शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

गुन्हा केला नाही तर, भीती कशाची? हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 23:25 IST

High Court slapped petitionersसंशयास्पद मृत्यू प्रकरणाच्या चौकशीकरिता पोलीस वारंवार घरी येऊन विचारपूस करीत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करणाऱ्यांना फटकारण्यात आले.

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : संशयास्पद मृत्यू प्रकरणाच्या चौकशीकरिता पोलीस वारंवार घरी येऊन विचारपूस करीत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात याचिका दाखल करणाऱ्यांना फटकारण्यात आले. तुम्ही गुन्हा केला नाही तर भीती कशाची, असा सवाल न्यायालयाने त्यांना विचारला. तसेच, ५०० रुपये दावा खर्च बसवून त्यांची याचिका फेटाळून लावली.

याचिकेवर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांमध्ये वैशाली सुरेश मस्के व इतर चार जणांचा समावेश होता. वैशाली यांचे पती सुरेश विठोबा मस्के यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. त्याची चौकशी करण्यासाठी पोलीस वारंवार घरी येतात. सारखी विचारपूस करून मनस्ताप देतात. त्यामुळे मूलभूत अधिकारांची पायमल्ली होत आहे. पोलिसांची कृती अवैध असून त्यांना असे करण्यापासून थांबविण्यात यावे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. त्यावर सरकारने स्वत:ची बाजू मांडताना याचिकाकर्त्यांच्या बेकायदेशीर कृतीकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. याचिकाकर्ते पोलिसांना बयान देण्यास नकार देत आहेत. ते चौकशीकरिता योग्य सहकार्य करीत नाही, असे न्यायालयाला सांगण्यात आले. न्यायालयाने ही बाब अतिशय गंभीरतेने घेतली. पोलिसांवर अविश्वास दाखविण्याचे काहीच कारण दिसत नाही. याचिकाकर्त्यांनी पोलिसांना योग्य सहकार्य केले पाहिजे. याचिकाकर्त्यांना या प्रकरणात त्यांची काहीच भूमिका नाही असे वाटते तर, कुणाचीही भीती बाळगण्याचे कारण नाही. ही याचिका दाखल केल्यामुळे प्रकरणाची गुंतागुंत पुन्हा वाढली आहे. याचिकाकर्त्यांवरील संशय पुन्हा गाढ झाला आहे, असे न्यायालयाने याचिका फेटाळताना नमूद केले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर