शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
2
“वाह फडणवीस वाह, एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार”
3
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
4
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
5
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
6
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
7
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
8
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
9
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
10
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
11
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
12
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
13
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
14
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
15
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
16
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
17
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
18
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
19
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
20
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण

तूर वाळतेय तर चणा पिवळा पडतोय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:22 IST

सौरभ ढोरे काटोल : अति पावसामुळे खरीप हंगामात काटोल तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आता ढगाळ वातावरण व पहाटे ...

सौरभ ढोरे

काटोल : अति पावसामुळे खरीप हंगामात काटोल तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आता ढगाळ वातावरण व पहाटे पडणाऱ्या धुक्क्याचा फटका रबी पिकांना बसतो आहे. तालुक्यात बहुतांश भागात तुरीचे पीक सोकाटल्याचे दिसून येत आहे. रबी हंगामातील चणा पिकावरही याचा परिणाम दिसून येत आहे. चणा पीक पिवळे पडायला लागले आहे. यासोबतच भाजीपाल्यावर वातावरणीय बदलाचा फटका बसताना दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत काटोल तालुक्यात यंदा खरीपाचे क्षेत्र अधिक होते. अतिवृष्टीने मात्र सर्वत्र नुकसान झाले. हंगामातील शेवटचे पीक तूर तारेल अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र तसे होताना दिसत नाही. तालुक्यात ५,६३६ हेक्टर क्षेत्रात तूरीची लागवड करण्यात आली होती. मात्र जमिनीतील अति ओलाव्यामुळे तूरीने पाहिजे तसा जोम धरला नाही. काही ठिकाणी उशिरा लागवड करण्यात आलेल्या क्षेत्रात आता ढगाळ वातावरणाचा फटका बसतो आहे. यंदा तालुक्यात १३,७४२ हेक्टरमध्ये रबीचा पेरा झाला आहे. यात गहू ७५७५ हेक्टर, हरभरा ५७०५ हेक्टर तर मका १२३ हेक्टर क्षेत्रात आहे. भाजीपाल्याची लागवड ३३८ हेक्टरमध्ये करण्यात आली आहे. यातील हरभरा (चणा) पिकावर ढगाळ वातावरणामुळे घाटे अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. पहाटेच्या धुक्यामुळे चणा पिवळट पडायला लागला आहे.

कीटनाशकाची फवारणी करा

काही भागातील तूर आता कापून बाजूला झाली आहे. मात्र ज्यांचे पेरे उशिरा झाले त्या पिकांना वातवरणीय बदलाचा फटका बसत आहे. अशी स्थितीवर तुरीवर उपाय शक्य नाही. चण्यावर ढगाळ वातावरणाने व धुक्यामुळे घाटे अळी दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टेजवर असल्याचे समजते . त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच पिकावर कीटकनाशक फवारणी करावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले.