शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तूर वाळतेय तर चणा पिवळा पडतोय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:22 IST

सौरभ ढोरे काटोल : अति पावसामुळे खरीप हंगामात काटोल तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आता ढगाळ वातावरण व पहाटे ...

सौरभ ढोरे

काटोल : अति पावसामुळे खरीप हंगामात काटोल तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आता ढगाळ वातावरण व पहाटे पडणाऱ्या धुक्क्याचा फटका रबी पिकांना बसतो आहे. तालुक्यात बहुतांश भागात तुरीचे पीक सोकाटल्याचे दिसून येत आहे. रबी हंगामातील चणा पिकावरही याचा परिणाम दिसून येत आहे. चणा पीक पिवळे पडायला लागले आहे. यासोबतच भाजीपाल्यावर वातावरणीय बदलाचा फटका बसताना दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत काटोल तालुक्यात यंदा खरीपाचे क्षेत्र अधिक होते. अतिवृष्टीने मात्र सर्वत्र नुकसान झाले. हंगामातील शेवटचे पीक तूर तारेल अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र तसे होताना दिसत नाही. तालुक्यात ५,६३६ हेक्टर क्षेत्रात तूरीची लागवड करण्यात आली होती. मात्र जमिनीतील अति ओलाव्यामुळे तूरीने पाहिजे तसा जोम धरला नाही. काही ठिकाणी उशिरा लागवड करण्यात आलेल्या क्षेत्रात आता ढगाळ वातावरणाचा फटका बसतो आहे. यंदा तालुक्यात १३,७४२ हेक्टरमध्ये रबीचा पेरा झाला आहे. यात गहू ७५७५ हेक्टर, हरभरा ५७०५ हेक्टर तर मका १२३ हेक्टर क्षेत्रात आहे. भाजीपाल्याची लागवड ३३८ हेक्टरमध्ये करण्यात आली आहे. यातील हरभरा (चणा) पिकावर ढगाळ वातावरणामुळे घाटे अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. पहाटेच्या धुक्यामुळे चणा पिवळट पडायला लागला आहे.

कीटनाशकाची फवारणी करा

काही भागातील तूर आता कापून बाजूला झाली आहे. मात्र ज्यांचे पेरे उशिरा झाले त्या पिकांना वातवरणीय बदलाचा फटका बसत आहे. अशी स्थितीवर तुरीवर उपाय शक्य नाही. चण्यावर ढगाळ वातावरणाने व धुक्यामुळे घाटे अळी दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टेजवर असल्याचे समजते . त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच पिकावर कीटकनाशक फवारणी करावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले.