शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरी संत्रा, माेसंबी निर्यातीचा मार्ग प्रशस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2021 13:16 IST

अपेडा आणि भारतीय कृषी संशाेधन परिषद-केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशाेधन संस्था नागपूर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे नागपुरी संत्रा व माेसंबीच्या दर्जेदार उत्पादनासाेबतच या दाेन्ही फळांच्या निर्यातीचा मार्ग आणखी प्रशस्त झाला आहे.

ठळक मुद्देदिलीप घाेष : अपेडा व केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशाेधन केंद्र यांच्यात सामंजस्य करार

लाेकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लिंबूवर्गीय फळांची निर्यात व त्यांचे मूल्यवर्धन करण्यासाठी अपेडा (कृषी व प्रक्रिया खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण) आणि भारतीय कृषी संशाेधन परिषद-केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशाेधन संस्था नागपूर (आयसीएआर-सीसीआरआय) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे नागपुरी संत्रा व माेसंबीच्या दर्जेदार उत्पादनासाेबतच या दाेन्ही फळांच्या निर्यातीचा मार्ग आणखी प्रशस्त झाला आहे, अशी माहिती ‘आयसीएआर-सीसीआरआय’चे संचालक डाॅ. दिलीप घाेष यांनी दिली.

संत्रा व माेसंबीच्या दर्जेदार उत्पादन व निर्यातीसाठी लिंबूवर्गीय मूल्यवर्धन, तंत्रज्ञान विकास व प्रसाराची आवश्यकता आहे. निर्यात वाढविण्यासाठी संशाेधन व तंत्रज्ञान विकसित करावे लागणार आहे. या फळांच्या मूल्यवर्धित उत्पादनासाठी विशेष कार्यक्रम राबविला जाईल. त्यातून प्रशिक्षण दिले जाईल. निर्यातीसाठी फळांची मानक पद्धती (एसओपी) विकसित केली जाईल. फळ ताेडणीपूर्वी व ताेडणीनंतरचे व्यवस्थापन, विषाक्त अवशेष नियंत्रण, ताेडणीनंतरचे अंतर, फळ टिकण्याचा काळ या बाबींवर प्राधान्याने काम केले जाणार आहे, असेही डाॅ. दिलीप घाेष यांनी सांगितले.

संत्रा उत्पादक जिल्ह्यांमध्ये सक्रिय शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने स्थानिक पातळीवर निर्यातीभिमुख विस्तार कार्यक्रम राबविला जाईल. यातून टिकाऊ मूल्य साखळी तयार केली जाईल. चांगल्या मालवाहतुकीला तसेच सेंद्रिय संत्रा व माेसंबी उत्पादनाला प्राेत्साहन दिले जाईल. कीड व राेग नियंत्रणासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचेही ‘आयसीएआर-सीसीआरआय’चे संचालक डाॅ. दिलीप घाेष यांनी सांगितले.

करारातील उद्दिष्टे

या दाेन्ही संस्थांच्या संयुक्त सहभागाने नागपुरी संत्रा व माेसंबी जागतिक बाजाराशी जाेडली जाईल. त्यातून निर्यात बास्केट, वाहतूक व दर्जेदार उत्पादनास मदत हाेईल. जागतिक पातळीवर ‘ब्रँड इंडिया’ स्थापन करून उच्च दर्जाच्या संत्रा व माेसंबीचे उत्पादन करून निर्यात वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. संत्रा व माेसंबीच्या बाजाराचा विकास, स्थानिक वैशिष्ट्यपूर्णता, ब्रँडिंग, पॅकिंग, बाजार व व्यापार काैशल्य, दर्जेदार उत्पादन, व्यापार व निर्यातीला प्राेत्साहन देण्यासाठी शेतकरी, उद्याेजक, निर्यातदार व इतर भागधारकांचे काैशल्य व क्षमता वाढविणे, शेतकरी उत्पादन कंपन्यांना (एफपीसी) प्राेत्साहन देणे, त्यांना जागतिक बाजाराशी जाेडणे, तंत्रज्ञान विकसित करणे, हस्तांतरण व तांत्रिक काैशल्य वाढविणे, प्रयाेगशाळांचे बळकटीकरण करणे, आयात करणाऱ्या देशांच्या गरजेनुसार चाचण्यांची साेय करून त्यावर विशेष भर दिला जाईल, असेही डाॅ. दिलीप घाेष यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेती