शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

गांधी अडले असते तर फाळणी झाली नसती : इंद्रेशकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 22:27 IST

महात्मा गांधी झुकले म्हणून देशाचे तुकडे झाले. ते अडून राहिले असते तर देशाची फाळणी झाली नसती. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्या स्वातंत्र्य उत्सवात देशातील एकाही क्रांतिकारकांच्या कुटुंबाला सहभागी करून घेण्यात आले नाही. देशासाठी बलिदान देणाऱ्यांचा त्या उत्सवात सहभाग नव्हता. कारण देशभक्त स्वातंत्र्यासाठी लढले होते. विभाजनासाठी नाही. १९४७ मध्ये देशाचे अवैध विभाजन झाले. तेव्हापासून सीमेवर शांती नाही, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेशकुमार यांनी केली.

ठळक मुद्देदहा वर्षात लाहोर, रावळपिंडीत घर खरेदी करता येईल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महात्मा गांधी झुकले म्हणून देशाचे तुकडे झाले. ते अडून राहिले असते तर देशाची फाळणी झाली नसती. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्या स्वातंत्र्य उत्सवात देशातील एकाही क्रांतिकारकांच्या कुटुंबाला सहभागी करून घेण्यात आले नाही. देशासाठी बलिदान देणाऱ्यांचा त्या उत्सवात सहभाग नव्हता. कारण देशभक्त स्वातंत्र्यासाठी लढले होते. विभाजनासाठी नाही. १९४७ मध्ये देशाचे अवैध विभाजन झाले. तेव्हापासून सीमेवर शांती नाही, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेशकुमार यांनी केली.गोकुळपेठ येथील हेडगेवार ब्लड बँकेच्या सभागृहात ‘देशातील सध्याची स्थिती’ या विषयावर इंद्रेशकुमार यांनी मत मांडले. या वेळी भारत-तिबेट सहयोग मंचचे प्रा. विजय केवलरामानी, हेडगेवार ब्लड बँकेचे सचिव अशोक पत्की, अ. भा. मुस्लीम मंचचे विराग पाचपोर उपस्थित होते. यावेळी इंद्रेशकुमार म्हणाले, जम्मू काश्मीरमध्ये भाजपाने बलिदान दिले. देशाच्या सुरक्षेसाठी सैन्याला मोकळीक देऊन पाकिस्तानला एक ठोस संदेश दिला. आता भारताने पाकिस्तानला चार पर्याय दिले आहेत. कोणता पर्याय ठीक वाटतो हे त्याला ठरवायचे आहे. पण आपले सैन्य दाखवित असलेले शौर्य पाहता पुढील दहा वर्षात भारतीयांना लाहोर, रावळपिंडीतही घर, मालमत्ता खरेदी करण्याची संधी आहे, असा इशाराही इंद्रेशकुमार यांनी पाकिस्तानला दिला.२०१४ नंतर एक नवा भारत जन्माला आला आहे. आपण ५५ वर्षे देश लुटणाºयांना संधी दिली. तर पुढील २० वर्षे देश घडविणाऱ्यांना संधी देऊ शकत नाही का, असा सवालही त्यांनी केला. अमेरिकेसारख्या देशाचे स्वत:चे चरित्र नाही व तो देश आम्हाला चारित्र्याचे प्रमाणपत्र वाटत फिरत आहे. भोगवादी मूल्य बाळगणारे आम्हाला नैतिकतेचे पाठ शिकवित आहेत. त्यांच्या प्रमाणपत्राची आम्हाला गरज नाही, असेही त्यांनी सुनावले.आपल्यातील संवाद संपला आहेएका धर्माचा दुसऱ्या धर्माशी संवाद संपला आहे. त्या त्या धर्मात अंतर्गत संवादही होताना दिसत नाही. जाती-जातींमध्येही संवाद होत नाही. जेथे संवादाचा अभाव असतो तेथे अशांती व मतभेद वाढतात. संवादहिनता किंवा संवादातील कट्टरता दिसून येते. आम्हाला दंगे, हिंसाचाराचा देश नको आहे. प्रेमाचा देश हवा आहे. त्यासाठी सर्वांनीच आपली जबाबजारी पार पाडणे आवश्यक आहे, असेही इंद्रेशकुमार म्हणाले.हास्ययोगातून मनप्रसन्नतेचे धडे इंद्रेशकुमार यांनी भाषणाच्या सुरुवातीला उपस्थितांकडून हास्ययोग करवून घेत मनप्रसन्नतेचे धडे दिले. यानंतर सर्व धर्मांचे मंत्र म्हणलायला लावत सर्वधर्मसमभाव जपण्याचे आवाहन केले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMahatma Gandhiमहात्मा गांधी