शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हा केला नाही तर, भीती कशाची? हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 23:25 IST

High Court slapped petitionersसंशयास्पद मृत्यू प्रकरणाच्या चौकशीकरिता पोलीस वारंवार घरी येऊन विचारपूस करीत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करणाऱ्यांना फटकारण्यात आले.

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : संशयास्पद मृत्यू प्रकरणाच्या चौकशीकरिता पोलीस वारंवार घरी येऊन विचारपूस करीत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात याचिका दाखल करणाऱ्यांना फटकारण्यात आले. तुम्ही गुन्हा केला नाही तर भीती कशाची, असा सवाल न्यायालयाने त्यांना विचारला. तसेच, ५०० रुपये दावा खर्च बसवून त्यांची याचिका फेटाळून लावली.

याचिकेवर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांमध्ये वैशाली सुरेश मस्के व इतर चार जणांचा समावेश होता. वैशाली यांचे पती सुरेश विठोबा मस्के यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. त्याची चौकशी करण्यासाठी पोलीस वारंवार घरी येतात. सारखी विचारपूस करून मनस्ताप देतात. त्यामुळे मूलभूत अधिकारांची पायमल्ली होत आहे. पोलिसांची कृती अवैध असून त्यांना असे करण्यापासून थांबविण्यात यावे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. त्यावर सरकारने स्वत:ची बाजू मांडताना याचिकाकर्त्यांच्या बेकायदेशीर कृतीकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. याचिकाकर्ते पोलिसांना बयान देण्यास नकार देत आहेत. ते चौकशीकरिता योग्य सहकार्य करीत नाही, असे न्यायालयाला सांगण्यात आले. न्यायालयाने ही बाब अतिशय गंभीरतेने घेतली. पोलिसांवर अविश्वास दाखविण्याचे काहीच कारण दिसत नाही. याचिकाकर्त्यांनी पोलिसांना योग्य सहकार्य केले पाहिजे. याचिकाकर्त्यांना या प्रकरणात त्यांची काहीच भूमिका नाही असे वाटते तर, कुणाचीही भीती बाळगण्याचे कारण नाही. ही याचिका दाखल केल्यामुळे प्रकरणाची गुंतागुंत पुन्हा वाढली आहे. याचिकाकर्त्यांवरील संशय पुन्हा गाढ झाला आहे, असे न्यायालयाने याचिका फेटाळताना नमूद केले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर