शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

उपराजधानीत मान्सूनपूर्व अभियानाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 12:53 IST

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. वादळी वारे आणि तुरळक पावसामुळे वातावरणात आर्द्रता वाढली आहे. वादळी वाऱ्यांचा फटका महावितरणच्या यंत्रणेला बसला आहे.

ठळक मुद्देतयारीच्या नावावर वीज वितरण कंपनीचा टाइमपास

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. वादळी वारे आणि तुरळक पावसामुळे वातावरणात आर्द्रता वाढली आहे. वादळी वाऱ्यांचा फटका महावितरणच्या यंत्रणेला बसला आहे. वादळी वाºयाचा तडाखा बसल्याने आता यंत्रणा जागी झाली आहे. साप्ताहिक मेंटेनन्सच्या नावावर तास तासभर वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. काम पूर्ण करण्याच्या नावावर बुधवारसोबतच इतरही दिवस वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. विभागातर्फे दावा करण्यात येत आहे की, वादळी वाºयापासून यंत्रणेला नुकसान पोहचू नये म्हणून या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जनतेने वीज विभागाच्या दाव्याला मान्य करून, उकाड्यात दिवस काढले. प्रत्यक्षात मात्र विभागाने मान्सूनपूर्व तयारीच्या नावावर केवळ टाइमपास केल्याचे दिसत आहे. त्यामुळे वितरण प्रणालीला वादळी वाऱ्यांचा मारा सहन करण्यास असक्षम ठरली आहे. त्यामुळेच वादळी वारे सुरू झाल्याबरोबर वीज कंपनी होणारी हानी लक्षात घेता, वीज पुरवठा खंडित करीत आहे. मात्र याला ‘हॅण्ड ट्रिपिंग’चे नाव देऊन नुकसानीपासून बचाव करण्यासाठी पुरवठा खंडित करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर विभागाकडून असेही सांगण्यात येत आहे की, वाºयांची गती जास्त असल्याने समस्या निर्माण होत आहे. वाºयाच्या वेगाने विजेचे खांब वाकायला लागले आहे. झाडांच्या फांद्या विजेच्या तारावर पडल्याने तारा तुटत आहेत.ही सर्व परिस्थिती लक्षात घेता, प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे की, वीज कंपन्यांनी मान्सूनपूर्व तयारीच्या नावावर अखेर केले काय आहे. लोकमतने शहरात निर्माण झालेल्या विजेच्या संकटामुळे शहरातील विविध भागातील वीज वितरण यंत्रणेचा आढावा घेतला. यावरून स्पष्ट झाले की, महावितरण असो की एसएनडीएलच्या कर्मचाºयांनी मान्सूनपूर्व तयारीच्या नावावर केवळ टाइमपास केला आहे. दोन्ही कंपन्यांच्या क्षेत्रात विजेचे खांब व विद्युत तारा झाडांमध्ये आलेल्या आहेत. वादळामुळे झाडाच्या फांद्या तुटण्याची शक्यता आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, ट्रान्सफार्मरमध्ये असणाºया आॅईलची लेव्हलसुद्धा तपासण्यात आली नाही. काही ठिकाणचे कंडक्टर व जम्पर हलायला लागले आहे.

वीज कंपन्यांसाठी ३१ मे आली नाहीनियमानुसार ३१ मे च्या पूर्वी मान्सून पूर्वतयारी पूर्ण करणे गरजेचे आहे. परंतु अद्यापही वीज कंपन्यांसाठी ही तिथी आली नाही. जून महिन्यातही मेंटेनन्ससाठी वीज खंडित करण्यात येत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, पाऊस झाल्याने झाडाच्या फांद्या वाढतात. यासाठी काम सतत सुरू असते.

मेंटेनन्सचे टेंडर ठरलेले नाहीआश्चर्य म्हणजे मान्सून पूर्वतयारीचा वेळ गेल्यानंतरही महावितरण मेंटेनन्सचे टेंडर ठरवू शकली नाही. ठेकेदारांचे म्हणणे आहे की, टेंडरचे दर कमी असल्यामुळे आम्ही काम करू शकत नाही. यासंदर्भात ठेकेदार व व्यवस्थापनाशी झालेल्या बैठकीतूनही काहीच निष्कर्श निघालेले नाही. यावरून लक्षात येते की, मान्सूनची काय तयारी झाली आहे.

टॅग्स :electricityवीज