदेच्या विविध योजनांवर परिणाम झाला आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनांसोबतच रस्ते दुरुस्ती, दलित वस्त्यातील विकास कामे, अंगणवाडी व आरोग्य केंद्रांचे बांधकाम अशा कामांना फटका बसला आहे. महिला व बाल कल्याण विभागामार्फ त दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना सौर कंदील पुरविणे, महिलांना पिको फॉल मशीन पुरविणे, सोलर कुकरचे वाटप थांबले आहे. कृ षी विभागातर्फे पीक संरक्षणासाठी शेतकर्‍यांना ताडपत्री वाटप, ओलितासाठी पीव्हीसी पाईप, आॅईल इंजिन, पेट्रोल व केरोसीन इंजिन, इलेक्ट्रिक मोटारपंप, ताडपत्री वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. एप्रिल महिन्यात वाटप केले जाणार होते. परंतु आचारसंहितेमुळे लाभार्थ्यांना साहित्य वाटप करता आलेले नाही. बांधकाम विभागाने रस्ते व पूल दुरुस्तीचे नियोजन केले आहे. यासाठी शासनाने ३२ कोटी मंजूर केले आहे. प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे मंजुरीसाठी पाठवावयाचा आहे. रस्ते दुरुस्तीची तातडीची गरज असतानाही आचारसंहितेमुळे हा प्रस्ताव थांबला आहे. सेसफंडात रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सहा कोटींची तरतूद करण्यात आली आहे. परंतु अद्याप कार्यादेशाची प्रक्रि या थांबली आहे. शिक्षण विभागामार्फत उन्हाळ्याच्या दिवसात शाळा खोल्यांची विशेष दुरुस्ती करणे गरजेचे असते. यासाठी जि.प.च्या सेसफं डात ४५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी अखर्चित राहण्याची शक्यता आहे. समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जातात. शेतकर्‍यांना धान्यकोठी पुरविणे, बेरोजगारांना साहित्य वाटप, टिनपत्रे, ताडपत्री, कांडप मशीन, शेतीची अवजारे, पॉवर स्प्रे पंप, मासेमारी जाळे तसेच गृह उद्योगासाठी साहित्य पुरविले जाते. या योजनांना आचारसंहितेचा फटका बसला आहे. शिक्षण, समाज कल्याण तसेच महिला व बाल कल्याण विभागातर्फे विद्यार्थ्यांना सायकल वाटपासाठी तीन कोटींची तरतूद केली आहे. सुरुवातीला पदाधिकारी व अधिकार्‍यांतील वादामुळे सायकल वाटप रखडले. हा वाद शमल्यानंतर विद्यार्थ्यांना सायकली मिळण्याची अपेक्षा असतानाच, आचारसंहिता लागल्याने वाटप पुन्हा लांबणीवर पडले. (प्रतिनिधी)