शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

विजेचे कनेक्शन हवे असेल, तर बाजारातून मीटर घेऊन या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2022 08:00 IST

Nagpur News परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, विजेचे कनेक्शन घेण्यासाठी ग्राहकांना बाजारातून मीटर खरेदी करण्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्दे राज्यातील १०.५७ लाख अर्ज प्रलंबित१,५९६ रुपयांऐवजी ग्राहकांना मोजावे लागत आहेत ४,००० रुपये

कमल शर्मा 

नागपूर : महावितरणाचा डोलारा ढाळसल्यागत स्थितीत आहे. परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, विजेचे कनेक्शन घेण्यासाठी ग्राहकांना बाजारातून मीटर खरेदी करण्याचे सांगितले जात आहे. महावितरणकडून ज्या थ्री फेज मीटरसाठी १,५९६ रुपये घेत होती, तेच मीटर ग्राहकांना बाजारातून ४,००० रुपये मोजून खरेदी करावे लागत आहेत. सिंगल फेज मीटरसाठी ग्राहकांना ९४४ रुपयांऐवजी १,८०० रुपये मोजावे लागत आहेत.

नागपुरातच नव्हे, तर महावितरणच्या संपूर्ण क्षेत्रातच ही समस्या निर्माण झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीपासूनच मीटरचा तुटवडा निर्माण झाल्याने, नवे कनेक्शन देण्याची कामे बंद आहेत. सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, तुटवड्यामुळे राज्यात नव्या कनेक्शनसाठी १०.५७ लाख अर्ज प्रलंबित आहेत. २.२ लाख ग्राहकांना डिमांड भरल्यावरही विजेचे कनेक्शन मिळालेले नाही. कनेक्शनचा आग्रह म्हणा वा घाई करणाऱ्या ग्राहकांना महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून मीटर कंपन्यांची यादी सोपविली जात असून, बाजारातून मीटर आणण्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर, महावितरणकडून त्या मीटरची टेस्टिंग करून ते लावले जात आहेत. या प्रक्रियेत ग्राहकांना दुप्पट खर्च करावा लागत आहे. बहुतांश ग्राहक बाजारातील मीटरचे दर बघून, महावितरणचे मीटर येण्याची वाट बघत आहेत.

फॉल्टी मीटर बदलले नसल्यास मोठे नुकसान

राज्यात जवळपास १२ लाख मिटर फॉल्टी आहेत, ते बदलणे गरजेचे आहे, परंतु मीटरचा तुटवडा निर्माण झाल्याने ते कामही अडकले आहे. त्याचा महावितरणला मोठा फटका बसत आहेत. फाॅल्टी मीटरमुळे ग्राहकांना मागच्या तीन महिन्यांच्या अंदाजानुसार सरासरी बिल दिले जात आहे. सध्या उन्हाळा सुरू असून, हिवाळ्यातील अंदाजानुसार बिल दिले जात आहे. उन्हाळ्यात विजेची खपत प्रचंड वाढलेली असते. त्यानुसार, दिले जाणारे बिल फार कमी आहे. आर्थिक संकटात असलेल्या महावितरणला यामुळेही फटका बसत आहे.

उच्चस्तरीय तपासाची मागणी

सब ऑर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशनचे महासचिव संजय ठाकूर यांनी महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहून प्रकरणाची उच्चस्तरीय तपासणी करण्याची मागणी केली आहे. कंपनी मीटर खरेदी करत नसल्यावरही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. रोलेक्टचे मीटर खराब असल्याचे लिहिल्यामुळे २०१४ मध्ये कंपनीला १०० कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे, परंतु या प्रकरणापासून महावितरणने कसलाच धडा घेतला नसल्याचेही ठाकूर म्हणाले. येत्या १० ते १५ दिवसांत मीटरचा तुटवडा संपलेला असेल, असे महावितरणकडून सांगितले जात आहे.

...........

टॅग्स :electricityवीज