शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आंबेडकरवादी गाफिल राहिले तर मोठे संकट

By admin | Updated: March 19, 2017 03:06 IST

प्रतिगामी व्यक्तींनी देश काबीज केला असतानाही आंबेडकरवादी गाफिल राहिल्यास दलित-शोषित समाजावर मोठे संकट ओढवणार आहे,

 भाऊ लोखंडे : ‘आंबेडकरी समाजाचे राजकीय अस्तित्व’ विषयावर चर्चासत्र नागपूर : प्रतिगामी व्यक्तींनी देश काबीज केला असतानाही आंबेडकरवादी गाफिल राहिल्यास दलित-शोषित समाजावर मोठे संकट ओढवणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांनी केले. समता सैनिक दल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशन व मार्गदाता प्रकाशक समूह यांच्यावतीने ‘आंबेडकरी समाजाचे राजकीय अस्तित्व’ या विषयावर लष्करीबाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशन सभागृह येथे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल वासनिक, अ‍ॅड. हंसराज भांगे वक्ते होते. मार्गदाता पत्रिकेचे संपादक दिलेश मेश्राम अध्यक्षस्थानी होते. डॉ. आंबेडकर मिशनचे अध्यक्ष श्रीधर मेश्राम, समता सैनिक दलाचे जी. वासुदेवन व्यासपीठावर होते. डॉ. भाऊ लोखंडे म्हणाले, आंबेडकरी समाज राजकारणात शून्य झाला आहे. केंद्रापासून राज्य आणि अगदी स्थानिक पातळीवरही तो शक्तिहीन झाला असून राजकीय नेत्यांच्या चुकांचा हा परिणाम आहे. त्यामुळे समाज दिशाहीन होत गेला आहे. देशाची सत्ता प्रतिगामी शक्तींनी काबीज केल्यानंतर आरक्षण व्यवस्था संपविण्यात व पुढे संविधान बदलण्याचे षड्यंत्र ते रचत आहेत. हे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी आंबेडकरी समाजाने एकजूट करून संघर्ष उभारण्याची गरज आहे. समाज वेळीच सावध न झाल्यास भविष्य कठीण आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. अनिल वासनिक यांनी आंबेडकरी समाजाच्या राजकीय स्थितीवर अभ्यासपूर्ण विवेचन सादर केले. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वरज्य संस्थांच्या निवडणुकीतील दारुण पराभवाची मीमांसा त्यांनी यावेळी केली. अपेक्षित राजकीय यश न मिळण्यास एकतेचा अभाव असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जी. वासुदेवन यांनी संचालन केले. यावेळी राहुल दहिकर, के.जी. पाटील, मिलिंद फुलझेले, मधुकर बोरीकर, दिनेश खोब्रागडे, चंदू लाऊत्रे, बी.टी. वाहाणे, दिगंबर चनकापुरे, अरुण गायकवाड, धम्मपाल वंजारी, रत्नाकर मेश्राम उपस्थित होते. (प्रतिनिधी) संघटित व्हा अ‍ॅड. हंसराज भांगे यांनी आंबेडकरी चळवळीचा इतिहास सांगून रिपब्लिकन पक्षाचा उदय आणि अस्ताची सविस्तर माहिती दिली. आंबेडकरी समाज राजकीयदृष्ट्या संघटित झाल्याशिवाय कोणतेही प्रश्न सुटू शकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच दिलेश मेश्राम यांनी अध्यक्षीय भाषणात कार्यकर्त्यांनी गटबाजी सोडून नागरिकांना राजकारणाचे व संघटनांचे महत्त्व समजावून सांगण्याचे आवाहन केले.