शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

नागपुरी संत्रा, माेसंबी निर्यातीचा मार्ग प्रशस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2021 13:16 IST

अपेडा आणि भारतीय कृषी संशाेधन परिषद-केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशाेधन संस्था नागपूर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे नागपुरी संत्रा व माेसंबीच्या दर्जेदार उत्पादनासाेबतच या दाेन्ही फळांच्या निर्यातीचा मार्ग आणखी प्रशस्त झाला आहे.

ठळक मुद्देदिलीप घाेष : अपेडा व केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशाेधन केंद्र यांच्यात सामंजस्य करार

लाेकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लिंबूवर्गीय फळांची निर्यात व त्यांचे मूल्यवर्धन करण्यासाठी अपेडा (कृषी व प्रक्रिया खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण) आणि भारतीय कृषी संशाेधन परिषद-केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशाेधन संस्था नागपूर (आयसीएआर-सीसीआरआय) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे नागपुरी संत्रा व माेसंबीच्या दर्जेदार उत्पादनासाेबतच या दाेन्ही फळांच्या निर्यातीचा मार्ग आणखी प्रशस्त झाला आहे, अशी माहिती ‘आयसीएआर-सीसीआरआय’चे संचालक डाॅ. दिलीप घाेष यांनी दिली.

संत्रा व माेसंबीच्या दर्जेदार उत्पादन व निर्यातीसाठी लिंबूवर्गीय मूल्यवर्धन, तंत्रज्ञान विकास व प्रसाराची आवश्यकता आहे. निर्यात वाढविण्यासाठी संशाेधन व तंत्रज्ञान विकसित करावे लागणार आहे. या फळांच्या मूल्यवर्धित उत्पादनासाठी विशेष कार्यक्रम राबविला जाईल. त्यातून प्रशिक्षण दिले जाईल. निर्यातीसाठी फळांची मानक पद्धती (एसओपी) विकसित केली जाईल. फळ ताेडणीपूर्वी व ताेडणीनंतरचे व्यवस्थापन, विषाक्त अवशेष नियंत्रण, ताेडणीनंतरचे अंतर, फळ टिकण्याचा काळ या बाबींवर प्राधान्याने काम केले जाणार आहे, असेही डाॅ. दिलीप घाेष यांनी सांगितले.

संत्रा उत्पादक जिल्ह्यांमध्ये सक्रिय शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने स्थानिक पातळीवर निर्यातीभिमुख विस्तार कार्यक्रम राबविला जाईल. यातून टिकाऊ मूल्य साखळी तयार केली जाईल. चांगल्या मालवाहतुकीला तसेच सेंद्रिय संत्रा व माेसंबी उत्पादनाला प्राेत्साहन दिले जाईल. कीड व राेग नियंत्रणासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचेही ‘आयसीएआर-सीसीआरआय’चे संचालक डाॅ. दिलीप घाेष यांनी सांगितले.

करारातील उद्दिष्टे

या दाेन्ही संस्थांच्या संयुक्त सहभागाने नागपुरी संत्रा व माेसंबी जागतिक बाजाराशी जाेडली जाईल. त्यातून निर्यात बास्केट, वाहतूक व दर्जेदार उत्पादनास मदत हाेईल. जागतिक पातळीवर ‘ब्रँड इंडिया’ स्थापन करून उच्च दर्जाच्या संत्रा व माेसंबीचे उत्पादन करून निर्यात वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. संत्रा व माेसंबीच्या बाजाराचा विकास, स्थानिक वैशिष्ट्यपूर्णता, ब्रँडिंग, पॅकिंग, बाजार व व्यापार काैशल्य, दर्जेदार उत्पादन, व्यापार व निर्यातीला प्राेत्साहन देण्यासाठी शेतकरी, उद्याेजक, निर्यातदार व इतर भागधारकांचे काैशल्य व क्षमता वाढविणे, शेतकरी उत्पादन कंपन्यांना (एफपीसी) प्राेत्साहन देणे, त्यांना जागतिक बाजाराशी जाेडणे, तंत्रज्ञान विकसित करणे, हस्तांतरण व तांत्रिक काैशल्य वाढविणे, प्रयाेगशाळांचे बळकटीकरण करणे, आयात करणाऱ्या देशांच्या गरजेनुसार चाचण्यांची साेय करून त्यावर विशेष भर दिला जाईल, असेही डाॅ. दिलीप घाेष यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेती