शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

स्वत:ला श्रेष्ठ मानून शिकणे थांबविले तर पतनाला सुरुवात : मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 01:09 IST

उत्तम होण्याची कोणती सीमा नसते. शिखरावर पोहचल्यानंतरही तेथे टिकून राहण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागतात. आपण आता श्रेष्ठ झालो आहोत आणि काही शिकण्याची व सुधारण्याची गरज नाही, असा विचार मनात आला तर त्याच क्षणी तुमची प्रगती थांबते आणि पतनाकडे वाटचाल सुरू होते, असे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मांडले.

ठळक मुद्देक्रीडा भारतीतर्फे घोषवादन स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उत्तम होण्याची कोणती सीमा नसते. शिखरावर पोहचल्यानंतरही तेथे टिकून राहण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागतात. आपण आता श्रेष्ठ झालो आहोत आणि काही शिकण्याची व सुधारण्याची गरज नाही, असा विचार मनात आला तर त्याच क्षणी तुमची प्रगती थांबते आणि पतनाकडे वाटचाल सुरू होते, असे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मांडले.क्रीडा भारतीच्यावतीने रेशीमबागच्या हेडगेवार स्मृती परिसरात नुकतेच विदर्भ स्तराच्या प्रांतीय आंतरशालेय घोषवादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. भागवत यांनी आपले विचार मांडले. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ता शरद बागडी, मेजर जनरल (निवृत्त) अच्युत देव, विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ. अनिल करवंदे, रा.स्व. संघाचे महानगर संचालक श्रीधरराव गाडगे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. भागवत पुढे म्हणाले, तुम्हाला सतत आत्मचिंतन करीत राहणे गरजेचे आहे. स्पर्धेत शक्ती आणि बुद्धी दोन्हीची आवश्यकता असते. आपसातील ताळमेळ साधणे व सूर जुळणे आवश्यक आहे. देशातील विविध जाती, धर्म, पंथांच्या नागरिकांनी आपसात सूर जुळवून सोबत चालणे गरजेचे असल्याचे मनोगत त्यांनी मांडले.यावेळी अध्यक्षीय भाषण करताना शरद बागडी म्हणाले, व्यक्तीपासून कुटुंब, कुटुंबापासून समाज आणि समाजामुळे देश निर्माण होतो. भारतीयांची समस्या ही आहे की येथे प्रत्येक व्यक्ती स्वत:ला १०० टक्के श्रेष्ठ मानते व इतरांना १०० टक्के चूक ठरविते. स्वत:ला सोडून इतरांना सुधारण्याचा प्रयत्न करते व यात देशावर, राजकारण्यांवर बोट ठेवून मोकळी होते. नागरिकांनी आत्मचिंतन करावे, स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्न केला तर देश आपोआप सुधारेल व प्रगती करेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मेजर अच्युत देव यांनीही आपले मनोगत मांडले.स्पर्धेमध्ये अंतिम टप्प्यात पाईपर, झांज व इतर दोन गटात चुरस होती. यापैकी भोसला मिलिटरी शाळेच्या पाईप बॅन्डला प्रथम तर याच शाळेच्या झांज बॅन्डला द्वितीय पुरस्कार मिळाला. दुसऱ्या गटात बी.आर. मुंडले प्रथम, लोकमान्य टिळक विद्यालय द्वितीय व तळोधीच्या जे.एन. विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकाविला. अकोल्याच्या के.जे.डी. प्लॅटिनम शाळेला प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आला. यावेळी अशोक दवंडे, विनय गाडगीळ, महेश घरोटे, सुधीर क्षीरसागर, मनीषा संत व कौस्तुभ लुले परीक्षक म्हणून उपस्थित होते. यानंतर ऋषिकेश लाखेने यांच्या बासुरीवर वंदेमातरमच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमात संघ कार्यवाह अरविंद कुकडे, सहकार्यवाह रवींद्र बोकरे, क्रीडाभारतीचे अ. भा. सहमंत्री प्रसन्न हरदास, संजय बाटवे, डॉ संजय खळतकर, प्रशांत पिंपळवार आदींचा सहभाग होता.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ