शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

जल, जमीन, जंगल हे अर्थव्यवस्थेचे मुख्य स्राेत व्हावेत - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 11:13 IST

तेव्हाच वाढेल आदिवासी भागाचा सुखांक

नागपूर : जल, जमीन, जंगल व जनावर हे भारतीय अर्थव्यवस्थेचे मुख्य स्रोत झाल्यास या देशातील आदिवासींचा, वनवासींचा हॅप्पी ह्युमन इंडेक्स (सुखांक) वाढेल, असे मत केंद्रीय भूपृष्ट व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थाद्वारे संचालित एकलव्य एकल विद्यालयाच्या शिक्षक व पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ते उपस्थित होते. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून इंडिया टीव्हीचे प्रमुख रजत शर्मा व प्रमुख अतिथी म्हणून श्री देवनाथ पीठ अंजनगाव सुर्जीचे पीठाधिश्वर जितेंद्रनाथ महाराज उपस्थित होते. गेल्या २७ वर्षांपासून लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेद्वारे आदिवासी लोकांसाठी एकलव्य एकल विद्यालयाच्या माध्यमातून शिक्षणाचे कार्य सुरू आहे. त्याचबरोबर येथील नागरिकांमध्ये संस्कृती, देशभक्ती व स्वच्छतेचे धडेदेखील दिले जात आहे. आता या भागातील लोकांच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर आहे. आदिवासी भागातील सामाजिक, आर्थिक विषमता दूर करण्याचा प्रयत्न एकलव्य एकल स्कूलच्या माध्यमातून सुरू असल्याचे गडकरी म्हणाले. या प्रसंगी मानकर स्मृती संस्थेचे अध्यक्ष अरुण लखाणी, सचिव राजीव हडप आदी उपस्थित होते.

- एकलव्य विद्यालय म्हणजे आदिवासींची प्रकाश प्रेरणा

शिक्षण आणि संस्कार हे महादान आहे. हे आपल्या देशाच्या मातीत रुजलेले आहे. त्यामुळेच गरिबांना मोठे होण्याची संधी मिळते. २७ वर्षांपासून एकलव्य एकल विद्यालयाच्या माध्यमातून गरीब, अभावग्रस्त, आदिवासी भागात शिक्षण देण्याचे कार्य केले जात आहे. त्यामुळे एकलव्य विद्यालय हे आदिवासींची प्रकाश प्रेरणा ठरत असल्याची भावना इंडिया टीव्हीचे प्रमुख रजत शर्मा यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी