शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

दोषी असल्यास टालाटुलेवर कारवाई व्हावी

By admin | Updated: March 9, 2016 03:26 IST

वर्धा जिल्ह्यातील सुमारे ४०० शेतकऱ्यांचे आठ कोटी रुपये थकविणाऱ्या सुनील टालाटुले प्रकरणातील वादावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रथमच प्रत्युत्तर दिले आहे.

संघाचे आरोपांवर प्रत्युत्तर : काँग्रेसकडून राजकारण करण्यात येत असल्याची टीकानागपूर : वर्धा जिल्ह्यातील सुमारे ४०० शेतकऱ्यांचे आठ कोटी रुपये थकविणाऱ्या सुनील टालाटुले प्रकरणातील वादावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रथमच प्रत्युत्तर दिले आहे. सुनील टालाटुले यांनी शेतकऱ्यांशी केलेले आर्थिक व्यवहार हे वैयक्तिक आहेत. टालाटुले जर दोषी असेल तर कायद्यानुसार कारवाई व्हायलाच हवी, असे संघाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणात संघावर चिखलफेक करून काँग्रेसने विकृत राजकारण केले असल्याची टीका महानगर संघचालक राजेश लोया यांनी केली आहे.सुनील टालाटुले नावाचा हा कापूस व्यापारी गेल्या अनेक वर्षांपासून वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करत आहे. त्याने ४०० शेतकऱ्यांचे आठ कोटीहून अधिक रुपये थकविले. यामुळे शेतकऱ्यांनी वर्धा जिल्ह्यातील सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. टालाटुले हा संघाचा स्वयंसेवक असल्यामुळे शेतकऱ्यांनी संघावर नाराजी व्यक्त केली होती व २८ फेब्रुवारी रोजी संघ मुख्यालयासमोर आंदोलनाचा प्रयत्न केला होता. ‘भारतीय किसान खेत मजदूर काँग्रेस’ या नावाखाली संविधान चौकात शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे.टालाटुलेंवरून काँग्रेसने केलेल्या आंदोलनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रथमच प्रत्त्युत्तर देण्यात आले आहे. टालाटुलेचे संघाशी संबंध जोडून संघ मुख्यालयावर मोर्चा, उपोषण आणि पदाधिकाऱ्यांवर आरोप लावणे चुकीचे आहे. भारतीय किसान खेत मजदूर काँग्रेसच्या नावावर काँग्रेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बदनाम करत असल्याचा आरोप प्रसिद्ध पत्रकातून महानगर संघचालक राजेश लोया यांनी केला आहे.काँग्रेसची ही जुनी मानसिकता या आरोपातून प्रतित होत असल्याचा टोलाही लगावण्यात आला आहे. काँग्रेसचे हे आंदोलन संघाला बदनाम करणारे असून यावेळी स्वयंसेवकांनी संयम राखण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)