शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा परिणाम : हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 01:06 IST

कोरोनामुळे हातावर पोट असणारा घटक अडचणीत सापडला आहे. या घटकाचे आर्थिक उत्पन्न बंद झाले आहे. परिणामी, त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या घटकाला जगवण्यासाठी प्रशासन व समाजसेवी संस्थांनी तातडीने पुढाकार घेण्याची गरज आहे.

ठळक मुद्देतातडीने मदत पोहचवणे आवश्यक

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे हातावर पोट असणारा घटक अडचणीत सापडला आहे. या घटकाचे आर्थिक उत्पन्न बंद झाले आहे. परिणामी, त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या घटकाला जगवण्यासाठी प्रशासन व समाजसेवी संस्थांनी तातडीने पुढाकार घेण्याची गरज आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे रस्त्यांवर हातठेले लावून चहा, लिंबूपाणी, उसाचा रस, खाद्यपदार्थ, कपडे, पादत्राणे, सौंदर्यप्रसाधने आदी वस्तू विकणाऱ्यांचे आर्थिक उत्पन्न बंद झाले आहे. मॉल्स व मोठ्या प्रतिष्ठानांमधील कामगार, हमाल, सुरक्षारक्षक व मालवाहू वाहनचालकांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे लोकांनी घराबाहेर पडणे कमी केल्यामुळे रिक्षाचालक, गटई कामगार, मेहंदी काढणारे आदींचा धंदा मंदावला आहे. अनेकांनी घरकामगारांची सेवा थांबवली आहे. जाणकारांच्या अंदाजानुसार शहरातील अशा सुमारे ५० हजारांवर व्यक्तींना कोरोनाचा जोरदार फटका बसला आहे. परिस्थिती सुरळीत होतपर्यंत या घटकाला भोजन, पाणी व औषधी या तीन गोष्टींचा पुरवठा करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु, सध्या या घटकाकडे सर्वांचे दुर्लक्ष आहे. तर असंतोष उफाळेलहातावर पोट असणाऱ्या घटकापर्यंत वेळेवर मदत पोहोचली नाही तर, त्यांच्यामध्ये असंतोष उफाळून येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसे झाल्यास हा घटक स्वत:सह कुटुंबाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरेल व प्रशासनाला जुमानणे सोडून देईल. ती परिस्थिती ओढवू नये याकरिता सरकारने तातडीने मदत योजना जाहीर करणे योग्य होईल, असे बोलले जात आहे.कुणालाच चिंता नाहीहातावर पोट असणारा घटक सध्या सर्वाधिक अडचणीत आहे. त्या घटकाची कुणालाच चिंता नसल्याचे दिसून येत आहे. ही दुर्दैवी बाब आहे. सरकारने या घटकाच्या मदतीसाठी तातडीने योजना जाहीर करावी. या घटकाला वाचविणे आवश्यक आहे. हरीश धुरट, विदर्भ प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रीय कष्टकरी पंचायत.तात्काळ नियोजन करावेकोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश येईपर्यंत हातावर पोट असणाऱ्या घटकाला कसे जगवता येईल याचे सरकारने तात्काळ नियोजन करावे. या घटकाला भोजन, पाणी व औषधी या तीन गोष्टींचा पुरवठा करणे गरजेचे आहे, अन्यथा त्यांच्यात असंतोष निर्माण होईल. विलास भोंगाडे, संयोजक, नॅशनल अलायन्स ऑफ पीपल मूव्हमेंट्स.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर