शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

कोरोनाचा परिणाम : हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 01:06 IST

कोरोनामुळे हातावर पोट असणारा घटक अडचणीत सापडला आहे. या घटकाचे आर्थिक उत्पन्न बंद झाले आहे. परिणामी, त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या घटकाला जगवण्यासाठी प्रशासन व समाजसेवी संस्थांनी तातडीने पुढाकार घेण्याची गरज आहे.

ठळक मुद्देतातडीने मदत पोहचवणे आवश्यक

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे हातावर पोट असणारा घटक अडचणीत सापडला आहे. या घटकाचे आर्थिक उत्पन्न बंद झाले आहे. परिणामी, त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या घटकाला जगवण्यासाठी प्रशासन व समाजसेवी संस्थांनी तातडीने पुढाकार घेण्याची गरज आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे रस्त्यांवर हातठेले लावून चहा, लिंबूपाणी, उसाचा रस, खाद्यपदार्थ, कपडे, पादत्राणे, सौंदर्यप्रसाधने आदी वस्तू विकणाऱ्यांचे आर्थिक उत्पन्न बंद झाले आहे. मॉल्स व मोठ्या प्रतिष्ठानांमधील कामगार, हमाल, सुरक्षारक्षक व मालवाहू वाहनचालकांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे लोकांनी घराबाहेर पडणे कमी केल्यामुळे रिक्षाचालक, गटई कामगार, मेहंदी काढणारे आदींचा धंदा मंदावला आहे. अनेकांनी घरकामगारांची सेवा थांबवली आहे. जाणकारांच्या अंदाजानुसार शहरातील अशा सुमारे ५० हजारांवर व्यक्तींना कोरोनाचा जोरदार फटका बसला आहे. परिस्थिती सुरळीत होतपर्यंत या घटकाला भोजन, पाणी व औषधी या तीन गोष्टींचा पुरवठा करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु, सध्या या घटकाकडे सर्वांचे दुर्लक्ष आहे. तर असंतोष उफाळेलहातावर पोट असणाऱ्या घटकापर्यंत वेळेवर मदत पोहोचली नाही तर, त्यांच्यामध्ये असंतोष उफाळून येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसे झाल्यास हा घटक स्वत:सह कुटुंबाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरेल व प्रशासनाला जुमानणे सोडून देईल. ती परिस्थिती ओढवू नये याकरिता सरकारने तातडीने मदत योजना जाहीर करणे योग्य होईल, असे बोलले जात आहे.कुणालाच चिंता नाहीहातावर पोट असणारा घटक सध्या सर्वाधिक अडचणीत आहे. त्या घटकाची कुणालाच चिंता नसल्याचे दिसून येत आहे. ही दुर्दैवी बाब आहे. सरकारने या घटकाच्या मदतीसाठी तातडीने योजना जाहीर करावी. या घटकाला वाचविणे आवश्यक आहे. हरीश धुरट, विदर्भ प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रीय कष्टकरी पंचायत.तात्काळ नियोजन करावेकोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश येईपर्यंत हातावर पोट असणाऱ्या घटकाला कसे जगवता येईल याचे सरकारने तात्काळ नियोजन करावे. या घटकाला भोजन, पाणी व औषधी या तीन गोष्टींचा पुरवठा करणे गरजेचे आहे, अन्यथा त्यांच्यात असंतोष निर्माण होईल. विलास भोंगाडे, संयोजक, नॅशनल अलायन्स ऑफ पीपल मूव्हमेंट्स.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर