शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

गाडीला बीएस-६ मानक, तर पीयूसीची गरज कशाला? केंद्र शासनाने निर्णय घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 13:30 IST

PUC Nagpur News वाहनांमध्ये पर्यावरण अनुकूल इंजिन बसविण्यात आले आहे. असे असतानादेखील या वाहनांसाठी पर्यावरण नियंत्रण प्रमाणपत्रांची (पीयूसी) सक्ती का? असा सवाल उभा राहिला आहे.

ठळक मुद्देचालान कापल्याने चालकांना त्रासकंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पर्यावरण अनुकूल वाहने बाजारात आली असून केंद्र सरकारने बीएस-४ ला हटवून थेट बीएस-६ वाहनांना मान्यता दिली आहे. या वाहनांमध्ये पर्यावरण अनुकूल इंजिन बसविण्यात आले आहे. असे असतानादेखील या वाहनांसाठी पर्यावरण नियंत्रण प्रमाणपत्रांची (पीयूसी) सक्ती का? असा सवाल या निमित्ताने उभा राहिला आहे.अ.भा. ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत सचिव गजानन पांडे म्हणाले, देशात दाखल झालेली बीएस-६ वाहने पर्यावरणपूरक आहेत. यामुळेच दुचाकी वाहनांची किंमत ८ ते १० हजार आणि चारचाकी वाहनांची किंमत २० ते ३० हजार रुपयांपर्यंत वाढली आहे. खरेदी करताना ग्राहकांना ही जास्त किंमत मोजावी लागत आहे. या वाहनांमुळे प्रदूषण होत नाही, अशी मान्यता आहे. कंपन्यांनी ही वाहने उपलब्ध करून दिली आहे. जेव्हा या गाड्यांमुळे वातावरणात प्रदूषण होतच नसेल तर चालकांवर पीयूसीची सक्ती करू नये. केंद्र सरकारने या संदर्भात अध्यादेश काढून ग्राहकांना दिलासा द्यावा.बीएस-६ वाहनचालकांकडे पीयूसी प्रमाणपत्र नसल्याने वाहतूक पोलीस चालान कापून थेट ५०० रुपयांची पावती फाडतात. त्यामुळे ग्राहकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागतो. आता बीएस-४ मानक वाहनांची विक्री बंद झाली आहे. या वाहनांसाठी पीयूसी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. त्याकरिता सेंटरवर ग्राहकाला १०० रुपयांपर्यंत खर्च येतो. बीएस-६ वाहनांसाठी पीयूसीची सक्ती करू नये, असे पांडे म्हणाले. जर या वाहनातून निघणाऱ्या धूरामुळे प्रदूषण होत असेल तर शासनाने ऑटोमोबाईल कंपन्यांवर कारवाई करावी. ग्राहकांना अनावश्यक पीयूसीची सक्ती करून त्यांच्या खिशातून रक्कम शासनाने काढू नये. शासनाने ऑटोमोबाईल कंपन्यांच्या बनावटीवर विश्वास ठेवून पीयूसी प्रमाणपत्राची अट काढावी. जर पेट्रोल आणि डिझेलमुळे प्रदूषण होत असेल तर इंधन कंपन्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी पांडे यांनी केली आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषण