शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

विजेचे कनेक्शन हवे असेल, तर बाजारातून मीटर घेऊन या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2022 08:00 IST

Nagpur News परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, विजेचे कनेक्शन घेण्यासाठी ग्राहकांना बाजारातून मीटर खरेदी करण्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्दे राज्यातील १०.५७ लाख अर्ज प्रलंबित१,५९६ रुपयांऐवजी ग्राहकांना मोजावे लागत आहेत ४,००० रुपये

कमल शर्मा 

नागपूर : महावितरणाचा डोलारा ढाळसल्यागत स्थितीत आहे. परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, विजेचे कनेक्शन घेण्यासाठी ग्राहकांना बाजारातून मीटर खरेदी करण्याचे सांगितले जात आहे. महावितरणकडून ज्या थ्री फेज मीटरसाठी १,५९६ रुपये घेत होती, तेच मीटर ग्राहकांना बाजारातून ४,००० रुपये मोजून खरेदी करावे लागत आहेत. सिंगल फेज मीटरसाठी ग्राहकांना ९४४ रुपयांऐवजी १,८०० रुपये मोजावे लागत आहेत.

नागपुरातच नव्हे, तर महावितरणच्या संपूर्ण क्षेत्रातच ही समस्या निर्माण झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीपासूनच मीटरचा तुटवडा निर्माण झाल्याने, नवे कनेक्शन देण्याची कामे बंद आहेत. सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, तुटवड्यामुळे राज्यात नव्या कनेक्शनसाठी १०.५७ लाख अर्ज प्रलंबित आहेत. २.२ लाख ग्राहकांना डिमांड भरल्यावरही विजेचे कनेक्शन मिळालेले नाही. कनेक्शनचा आग्रह म्हणा वा घाई करणाऱ्या ग्राहकांना महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून मीटर कंपन्यांची यादी सोपविली जात असून, बाजारातून मीटर आणण्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर, महावितरणकडून त्या मीटरची टेस्टिंग करून ते लावले जात आहेत. या प्रक्रियेत ग्राहकांना दुप्पट खर्च करावा लागत आहे. बहुतांश ग्राहक बाजारातील मीटरचे दर बघून, महावितरणचे मीटर येण्याची वाट बघत आहेत.

फॉल्टी मीटर बदलले नसल्यास मोठे नुकसान

राज्यात जवळपास १२ लाख मिटर फॉल्टी आहेत, ते बदलणे गरजेचे आहे, परंतु मीटरचा तुटवडा निर्माण झाल्याने ते कामही अडकले आहे. त्याचा महावितरणला मोठा फटका बसत आहेत. फाॅल्टी मीटरमुळे ग्राहकांना मागच्या तीन महिन्यांच्या अंदाजानुसार सरासरी बिल दिले जात आहे. सध्या उन्हाळा सुरू असून, हिवाळ्यातील अंदाजानुसार बिल दिले जात आहे. उन्हाळ्यात विजेची खपत प्रचंड वाढलेली असते. त्यानुसार, दिले जाणारे बिल फार कमी आहे. आर्थिक संकटात असलेल्या महावितरणला यामुळेही फटका बसत आहे.

उच्चस्तरीय तपासाची मागणी

सब ऑर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशनचे महासचिव संजय ठाकूर यांनी महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहून प्रकरणाची उच्चस्तरीय तपासणी करण्याची मागणी केली आहे. कंपनी मीटर खरेदी करत नसल्यावरही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. रोलेक्टचे मीटर खराब असल्याचे लिहिल्यामुळे २०१४ मध्ये कंपनीला १०० कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे, परंतु या प्रकरणापासून महावितरणने कसलाच धडा घेतला नसल्याचेही ठाकूर म्हणाले. येत्या १० ते १५ दिवसांत मीटरचा तुटवडा संपलेला असेल, असे महावितरणकडून सांगितले जात आहे.

...........

टॅग्स :electricityवीज