शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

गांधी अडले असते तर फाळणी झाली नसती : इंद्रेशकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 22:27 IST

महात्मा गांधी झुकले म्हणून देशाचे तुकडे झाले. ते अडून राहिले असते तर देशाची फाळणी झाली नसती. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्या स्वातंत्र्य उत्सवात देशातील एकाही क्रांतिकारकांच्या कुटुंबाला सहभागी करून घेण्यात आले नाही. देशासाठी बलिदान देणाऱ्यांचा त्या उत्सवात सहभाग नव्हता. कारण देशभक्त स्वातंत्र्यासाठी लढले होते. विभाजनासाठी नाही. १९४७ मध्ये देशाचे अवैध विभाजन झाले. तेव्हापासून सीमेवर शांती नाही, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेशकुमार यांनी केली.

ठळक मुद्देदहा वर्षात लाहोर, रावळपिंडीत घर खरेदी करता येईल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महात्मा गांधी झुकले म्हणून देशाचे तुकडे झाले. ते अडून राहिले असते तर देशाची फाळणी झाली नसती. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्या स्वातंत्र्य उत्सवात देशातील एकाही क्रांतिकारकांच्या कुटुंबाला सहभागी करून घेण्यात आले नाही. देशासाठी बलिदान देणाऱ्यांचा त्या उत्सवात सहभाग नव्हता. कारण देशभक्त स्वातंत्र्यासाठी लढले होते. विभाजनासाठी नाही. १९४७ मध्ये देशाचे अवैध विभाजन झाले. तेव्हापासून सीमेवर शांती नाही, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेशकुमार यांनी केली.गोकुळपेठ येथील हेडगेवार ब्लड बँकेच्या सभागृहात ‘देशातील सध्याची स्थिती’ या विषयावर इंद्रेशकुमार यांनी मत मांडले. या वेळी भारत-तिबेट सहयोग मंचचे प्रा. विजय केवलरामानी, हेडगेवार ब्लड बँकेचे सचिव अशोक पत्की, अ. भा. मुस्लीम मंचचे विराग पाचपोर उपस्थित होते. यावेळी इंद्रेशकुमार म्हणाले, जम्मू काश्मीरमध्ये भाजपाने बलिदान दिले. देशाच्या सुरक्षेसाठी सैन्याला मोकळीक देऊन पाकिस्तानला एक ठोस संदेश दिला. आता भारताने पाकिस्तानला चार पर्याय दिले आहेत. कोणता पर्याय ठीक वाटतो हे त्याला ठरवायचे आहे. पण आपले सैन्य दाखवित असलेले शौर्य पाहता पुढील दहा वर्षात भारतीयांना लाहोर, रावळपिंडीतही घर, मालमत्ता खरेदी करण्याची संधी आहे, असा इशाराही इंद्रेशकुमार यांनी पाकिस्तानला दिला.२०१४ नंतर एक नवा भारत जन्माला आला आहे. आपण ५५ वर्षे देश लुटणाºयांना संधी दिली. तर पुढील २० वर्षे देश घडविणाऱ्यांना संधी देऊ शकत नाही का, असा सवालही त्यांनी केला. अमेरिकेसारख्या देशाचे स्वत:चे चरित्र नाही व तो देश आम्हाला चारित्र्याचे प्रमाणपत्र वाटत फिरत आहे. भोगवादी मूल्य बाळगणारे आम्हाला नैतिकतेचे पाठ शिकवित आहेत. त्यांच्या प्रमाणपत्राची आम्हाला गरज नाही, असेही त्यांनी सुनावले.आपल्यातील संवाद संपला आहेएका धर्माचा दुसऱ्या धर्माशी संवाद संपला आहे. त्या त्या धर्मात अंतर्गत संवादही होताना दिसत नाही. जाती-जातींमध्येही संवाद होत नाही. जेथे संवादाचा अभाव असतो तेथे अशांती व मतभेद वाढतात. संवादहिनता किंवा संवादातील कट्टरता दिसून येते. आम्हाला दंगे, हिंसाचाराचा देश नको आहे. प्रेमाचा देश हवा आहे. त्यासाठी सर्वांनीच आपली जबाबजारी पार पाडणे आवश्यक आहे, असेही इंद्रेशकुमार म्हणाले.हास्ययोगातून मनप्रसन्नतेचे धडे इंद्रेशकुमार यांनी भाषणाच्या सुरुवातीला उपस्थितांकडून हास्ययोग करवून घेत मनप्रसन्नतेचे धडे दिले. यानंतर सर्व धर्मांचे मंत्र म्हणलायला लावत सर्वधर्मसमभाव जपण्याचे आवाहन केले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMahatma Gandhiमहात्मा गांधी