शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

भूमिपुत्रांना रोजगार न देणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 12:55 IST

काही उद्योग भूमिपुत्रांना नोकरी देण्याचे बंधन पाळत नाहीत. त्यांच्यावर कारवाई करुन त्यांचा परतावाच बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

ठळक मुद्दे विदर्भात खनिजावर आधारित उद्योग सुरूकरण्याचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याच्या कुठल्याही भागात उद्योग आल्यानंतर ८० टक्के रोजगार स्थानिक युवकांनाच मिळावा, असे राज्य शासनाचे धोरण आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती देखरेखदेखील करते. मात्र काही उद्योग भूमिपुत्रांना नोकरी देण्याचे बंधन पाळत नाहीत. त्यांच्यावर कारवाई करुन त्यांचा परतावाच बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. नागपुरात रविवारी बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याच्या उद्घाटनानंतर त्यांनी पत्रपरिषदेत ही महिती दिली.पूर्वी खनिकर्मावर आधारित प्रक्रिया उद्योग वीज दर कमी असल्यामुळे इतर राज्यांमध्ये स्थापन करण्यात येत होते. परंतु आता खनिकर्मावर प्रक्रिया करणारे उद्योग त्या स्थानिक भागातच निर्माण करुन तेथील स्थानिकांना रोजगार प्राप्त करुन देता येऊ शकतो.विदर्भात मुबलक खनिजे उपलब्ध आहेत. विदर्भात खनिजावर आधारित उद्योग सुरु व्हावेत यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न सुरू आहे. यासंदर्भात ९ फेब्रुवारी रोजी नागपुरात राष्ट्रीय खनिज परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहतील, असे देसाई यांनी सांगितले.औद्योगिक गुंतवणुकीसाठी राज्यात पोषक वातावरण निर्मिती झाली आहे. देशात सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे. शिवाय वीज दर कमी झाल्यामुळे नवीन उद्योग महाराष्ट्रात येत आहेत. विदर्भदेखील उद्योगक्षेत्रात भरारी घेत आहे, असे त्यांनी सांगितले.यावेळी खा.कृपाल तुमाने, महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाचे अध्यक्ष आशिष जयस्वाल हेदेखील उपस्थित होते.

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाई