शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

होम क्वारंटाईन बाहेर निघाले तर गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 21:18 IST

होम क्वारंटाईनमध्ये असलेले लोक बिनधास्तपणे घराबाहेर फिरत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार संबंधिताच्या कुटुंबासाठीच नव्हे तर नागरिकांसाठीही धोकादायक आहे. तेव्हा अशा लोकांविरुद्ध कडक कारवाईची गरज आहे. होम क्वारंटाईन असलेली मंडळी घराबाहेर निघाली तर गुन्हे दाखल करा, अशी मागणी पुढे आली आहे.

ठळक मुद्देबिनधास्त फिरताहेत घराबाहेर : चोवीस तासानंतर नागपूर प्रशासनाने घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून विदेशातून प्रवास करून आलेल्यांना ‘होम क्वारंटाईन’( घरीच एकटे ) राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशा लोकांना कुठल्याही परिस्थितीत घरातील एका खोलीत स्वत:ला एकटे करून घ्यायचे आहे. कुटुंबातील इतर सदस्यांच्या संपर्कात यायचे नाही. अशा लोकांवर प्रशासन व पोलीस विभागाचे लक्ष असल्याचा दावा केला जात आहे, परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे. होम क्वारंटाईनमध्ये असलेले लोक बिनधास्तपणे घराबाहेर फिरत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार संबंधिताच्या कुटुंबासाठीच नव्हे तर नागरिकांसाठीही धोकादायक आहे. तेव्हा अशा लोकांविरुद्ध कडक कारवाईची गरज आहे. होम क्वारंटाईन असलेली मंडळी घराबाहेर निघाली तर गुन्हे दाखल करा, अशी मागणी पुढे आली आहे.खामला परिसरातील एका सोसायटीमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. अमेरिकेवरून एक व्यक्ती प्रवास करून आला आहे. त्याला प्रशासनाने होम क्वारंटाईन केले आहे. परंतु तो बुधवारी बिनधास्तपणे घराबाहेर फिरत असल्याचे परिसरातील लोकांना दिसून आले. लोकांनी यासंदर्भात मनपा, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिसांशी संपर्क साधला. परंतु कुणीही दखल घेतली नाही. वारंवार फोन करूनही नियंत्रण कक्षातून त्यांना टाळाटाळीचे उत्तर दिले जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. अखेर आज शुक्रवारी पोलीस सतर्क झाले. ते होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तीच्या घरी पोहोचले. संबंधिताला घरीच राहण्याची सक्त ताकीद दिली. तसेच यानंतर हा व्यक्ती घराबाहेर दिसला तर त्याचे फोटो काढून पाठवा, अशा सूचनाही केल्या.विशेष म्हणजे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावर अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. आतापर्यंत ९०१ लोकांना होम क्वारंटाईनमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे. लॉकडाऊन व कर्फ्यू लावण्यात आला आहे. नागरिकांना घरीच राहण्यास सांगितले आहे. पोलीस कठोर कारवाईसुद्धा करीत आहेत. अशा परिस्थितीत होम क्वारंटाईन व्यक्ती अशाप्रकारे बिनधास्त फिरतो आणि तक्रार केल्यानंतरही कारवाई होण्यास २४ तास लागत असतील तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होतात. ज्या खामला परिसरातील ही घटना आहे त्याच परिसरात कोरोना पॉझिटिव्ह असलेले लोकही आढळून आले आहेत. तेव्हा ही बाब आणखीनच गंभीर ठरते.... तर अशांची नावेच प्रसिद्ध कराकोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, म्हणून शासन प्रशासन विविध उपाययोजना करीत आहेत. सध्या शहरात ९०१ लोकांना होम क्वॉरंटाईन आहेत. प्रशासनाने आतापर्यंत परिस्थिती चांगली नियंत्रणात ठेवली आहे. परंतु होम क्वॉरंटाईन असलेली मंडळी दिशा-निर्देशांचे पालन करीत नसतील. बिनधास्तपणे घराबाहेर फिरत असतील तर ते त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर सर्वांसाठीच धोकायदाय आहे. आतापर्यंत प्रशासनाने माणुसकी म्हणून अशा लोकांची ओळख पटू नये, याची काळजी घेतली. त्यांची नावे जाहीर केली नाही. परंतु हा प्रकार थांबला नाही, तर नागरिकांच्या हितासाठी प्रशासनाने अशा होम क्वॉरंटाईन लोकांच्या नावाची यादीच प्रसिद्ध करावी, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर