शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जल, जमीन, जंगल हे अर्थव्यवस्थेचे मुख्य स्राेत व्हावेत - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 11:13 IST

तेव्हाच वाढेल आदिवासी भागाचा सुखांक

नागपूर : जल, जमीन, जंगल व जनावर हे भारतीय अर्थव्यवस्थेचे मुख्य स्रोत झाल्यास या देशातील आदिवासींचा, वनवासींचा हॅप्पी ह्युमन इंडेक्स (सुखांक) वाढेल, असे मत केंद्रीय भूपृष्ट व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थाद्वारे संचालित एकलव्य एकल विद्यालयाच्या शिक्षक व पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ते उपस्थित होते. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून इंडिया टीव्हीचे प्रमुख रजत शर्मा व प्रमुख अतिथी म्हणून श्री देवनाथ पीठ अंजनगाव सुर्जीचे पीठाधिश्वर जितेंद्रनाथ महाराज उपस्थित होते. गेल्या २७ वर्षांपासून लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेद्वारे आदिवासी लोकांसाठी एकलव्य एकल विद्यालयाच्या माध्यमातून शिक्षणाचे कार्य सुरू आहे. त्याचबरोबर येथील नागरिकांमध्ये संस्कृती, देशभक्ती व स्वच्छतेचे धडेदेखील दिले जात आहे. आता या भागातील लोकांच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर आहे. आदिवासी भागातील सामाजिक, आर्थिक विषमता दूर करण्याचा प्रयत्न एकलव्य एकल स्कूलच्या माध्यमातून सुरू असल्याचे गडकरी म्हणाले. या प्रसंगी मानकर स्मृती संस्थेचे अध्यक्ष अरुण लखाणी, सचिव राजीव हडप आदी उपस्थित होते.

- एकलव्य विद्यालय म्हणजे आदिवासींची प्रकाश प्रेरणा

शिक्षण आणि संस्कार हे महादान आहे. हे आपल्या देशाच्या मातीत रुजलेले आहे. त्यामुळेच गरिबांना मोठे होण्याची संधी मिळते. २७ वर्षांपासून एकलव्य एकल विद्यालयाच्या माध्यमातून गरीब, अभावग्रस्त, आदिवासी भागात शिक्षण देण्याचे कार्य केले जात आहे. त्यामुळे एकलव्य विद्यालय हे आदिवासींची प्रकाश प्रेरणा ठरत असल्याची भावना इंडिया टीव्हीचे प्रमुख रजत शर्मा यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी