शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

७.५२ कोटींचा दंड भरा नाही तर लोकअदालतीला हजर व्हा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2023 19:05 IST

Nagpur News जानेवारी ते डिसेंबर २०२२ या १२ महिन्यांच्या कालावधीत नागपूर शहरात तब्बल ९ लाख ७३ हजार ९३९ वाहनचालकांना ई-चलान पाठविण्यात आले आहे. ई-चलान पाठविल्यानंतर ते न भरल्यास संबंधित वाहनचालकाला समन्स पाठविण्यात येत असून, त्यांना लोकअदालतीला हजर रहावे लागणार आहे.

ठळक मुद्देवर्षभरात ९ लाख ७३ हजार ९३९ वाहनचालकांना ई-चलान

दयानंद पाईकराव

नागपूर : वाहन चालविताना अनेकजण वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत नाहीत. सिग्नलवर वाहतूक पोलिस दिसला नाही की अनेकजण सिग्नल तोडून निघून जातात. अशा वाहनचालकांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून किंवा वाहतूक पोलिसांनी मोबाइलमध्ये घेतलेल्या छायाचित्राच्या माध्यमातून ई- चलान पाठविण्यात येते. जानेवारी ते डिसेंबर २०२२ या १२ महिन्यांच्या कालावधीत नागपूर शहरात तब्बल ९ लाख ७३ हजार ९३९ वाहनचालकांना ई-चलान पाठविण्यात आले आहे. ई-चलान पाठविल्यानंतर ते न भरल्यास संबंधित वाहनचालकाला समन्स पाठविण्यात येत असून, त्यांना लोकअदालतीला हजर रहावे लागणार आहे.

 

एकूण दंड ९.७३ कोटी, थकबाकी ७.५२ कोटी

-जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीत शहर वाहतूक पोलिसांनी ९ लाख ७३ हजार ९३९ वाहनचालकांना ई-चलान पाठविले आहे. यातील केवळ २ लाख २१ हजार १७८ वाहनचालकांनी हे ई-चलान भरले असून अद्यापही ७ लाख ५२ हजार ७६१ वाहनचालकांनी ई-चलान भरले नसल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

 

कुठे भराल दंड?

-वाहतूक पोलिसांनी ई-चलान पाठविल्यानंतर संबंधित वाहनचालक डिव्हाइस उपलब्ध असलेल्या वाहतूक पोलिसाकडे दंड भरू शकतात. दंड न भरलेल्या वाहनचालकांना न्यायालयात पाठविण्यात येते. असे वाहनचालक न्यायालयात दंड भरू शकतात. याशिवाय वाहतूक परिमंडळातही दंड भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

 

दंड न भरल्यास काय होणार?

-दंड न भरल्यास वाहनचालकांच्या नावे न्यायालयातून समन्स काढण्यात येतो. समन्स काढून दंड न भरलेल्या वाहनचालकांना लोकअदालतीला हजर राहण्याची नोटीस बजावण्यात येते. त्यामुळे संभाव्य कारवाई टाळण्यासाठी वाहनचालकांनी दंडाची रक्कम त्वरित भरणे गरजेचे आहे.

 

मुदतीत दंड भरून संभाव्य कारवाई टाळावी

‘वाहनचालकांना ई-चलानच्या माध्यमातून दंड आकारण्यात आल्यानंतर तो दंड मुदतीच्या आत भरणे आवश्यक आहे. दंड न भरणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येते. त्यामुळे दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी वाहनचालकांनी मुदतीच्या आत दंड भरणे आवश्यक आहे.’

-अमित डोळस, वाहतूक पोलिस निरीक्षक, सीताबर्डी

.............

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसtraffic policeवाहतूक पोलीस