शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

स्वत:ला श्रेष्ठ मानून शिकणे थांबविले तर पतनाला सुरुवात : मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 01:09 IST

उत्तम होण्याची कोणती सीमा नसते. शिखरावर पोहचल्यानंतरही तेथे टिकून राहण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागतात. आपण आता श्रेष्ठ झालो आहोत आणि काही शिकण्याची व सुधारण्याची गरज नाही, असा विचार मनात आला तर त्याच क्षणी तुमची प्रगती थांबते आणि पतनाकडे वाटचाल सुरू होते, असे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मांडले.

ठळक मुद्देक्रीडा भारतीतर्फे घोषवादन स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उत्तम होण्याची कोणती सीमा नसते. शिखरावर पोहचल्यानंतरही तेथे टिकून राहण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागतात. आपण आता श्रेष्ठ झालो आहोत आणि काही शिकण्याची व सुधारण्याची गरज नाही, असा विचार मनात आला तर त्याच क्षणी तुमची प्रगती थांबते आणि पतनाकडे वाटचाल सुरू होते, असे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मांडले.क्रीडा भारतीच्यावतीने रेशीमबागच्या हेडगेवार स्मृती परिसरात नुकतेच विदर्भ स्तराच्या प्रांतीय आंतरशालेय घोषवादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. भागवत यांनी आपले विचार मांडले. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ता शरद बागडी, मेजर जनरल (निवृत्त) अच्युत देव, विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ. अनिल करवंदे, रा.स्व. संघाचे महानगर संचालक श्रीधरराव गाडगे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. भागवत पुढे म्हणाले, तुम्हाला सतत आत्मचिंतन करीत राहणे गरजेचे आहे. स्पर्धेत शक्ती आणि बुद्धी दोन्हीची आवश्यकता असते. आपसातील ताळमेळ साधणे व सूर जुळणे आवश्यक आहे. देशातील विविध जाती, धर्म, पंथांच्या नागरिकांनी आपसात सूर जुळवून सोबत चालणे गरजेचे असल्याचे मनोगत त्यांनी मांडले.यावेळी अध्यक्षीय भाषण करताना शरद बागडी म्हणाले, व्यक्तीपासून कुटुंब, कुटुंबापासून समाज आणि समाजामुळे देश निर्माण होतो. भारतीयांची समस्या ही आहे की येथे प्रत्येक व्यक्ती स्वत:ला १०० टक्के श्रेष्ठ मानते व इतरांना १०० टक्के चूक ठरविते. स्वत:ला सोडून इतरांना सुधारण्याचा प्रयत्न करते व यात देशावर, राजकारण्यांवर बोट ठेवून मोकळी होते. नागरिकांनी आत्मचिंतन करावे, स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्न केला तर देश आपोआप सुधारेल व प्रगती करेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मेजर अच्युत देव यांनीही आपले मनोगत मांडले.स्पर्धेमध्ये अंतिम टप्प्यात पाईपर, झांज व इतर दोन गटात चुरस होती. यापैकी भोसला मिलिटरी शाळेच्या पाईप बॅन्डला प्रथम तर याच शाळेच्या झांज बॅन्डला द्वितीय पुरस्कार मिळाला. दुसऱ्या गटात बी.आर. मुंडले प्रथम, लोकमान्य टिळक विद्यालय द्वितीय व तळोधीच्या जे.एन. विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकाविला. अकोल्याच्या के.जे.डी. प्लॅटिनम शाळेला प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आला. यावेळी अशोक दवंडे, विनय गाडगीळ, महेश घरोटे, सुधीर क्षीरसागर, मनीषा संत व कौस्तुभ लुले परीक्षक म्हणून उपस्थित होते. यानंतर ऋषिकेश लाखेने यांच्या बासुरीवर वंदेमातरमच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमात संघ कार्यवाह अरविंद कुकडे, सहकार्यवाह रवींद्र बोकरे, क्रीडाभारतीचे अ. भा. सहमंत्री प्रसन्न हरदास, संजय बाटवे, डॉ संजय खळतकर, प्रशांत पिंपळवार आदींचा सहभाग होता.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ