शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

कोरोनाचा परिणाम : हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 01:06 IST

कोरोनामुळे हातावर पोट असणारा घटक अडचणीत सापडला आहे. या घटकाचे आर्थिक उत्पन्न बंद झाले आहे. परिणामी, त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या घटकाला जगवण्यासाठी प्रशासन व समाजसेवी संस्थांनी तातडीने पुढाकार घेण्याची गरज आहे.

ठळक मुद्देतातडीने मदत पोहचवणे आवश्यक

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे हातावर पोट असणारा घटक अडचणीत सापडला आहे. या घटकाचे आर्थिक उत्पन्न बंद झाले आहे. परिणामी, त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या घटकाला जगवण्यासाठी प्रशासन व समाजसेवी संस्थांनी तातडीने पुढाकार घेण्याची गरज आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे रस्त्यांवर हातठेले लावून चहा, लिंबूपाणी, उसाचा रस, खाद्यपदार्थ, कपडे, पादत्राणे, सौंदर्यप्रसाधने आदी वस्तू विकणाऱ्यांचे आर्थिक उत्पन्न बंद झाले आहे. मॉल्स व मोठ्या प्रतिष्ठानांमधील कामगार, हमाल, सुरक्षारक्षक व मालवाहू वाहनचालकांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे लोकांनी घराबाहेर पडणे कमी केल्यामुळे रिक्षाचालक, गटई कामगार, मेहंदी काढणारे आदींचा धंदा मंदावला आहे. अनेकांनी घरकामगारांची सेवा थांबवली आहे. जाणकारांच्या अंदाजानुसार शहरातील अशा सुमारे ५० हजारांवर व्यक्तींना कोरोनाचा जोरदार फटका बसला आहे. परिस्थिती सुरळीत होतपर्यंत या घटकाला भोजन, पाणी व औषधी या तीन गोष्टींचा पुरवठा करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु, सध्या या घटकाकडे सर्वांचे दुर्लक्ष आहे. तर असंतोष उफाळेलहातावर पोट असणाऱ्या घटकापर्यंत वेळेवर मदत पोहोचली नाही तर, त्यांच्यामध्ये असंतोष उफाळून येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसे झाल्यास हा घटक स्वत:सह कुटुंबाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरेल व प्रशासनाला जुमानणे सोडून देईल. ती परिस्थिती ओढवू नये याकरिता सरकारने तातडीने मदत योजना जाहीर करणे योग्य होईल, असे बोलले जात आहे.कुणालाच चिंता नाहीहातावर पोट असणारा घटक सध्या सर्वाधिक अडचणीत आहे. त्या घटकाची कुणालाच चिंता नसल्याचे दिसून येत आहे. ही दुर्दैवी बाब आहे. सरकारने या घटकाच्या मदतीसाठी तातडीने योजना जाहीर करावी. या घटकाला वाचविणे आवश्यक आहे. हरीश धुरट, विदर्भ प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रीय कष्टकरी पंचायत.तात्काळ नियोजन करावेकोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश येईपर्यंत हातावर पोट असणाऱ्या घटकाला कसे जगवता येईल याचे सरकारने तात्काळ नियोजन करावे. या घटकाला भोजन, पाणी व औषधी या तीन गोष्टींचा पुरवठा करणे गरजेचे आहे, अन्यथा त्यांच्यात असंतोष निर्माण होईल. विलास भोंगाडे, संयोजक, नॅशनल अलायन्स ऑफ पीपल मूव्हमेंट्स.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर