शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हनुमान चालिसा पठणासाठी माझ्या घरी यावे, बावनकुळेंचे शिवसैनिकांना आमत्रंण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2022 10:48 IST

हनुमान चालिसा पठणासाठी शिवसेनेने माझ्या घरी यावे, मी त्यांना विरोध न करता त्यांचे स्वागतच करीन असे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.  

नागपूर : 'मातोश्री'वर हनुमान चालिसा पठण करण्याची भूमिका राणा दाम्पत्याने घेतली होती. मात्र बराच गदारोळ झाल्यानंतर त्यांनी आपली भूमिका मागे घेतली. अखेर राजद्रोहाचा गुन्हा नोंदवून खार पोलिसांनी त्यांना अटक केली. या प्रकरणाच्या विरोधात राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे. हनुमान चालिसा पठणासाठी शिवसेनेने माझ्या घरी यावे, मी त्यांना विरोध न करता त्यांचे स्वागतच करीन असे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.  

भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आणि राणा दाम्पत्याच्या विरोधातील कारवाईचा निषेध व्यक्त करताना आ. चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. शिवसेनेला राणा दाम्पत्याचा इतका विरोध करण्याचे काहीच कारण नव्हते. हनुमान चालिसा म्हणण्यासाठी त्यांच्यासाठी तंबू बांधला असता, चहापाण्याची अन् प्रसादाची व्यवस्था केली असती तरी पुरे झाले असते असे मत आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. 

माझ्या घरी जर कुणी हनुमान चालिसा पठणासाठी आले तर त्यांना मी टाळ मृदंग देईल, लाडवाचा प्रसाद आणि जेवणाची सोय करील असे आ. बावनकुळे म्हणाले.  हनुमान चालिसा पठणात राजकीय पक्ष महत्वाचा नाही. सत्ताधारी असो वा विरोधी पक्ष. दोन्ही कार्यकर्त्यांचे माझ्याघरी स्वागतच होते. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी माझ्या घरी हनुमान चालिसा पठणासाठी जरूर यावे, माझ्या घरात त्यांचे आदरतिथ्य होईल असेही आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

किरीट सोमय्या यांच्या हल्ल्यामागे मुंबई पोलीस  

किरीट सोमय्या यांना झेड सुरक्षा असताना त्यांच्यावर दगडफेक होते हे बरे नाही. त्यांच्यावरील हल्लेखोरांना पोलिसांचा अलिखित पाठींबा मिळतो आहे. महाविकास आघाडी सरकार ब्रिटिशांपेक्षा अधिक जुलमी सरकार असून प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाShiv Senaशिवसेना