शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

आंबेडकरवादी गाफिल राहिले तर मोठे संकट

By admin | Updated: March 19, 2017 03:06 IST

प्रतिगामी व्यक्तींनी देश काबीज केला असतानाही आंबेडकरवादी गाफिल राहिल्यास दलित-शोषित समाजावर मोठे संकट ओढवणार आहे,

 भाऊ लोखंडे : ‘आंबेडकरी समाजाचे राजकीय अस्तित्व’ विषयावर चर्चासत्र नागपूर : प्रतिगामी व्यक्तींनी देश काबीज केला असतानाही आंबेडकरवादी गाफिल राहिल्यास दलित-शोषित समाजावर मोठे संकट ओढवणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांनी केले. समता सैनिक दल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशन व मार्गदाता प्रकाशक समूह यांच्यावतीने ‘आंबेडकरी समाजाचे राजकीय अस्तित्व’ या विषयावर लष्करीबाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशन सभागृह येथे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल वासनिक, अ‍ॅड. हंसराज भांगे वक्ते होते. मार्गदाता पत्रिकेचे संपादक दिलेश मेश्राम अध्यक्षस्थानी होते. डॉ. आंबेडकर मिशनचे अध्यक्ष श्रीधर मेश्राम, समता सैनिक दलाचे जी. वासुदेवन व्यासपीठावर होते. डॉ. भाऊ लोखंडे म्हणाले, आंबेडकरी समाज राजकारणात शून्य झाला आहे. केंद्रापासून राज्य आणि अगदी स्थानिक पातळीवरही तो शक्तिहीन झाला असून राजकीय नेत्यांच्या चुकांचा हा परिणाम आहे. त्यामुळे समाज दिशाहीन होत गेला आहे. देशाची सत्ता प्रतिगामी शक्तींनी काबीज केल्यानंतर आरक्षण व्यवस्था संपविण्यात व पुढे संविधान बदलण्याचे षड्यंत्र ते रचत आहेत. हे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी आंबेडकरी समाजाने एकजूट करून संघर्ष उभारण्याची गरज आहे. समाज वेळीच सावध न झाल्यास भविष्य कठीण आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. अनिल वासनिक यांनी आंबेडकरी समाजाच्या राजकीय स्थितीवर अभ्यासपूर्ण विवेचन सादर केले. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वरज्य संस्थांच्या निवडणुकीतील दारुण पराभवाची मीमांसा त्यांनी यावेळी केली. अपेक्षित राजकीय यश न मिळण्यास एकतेचा अभाव असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जी. वासुदेवन यांनी संचालन केले. यावेळी राहुल दहिकर, के.जी. पाटील, मिलिंद फुलझेले, मधुकर बोरीकर, दिनेश खोब्रागडे, चंदू लाऊत्रे, बी.टी. वाहाणे, दिगंबर चनकापुरे, अरुण गायकवाड, धम्मपाल वंजारी, रत्नाकर मेश्राम उपस्थित होते. (प्रतिनिधी) संघटित व्हा अ‍ॅड. हंसराज भांगे यांनी आंबेडकरी चळवळीचा इतिहास सांगून रिपब्लिकन पक्षाचा उदय आणि अस्ताची सविस्तर माहिती दिली. आंबेडकरी समाज राजकीयदृष्ट्या संघटित झाल्याशिवाय कोणतेही प्रश्न सुटू शकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच दिलेश मेश्राम यांनी अध्यक्षीय भाषणात कार्यकर्त्यांनी गटबाजी सोडून नागरिकांना राजकारणाचे व संघटनांचे महत्त्व समजावून सांगण्याचे आवाहन केले.