शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
4
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
5
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
6
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
7
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 
8
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
9
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
10
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
11
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
12
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
13
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
14
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
15
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
16
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
17
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
18
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
19
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
20
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!

ऐनवेळी तक्रार आली तर दखल घेणार नाही

By admin | Updated: September 29, 2016 02:31 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेला ५ आॅक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.

विद्यापीठाची महाविद्यालयांना सूचना : हिवाळी परीक्षांचे परीक्षा प्रवेशपत्र दोन आठवड्यांअगोदरच तयारनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेला ५ आॅक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. प्रवेशपत्रांवरून मागील वेळी झालेला गोंधळ लक्षात घेता यंदा दोन आठवड्यांअगोदरच परीक्षा प्रवेशपत्र महाविद्यालयांच्या ‘लॉगिन’वर पाठविण्यात आली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जर प्रवेशपत्रांबाबत काही तक्रारी असतील त्या अगोदरच विद्यापीठाच्या निदर्शनास आणून द्याव्यात. वेळेवर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, असे विद्यापीठाने महाविद्यालयांना बजाविले आहे.हिवाळी परीक्षांच्या पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने बीएसस्सी, एमए, एलएलबी, एमबीए, एमसीए, एमकॉम या विषयांच्या पुरवणी परीक्षांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यासाठी विद्यापीठाने अभ्यासक्रमनिहाय परीक्षा केंद्रांची यादी जाहीर केली आहे. विद्यापीठाने परीक्षा अर्ज दाखल करणे तसेच परीक्षा प्रवेशपत्रे जारी करणे ही प्रक्रिया ‘आॅनलाईन’ केली आहे. महाविद्यालयांचा हलगर्जीपणा, विद्यापीठातील तांत्रिक चुका इत्यादी कारणांमुळे मागील दोन परीक्षांपासून सातत्याने ऐनवेळी परीक्षा प्रवेशपत्रासाठी विद्यार्थ्यांना धावाधाव करावी लागली होती. अनेक महाविद्यालयांकडून तर ऐनवेळी ‘आॅफलाईन’ परीक्षा अर्ज सादर करण्यात आले होते. याचा फटका पुढे निकालांनादेखील बसला व ‘डाटा’चा गोंधळ झाल्याने काही जणांचे निकाल अनुपस्थित असे आले होते.ही सर्व बाब लक्षात घेऊन विद्यापीठाने यंदा अनेक महाविद्यालयांच्या ‘लॉगिन’वर विद्यार्थ्यांची परीक्षा प्रवेशपत्रे अगोदरच पाठविली आहेत. काही महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे १ ते २ दिवसांत ‘आॅनलाईन’च उपलब्ध होतील.जर विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रवेशपत्रात काही त्रुटी आढळल्या तर त्या महाविद्यालयांनी वेळीच विद्यापीठाला कळवाव्यात, असे परीक्षा नियंत्रक डॉ.नीरज खटी यांनी आवाहन केले आहे. परीक्षा प्रवेशपत्रे अगोदरच पाठविण्यात आली आहेत. त्यामुळे ऐन परीक्षेच्या अगोदर कुणी तक्रार घेऊन आले तर त्यावर कुठलीही कार्यवाही करण्यात येणार नाही. अशा परिस्थिती जर कुठला विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिला तर त्याची जबाबदारी ही महाविद्यालयाचे प्राचार्य व प्रशासनाची राहील, असेदेखील डॉ.खटी यांनी स्पष्ट केले आहे.(प्रतिनिधी)