शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

विजेचे कनेक्शन हवे असेल, तर बाजारातून मीटर घेऊन या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2022 08:00 IST

Nagpur News परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, विजेचे कनेक्शन घेण्यासाठी ग्राहकांना बाजारातून मीटर खरेदी करण्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्दे राज्यातील १०.५७ लाख अर्ज प्रलंबित१,५९६ रुपयांऐवजी ग्राहकांना मोजावे लागत आहेत ४,००० रुपये

कमल शर्मा 

नागपूर : महावितरणाचा डोलारा ढाळसल्यागत स्थितीत आहे. परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, विजेचे कनेक्शन घेण्यासाठी ग्राहकांना बाजारातून मीटर खरेदी करण्याचे सांगितले जात आहे. महावितरणकडून ज्या थ्री फेज मीटरसाठी १,५९६ रुपये घेत होती, तेच मीटर ग्राहकांना बाजारातून ४,००० रुपये मोजून खरेदी करावे लागत आहेत. सिंगल फेज मीटरसाठी ग्राहकांना ९४४ रुपयांऐवजी १,८०० रुपये मोजावे लागत आहेत.

नागपुरातच नव्हे, तर महावितरणच्या संपूर्ण क्षेत्रातच ही समस्या निर्माण झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीपासूनच मीटरचा तुटवडा निर्माण झाल्याने, नवे कनेक्शन देण्याची कामे बंद आहेत. सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, तुटवड्यामुळे राज्यात नव्या कनेक्शनसाठी १०.५७ लाख अर्ज प्रलंबित आहेत. २.२ लाख ग्राहकांना डिमांड भरल्यावरही विजेचे कनेक्शन मिळालेले नाही. कनेक्शनचा आग्रह म्हणा वा घाई करणाऱ्या ग्राहकांना महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून मीटर कंपन्यांची यादी सोपविली जात असून, बाजारातून मीटर आणण्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर, महावितरणकडून त्या मीटरची टेस्टिंग करून ते लावले जात आहेत. या प्रक्रियेत ग्राहकांना दुप्पट खर्च करावा लागत आहे. बहुतांश ग्राहक बाजारातील मीटरचे दर बघून, महावितरणचे मीटर येण्याची वाट बघत आहेत.

फॉल्टी मीटर बदलले नसल्यास मोठे नुकसान

राज्यात जवळपास १२ लाख मिटर फॉल्टी आहेत, ते बदलणे गरजेचे आहे, परंतु मीटरचा तुटवडा निर्माण झाल्याने ते कामही अडकले आहे. त्याचा महावितरणला मोठा फटका बसत आहेत. फाॅल्टी मीटरमुळे ग्राहकांना मागच्या तीन महिन्यांच्या अंदाजानुसार सरासरी बिल दिले जात आहे. सध्या उन्हाळा सुरू असून, हिवाळ्यातील अंदाजानुसार बिल दिले जात आहे. उन्हाळ्यात विजेची खपत प्रचंड वाढलेली असते. त्यानुसार, दिले जाणारे बिल फार कमी आहे. आर्थिक संकटात असलेल्या महावितरणला यामुळेही फटका बसत आहे.

उच्चस्तरीय तपासाची मागणी

सब ऑर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशनचे महासचिव संजय ठाकूर यांनी महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहून प्रकरणाची उच्चस्तरीय तपासणी करण्याची मागणी केली आहे. कंपनी मीटर खरेदी करत नसल्यावरही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. रोलेक्टचे मीटर खराब असल्याचे लिहिल्यामुळे २०१४ मध्ये कंपनीला १०० कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे, परंतु या प्रकरणापासून महावितरणने कसलाच धडा घेतला नसल्याचेही ठाकूर म्हणाले. येत्या १० ते १५ दिवसांत मीटरचा तुटवडा संपलेला असेल, असे महावितरणकडून सांगितले जात आहे.

...........

टॅग्स :electricityवीज