शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणावरील स्थगनादेश दूर न झाल्यास पावले उचलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मराठा आरक्षणाच्या प्रकरणी देशात विचित्र स्थिती सुरू आहे. इडब्लूएस आरक्षण २६ राज्ये आणि दोन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मराठा आरक्षणाच्या प्रकरणी देशात विचित्र स्थिती सुरू आहे. इडब्लूएस आरक्षण २६ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशात लागू आहे. मात्र, ते ५० टक्क्यांपुढचे आहे. तेलंगणा, तामिळनाडूतही ५० टक्क्यांवर सुरू आहे. महाराष्ट्रात फक्त २ टक्के मराठा आरक्षण सुरू असताना चुुकीच्या पाश्वभूमीवर स्थगिती मिळाल्याचा आमचा आरोप आहे. मराठा आरक्षणावरील स्थगिती दूर न झाल्यास ५० टक्क्यांच्या आत आरक्षण मिळण्यासाठी पावले उचलावी लागतील, असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंडरे यांनी दिला आहे.

महासंघाच्या बैठकीसाठी नागपुरात आले असता ते ‘लोकमत’शी बोलत होते. ते म्हणाले, राज्याने स्थगिती उठविणे अभिप्रेत आहे. ती अधिक लांबल्यास मराठा आरक्षण पुढचे १५ ते २० वर्षे लटकू शकते. २०१८ मध्ये न्या. गायकवाड कमिशनचा अहवाल राज्य सरकारला मिळाला, अधिसूचना झाली. याची मुदत २०२८पर्यंत असल्याने सर्वोच्च न्यायालयात लवकर निर्णय झाला नाही तर मराठा समाजाला अन्याकारक ठरेल. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने थोडे ऐतिहासिक पाऊल उचलावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

केंद्र सरकार सध्याच्या २७ टक्के आरक्षणाचे त्रिभाजन करणार आहे. त्यात अती मागास, मागास आणि आणि व्यावसायिक दृष्ट्या मागास असे विभाजन करेल. राज्यात एकूण ओबीसी लोकसंख्या ३२ टक्के आहे. व्हजेएनटी ११ टक्के, एसबीसीला २ टक्के आणि उरलेल्या १९ टक्क्यात ओबीसीला आरक्षण आहे. या १९ टक्क्यात १२ बलुतेदारांना स्थान नाही. त्यांना लाभ देण्यासाठी धनगर, वंजारीची वेगळी कॅटागिरी केली, त्या धर्तीवर १२ बलुतेदारांची वेगळी वर्गवारी तयार करावी,

त्या धर्तीवर ५० टक्क्यांच्या आत मराठा समाजाला पुरेसे प्रतिनिधीत्व देण्यासाठी सब कॅटॅगिरी करून वेगळे आरक्षण देण्यात यावे, असे मत त्यांनी मांडले.

स्थगिती न उठल्यास व तामिळनाडू केसला टॅग झाल्यास मराठा आरक्षणासाठी आऊट ऑफ कोर्ट महाराष्ट्र राज्य विधिमंडळ ठराव करून नियमित तरतुुदीनुसार मराठा समाजाला ५० टक्के आरक्षण देऊ शकते. लोकसंख्येनुसार मराठा समाजाची लोकसंख्या ३० टक्केपेक्षा जास्त असल्याने धोरणात्मक निर्णय म्हणून या समाजातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी ५० टक्क्यात स्पेस तयार करावी, असे मराठा समाजाचे सरकारला आवाहन आहे.

...

वडेट्टीवारांचे विधान धक्कादायक

मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अखत्यारीत न्या. गायकवाड कमिशन येतो. मात्र, हे कमिशनच बोगस असल्याचे धक्कादायक विधान नागपुरात केले. मराठा आरक्षणाचा मूळ पायाचा न्या. गायकवाड कमिशन आहे. हा अहवाल चांगला आहे, हे सांगण्यासाठी राज्य सरकारची उपसमिती एकीकडे प्रयत्न करीत असताना याच खात्याचे मंत्री विरोधाभासी विधान करतात. यामुळे मराठा आरक्षण एका बाजूने जगवायचे, दुसऱ्या बाजूने घालवायचे असेच दिसते.

...