शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

भूमिपुत्रांना रोजगार न देणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 12:55 IST

काही उद्योग भूमिपुत्रांना नोकरी देण्याचे बंधन पाळत नाहीत. त्यांच्यावर कारवाई करुन त्यांचा परतावाच बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

ठळक मुद्दे विदर्भात खनिजावर आधारित उद्योग सुरूकरण्याचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याच्या कुठल्याही भागात उद्योग आल्यानंतर ८० टक्के रोजगार स्थानिक युवकांनाच मिळावा, असे राज्य शासनाचे धोरण आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती देखरेखदेखील करते. मात्र काही उद्योग भूमिपुत्रांना नोकरी देण्याचे बंधन पाळत नाहीत. त्यांच्यावर कारवाई करुन त्यांचा परतावाच बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. नागपुरात रविवारी बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याच्या उद्घाटनानंतर त्यांनी पत्रपरिषदेत ही महिती दिली.पूर्वी खनिकर्मावर आधारित प्रक्रिया उद्योग वीज दर कमी असल्यामुळे इतर राज्यांमध्ये स्थापन करण्यात येत होते. परंतु आता खनिकर्मावर प्रक्रिया करणारे उद्योग त्या स्थानिक भागातच निर्माण करुन तेथील स्थानिकांना रोजगार प्राप्त करुन देता येऊ शकतो.विदर्भात मुबलक खनिजे उपलब्ध आहेत. विदर्भात खनिजावर आधारित उद्योग सुरु व्हावेत यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न सुरू आहे. यासंदर्भात ९ फेब्रुवारी रोजी नागपुरात राष्ट्रीय खनिज परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहतील, असे देसाई यांनी सांगितले.औद्योगिक गुंतवणुकीसाठी राज्यात पोषक वातावरण निर्मिती झाली आहे. देशात सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे. शिवाय वीज दर कमी झाल्यामुळे नवीन उद्योग महाराष्ट्रात येत आहेत. विदर्भदेखील उद्योगक्षेत्रात भरारी घेत आहे, असे त्यांनी सांगितले.यावेळी खा.कृपाल तुमाने, महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाचे अध्यक्ष आशिष जयस्वाल हेदेखील उपस्थित होते.

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाई