शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

रेशनिंग व्यवस्था ठप्प झाल्यास राज्यात हाहाकार होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:29 IST

राज्यातील स्वस्त धान्य व केरोसीन दुकानदार संघटनांनी १ एप्रिलपासून माल न भरण्याचा व वितरित न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेशनिंग व्यवस्था ठप्प पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास राज्यात हाहाकार निर्माण होईल. अशी भीती माजी मंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देअनिल देशमुख : अनेक योजना बंद करण्यावर व्यक्त केली नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: राज्यातील स्वस्त धान्य व केरोसीन दुकानदार संघटनांनी १ एप्रिलपासून माल न भरण्याचा व वितरित न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेशनिंग व्यवस्था ठप्प पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास राज्यात हाहाकार निर्माण होईल. अशी भीती माजी मंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली आहे.राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या नियंत्रणाखाली राज्यातील रेशनिंग व्यवस्था राबविण्यात येते. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये मी स्वत: या खात्याचा मंत्री होतो. राज्यातील गरजू व गरीब रेशनकार्ड धारक लोकांना सवलतीच्या दरात अन्नधान्य वितरण करण्याची व्यवस्था स्वस्त धान्य दुकानांमार्फत पुरवठा विभागामार्फत राबविली जाते. आघाडी सरकारच्या काळात कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानांमार्फत स्वस्त अन्नधान्याचे वाटप करण्यात येत होते. मात्र भाजपा युतीची सत्ता येताच पुरवठा विभागाच्या अनेक योजना तात्काळ बंद करण्यात आल्यात. त्यात आमच्या आघाडी सरकारच्या काळातील कार्ड धारकांना दिले जाणारे धान्य बंद करण्यात आले. रेशनवर मिळणारी साखरही बंद करण्यात आली अंत्योदयचा धान्य कोटा कमी केला. तसेच टप्प्याटप्प्याने गोरगरिबांना देण्यात येणारे केरोसीन सुध्दा बंद करीत आहे. अशाप्रकारे गोरगरिबांच्या तोंडचा घासच या सरकारने हिसकावला असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे.राज्यातील स्वस्त धान्य व केरोसीन दुकानदार संघटनांनी १ एप्रिलपासून माल न भरण्याचा व वितरित न करण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील गोरगरीब रेशनकार्डधारकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे सरकारने संघटनासोबत बरोबर चर्चा करून त्यांच्या न्याय मागण्या मान्य करून त्वरित तोडगा काढणे गरजेचे असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखfoodअन्न