शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
5
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
6
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
7
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
8
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
9
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
10
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
11
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
12
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
13
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
14
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
15
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
16
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
17
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
18
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
19
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
20
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा

विजेचे कनेक्शन हवे असेल, तर बाजारातून मीटर घेऊन या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2022 08:00 IST

Nagpur News परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, विजेचे कनेक्शन घेण्यासाठी ग्राहकांना बाजारातून मीटर खरेदी करण्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्दे राज्यातील १०.५७ लाख अर्ज प्रलंबित१,५९६ रुपयांऐवजी ग्राहकांना मोजावे लागत आहेत ४,००० रुपये

कमल शर्मा 

नागपूर : महावितरणाचा डोलारा ढाळसल्यागत स्थितीत आहे. परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, विजेचे कनेक्शन घेण्यासाठी ग्राहकांना बाजारातून मीटर खरेदी करण्याचे सांगितले जात आहे. महावितरणकडून ज्या थ्री फेज मीटरसाठी १,५९६ रुपये घेत होती, तेच मीटर ग्राहकांना बाजारातून ४,००० रुपये मोजून खरेदी करावे लागत आहेत. सिंगल फेज मीटरसाठी ग्राहकांना ९४४ रुपयांऐवजी १,८०० रुपये मोजावे लागत आहेत.

नागपुरातच नव्हे, तर महावितरणच्या संपूर्ण क्षेत्रातच ही समस्या निर्माण झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीपासूनच मीटरचा तुटवडा निर्माण झाल्याने, नवे कनेक्शन देण्याची कामे बंद आहेत. सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, तुटवड्यामुळे राज्यात नव्या कनेक्शनसाठी १०.५७ लाख अर्ज प्रलंबित आहेत. २.२ लाख ग्राहकांना डिमांड भरल्यावरही विजेचे कनेक्शन मिळालेले नाही. कनेक्शनचा आग्रह म्हणा वा घाई करणाऱ्या ग्राहकांना महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून मीटर कंपन्यांची यादी सोपविली जात असून, बाजारातून मीटर आणण्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर, महावितरणकडून त्या मीटरची टेस्टिंग करून ते लावले जात आहेत. या प्रक्रियेत ग्राहकांना दुप्पट खर्च करावा लागत आहे. बहुतांश ग्राहक बाजारातील मीटरचे दर बघून, महावितरणचे मीटर येण्याची वाट बघत आहेत.

फॉल्टी मीटर बदलले नसल्यास मोठे नुकसान

राज्यात जवळपास १२ लाख मिटर फॉल्टी आहेत, ते बदलणे गरजेचे आहे, परंतु मीटरचा तुटवडा निर्माण झाल्याने ते कामही अडकले आहे. त्याचा महावितरणला मोठा फटका बसत आहेत. फाॅल्टी मीटरमुळे ग्राहकांना मागच्या तीन महिन्यांच्या अंदाजानुसार सरासरी बिल दिले जात आहे. सध्या उन्हाळा सुरू असून, हिवाळ्यातील अंदाजानुसार बिल दिले जात आहे. उन्हाळ्यात विजेची खपत प्रचंड वाढलेली असते. त्यानुसार, दिले जाणारे बिल फार कमी आहे. आर्थिक संकटात असलेल्या महावितरणला यामुळेही फटका बसत आहे.

उच्चस्तरीय तपासाची मागणी

सब ऑर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशनचे महासचिव संजय ठाकूर यांनी महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहून प्रकरणाची उच्चस्तरीय तपासणी करण्याची मागणी केली आहे. कंपनी मीटर खरेदी करत नसल्यावरही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. रोलेक्टचे मीटर खराब असल्याचे लिहिल्यामुळे २०१४ मध्ये कंपनीला १०० कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे, परंतु या प्रकरणापासून महावितरणने कसलाच धडा घेतला नसल्याचेही ठाकूर म्हणाले. येत्या १० ते १५ दिवसांत मीटरचा तुटवडा संपलेला असेल, असे महावितरणकडून सांगितले जात आहे.

...........

टॅग्स :electricityवीज