शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

राणा तलवार घेऊन आले तर मी फुले घेऊन जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2022 19:58 IST

Nagpur News जर राणा तलवार घेऊन आले तर मी फुले घेऊन जाईन, असे प्रतिपादन कडू यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते प्रसारमाध्यमांशी गुरुवारी बोलत होते.

ठळक मुद्दे वादाचा विषय संपल्याचा दावा

नागपूर : आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद आठवड्याभरापासून गाजतो आहे. बच्चू कडू यांनी त्यांच्याकडून वादाचा विषय संपल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे यापुढे वादाचा विषय काढणार नाही. आम्ही एक तारखेपर्यंत मागितलेले पुरावे आले नाही. त्यामुळे माझ्याकडून वादाचा विषय संपला आहे, तरी जर राणा तलवार घेऊन आले तर मी फुले घेऊन जाईन, असे प्रतिपादन कडू यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते प्रसारमाध्यमांशी गुरुवारी बोलत होते.

अमरावती येथे आयोजित सभेत मी कुठेही वाईट वक्तव्य केले नाही. सार्वजनिक आणि सामान्य माणसांसाठी बोललो. रवी राणा दोन पावले मागे गेले तर मी चार पावले माघार घेईन, असेही म्हणालो. बच्चू कडू आता चौथ्या वर्गातील विद्यार्थी नाही. माझेही वय ५१ झाले आहे. राणा यांनीही दिलगिरी व्यक्त केली असून मीदेखील आभार मानले आहेत. आठ दिवस झाले तोच तो विषय सुरू आहे. आम्ही नाही थांबविला तर प्रसारमाध्यमांनी तो थांबवावा, असे कडू म्हणाले.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू