शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची इतकी भीती तर मार्चमध्ये संमेलन कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:24 IST

- संजय नहार यांचे कौतिकरावांना प्रत्युत्तर - तुमच्या विचारण्यातच नकार होता, हे स्पष्ट करा प्रवीण खापरे / लोकमत न्यूज ...

- संजय नहार यांचे कौतिकरावांना प्रत्युत्तर

- तुमच्या विचारण्यातच नकार होता, हे स्पष्ट करा

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष ज्या प्रकारे कोरोनाची भीती व्यक्त करत आहेत, ते योग्य आहे. मात्र, या भयात विरोधाभास प्रकर्षाने जाणवतो आहे. इतकीच धास्ती आहे तर मग मार्च महिन्यातच संमेलन घेण्याचा अट्टहास का, असे प्रत्युत्तर सरहद्द संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी दिले आहे.

कोरोनाच्या दीर्घ काळानंतर जानेवारीच्या पहिल्याच रविवारी पार पडलेल्या महामंडळाच्या बैठकीपूर्वी अध्यक्षांकरवी दुसऱ्याच कुणी सदस्याने दिल्लीत ३० मार्च २०२१च्या पूर्वी संमेलन घेऊ शकता का, असा प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात महामंडळ अध्यक्षांना कोरोनाची जी भीती आहे, तीच व्यक्त करत १ मे ही तारीख स्पष्ट केली होती. मात्र, त्यांचे नाशिक हे आधीच निश्चित झाले होते, हे त्या नंतरच्या घडामोडीवरून स्पष्ट व्हायला लागले आहे.

दिल्लीमध्ये संमेलन घेण्यामागची भूमिका महाराष्ट्राबाहेर असलेल्या मराठी माणसांना मराठीशी जोडण्याची आहे. महाराष्ट्राबाहेरही मराठी माणूस दुसऱ्या परिसरातल्या माणसांशी बोलत नाही. संमेलनाच्या माध्यमातून पारंपरिक सख्य निर्माण करणे शक्य होणार आहे. त्यामुळे संमेलन दिल्लीत घेण्याची आमची तयारी असल्याचे नहार म्हणाले.

मराठी माणसाची फाळणी करू नका

मोदी-गडकरी यांना खूश करण्यासाठी हे प्रयत्न असल्याचा आरोप करणे म्हणजे मराठी माणसांत दुही निर्माण करण्यासारखेच आहे, असे संजय नहार कौतिकराव ठाले-पाटील यांनी लावलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना ‘लोकमत’शी बोलत होते. गडकरी असो वा पवार हे पक्षीय, वैचारिकदृष्ट्या वेगळे असले तरी सर्वप्रथम ते मराठी आहेत. सगळ्यांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी हा प्रयत्न आहे. मात्र, ‘खूश करण्यासाठी’ची भाषा वापरून महामंडळ अध्यक्षांनी मराठी अस्मितेची फाळणीच केली आहे, असा टोला नहार यांनी लावला.

मराठी साहित्य देशाचा-जगाचा विचार करते

दिल्लीत ज्या प्रकारे इतर भाषिक साहित्य संमेलने केवळ त्यांच्या भाषा आणि क्षेत्रापुरता विचार करतात त्या प्रकारे मराठी साहित्य नाही. मराठी साहित्य संमेलनात देशाचा, जगाचा विचार केला जातो. त्याचमुळे महाराष्ट्र स्थापनेच्या हीरक महोत्सवाप्रीत्यर्थ ९४वे साहित्य संमेलन दिल्लीत व्हावे, अशी बहुसंख्याकांची इच्छा असल्याचे नहार म्हणाले.