शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

गाडीला बीएस-६ मानक, तर पीयूसीची गरज कशाला? केंद्र शासनाने निर्णय घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 13:30 IST

PUC Nagpur News वाहनांमध्ये पर्यावरण अनुकूल इंजिन बसविण्यात आले आहे. असे असतानादेखील या वाहनांसाठी पर्यावरण नियंत्रण प्रमाणपत्रांची (पीयूसी) सक्ती का? असा सवाल उभा राहिला आहे.

ठळक मुद्देचालान कापल्याने चालकांना त्रासकंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पर्यावरण अनुकूल वाहने बाजारात आली असून केंद्र सरकारने बीएस-४ ला हटवून थेट बीएस-६ वाहनांना मान्यता दिली आहे. या वाहनांमध्ये पर्यावरण अनुकूल इंजिन बसविण्यात आले आहे. असे असतानादेखील या वाहनांसाठी पर्यावरण नियंत्रण प्रमाणपत्रांची (पीयूसी) सक्ती का? असा सवाल या निमित्ताने उभा राहिला आहे.अ.भा. ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत सचिव गजानन पांडे म्हणाले, देशात दाखल झालेली बीएस-६ वाहने पर्यावरणपूरक आहेत. यामुळेच दुचाकी वाहनांची किंमत ८ ते १० हजार आणि चारचाकी वाहनांची किंमत २० ते ३० हजार रुपयांपर्यंत वाढली आहे. खरेदी करताना ग्राहकांना ही जास्त किंमत मोजावी लागत आहे. या वाहनांमुळे प्रदूषण होत नाही, अशी मान्यता आहे. कंपन्यांनी ही वाहने उपलब्ध करून दिली आहे. जेव्हा या गाड्यांमुळे वातावरणात प्रदूषण होतच नसेल तर चालकांवर पीयूसीची सक्ती करू नये. केंद्र सरकारने या संदर्भात अध्यादेश काढून ग्राहकांना दिलासा द्यावा.बीएस-६ वाहनचालकांकडे पीयूसी प्रमाणपत्र नसल्याने वाहतूक पोलीस चालान कापून थेट ५०० रुपयांची पावती फाडतात. त्यामुळे ग्राहकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागतो. आता बीएस-४ मानक वाहनांची विक्री बंद झाली आहे. या वाहनांसाठी पीयूसी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. त्याकरिता सेंटरवर ग्राहकाला १०० रुपयांपर्यंत खर्च येतो. बीएस-६ वाहनांसाठी पीयूसीची सक्ती करू नये, असे पांडे म्हणाले. जर या वाहनातून निघणाऱ्या धूरामुळे प्रदूषण होत असेल तर शासनाने ऑटोमोबाईल कंपन्यांवर कारवाई करावी. ग्राहकांना अनावश्यक पीयूसीची सक्ती करून त्यांच्या खिशातून रक्कम शासनाने काढू नये. शासनाने ऑटोमोबाईल कंपन्यांच्या बनावटीवर विश्वास ठेवून पीयूसी प्रमाणपत्राची अट काढावी. जर पेट्रोल आणि डिझेलमुळे प्रदूषण होत असेल तर इंधन कंपन्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी पांडे यांनी केली आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषण