शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
2
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
3
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
4
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
5
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
6
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
7
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
8
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
9
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
10
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
11
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
12
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
13
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
14
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
15
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
16
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
17
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
18
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
19
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
20
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व

ऐनवेळी तक्रार आली तर दखल घेणार नाही

By admin | Updated: September 29, 2016 02:31 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेला ५ आॅक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.

विद्यापीठाची महाविद्यालयांना सूचना : हिवाळी परीक्षांचे परीक्षा प्रवेशपत्र दोन आठवड्यांअगोदरच तयारनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेला ५ आॅक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. प्रवेशपत्रांवरून मागील वेळी झालेला गोंधळ लक्षात घेता यंदा दोन आठवड्यांअगोदरच परीक्षा प्रवेशपत्र महाविद्यालयांच्या ‘लॉगिन’वर पाठविण्यात आली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जर प्रवेशपत्रांबाबत काही तक्रारी असतील त्या अगोदरच विद्यापीठाच्या निदर्शनास आणून द्याव्यात. वेळेवर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, असे विद्यापीठाने महाविद्यालयांना बजाविले आहे.हिवाळी परीक्षांच्या पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने बीएसस्सी, एमए, एलएलबी, एमबीए, एमसीए, एमकॉम या विषयांच्या पुरवणी परीक्षांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यासाठी विद्यापीठाने अभ्यासक्रमनिहाय परीक्षा केंद्रांची यादी जाहीर केली आहे. विद्यापीठाने परीक्षा अर्ज दाखल करणे तसेच परीक्षा प्रवेशपत्रे जारी करणे ही प्रक्रिया ‘आॅनलाईन’ केली आहे. महाविद्यालयांचा हलगर्जीपणा, विद्यापीठातील तांत्रिक चुका इत्यादी कारणांमुळे मागील दोन परीक्षांपासून सातत्याने ऐनवेळी परीक्षा प्रवेशपत्रासाठी विद्यार्थ्यांना धावाधाव करावी लागली होती. अनेक महाविद्यालयांकडून तर ऐनवेळी ‘आॅफलाईन’ परीक्षा अर्ज सादर करण्यात आले होते. याचा फटका पुढे निकालांनादेखील बसला व ‘डाटा’चा गोंधळ झाल्याने काही जणांचे निकाल अनुपस्थित असे आले होते.ही सर्व बाब लक्षात घेऊन विद्यापीठाने यंदा अनेक महाविद्यालयांच्या ‘लॉगिन’वर विद्यार्थ्यांची परीक्षा प्रवेशपत्रे अगोदरच पाठविली आहेत. काही महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे १ ते २ दिवसांत ‘आॅनलाईन’च उपलब्ध होतील.जर विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रवेशपत्रात काही त्रुटी आढळल्या तर त्या महाविद्यालयांनी वेळीच विद्यापीठाला कळवाव्यात, असे परीक्षा नियंत्रक डॉ.नीरज खटी यांनी आवाहन केले आहे. परीक्षा प्रवेशपत्रे अगोदरच पाठविण्यात आली आहेत. त्यामुळे ऐन परीक्षेच्या अगोदर कुणी तक्रार घेऊन आले तर त्यावर कुठलीही कार्यवाही करण्यात येणार नाही. अशा परिस्थिती जर कुठला विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिला तर त्याची जबाबदारी ही महाविद्यालयाचे प्राचार्य व प्रशासनाची राहील, असेदेखील डॉ.खटी यांनी स्पष्ट केले आहे.(प्रतिनिधी)