शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

नागपुरी संत्रा, माेसंबी निर्यातीचा मार्ग प्रशस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2021 13:16 IST

अपेडा आणि भारतीय कृषी संशाेधन परिषद-केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशाेधन संस्था नागपूर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे नागपुरी संत्रा व माेसंबीच्या दर्जेदार उत्पादनासाेबतच या दाेन्ही फळांच्या निर्यातीचा मार्ग आणखी प्रशस्त झाला आहे.

ठळक मुद्देदिलीप घाेष : अपेडा व केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशाेधन केंद्र यांच्यात सामंजस्य करार

लाेकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लिंबूवर्गीय फळांची निर्यात व त्यांचे मूल्यवर्धन करण्यासाठी अपेडा (कृषी व प्रक्रिया खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण) आणि भारतीय कृषी संशाेधन परिषद-केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशाेधन संस्था नागपूर (आयसीएआर-सीसीआरआय) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे नागपुरी संत्रा व माेसंबीच्या दर्जेदार उत्पादनासाेबतच या दाेन्ही फळांच्या निर्यातीचा मार्ग आणखी प्रशस्त झाला आहे, अशी माहिती ‘आयसीएआर-सीसीआरआय’चे संचालक डाॅ. दिलीप घाेष यांनी दिली.

संत्रा व माेसंबीच्या दर्जेदार उत्पादन व निर्यातीसाठी लिंबूवर्गीय मूल्यवर्धन, तंत्रज्ञान विकास व प्रसाराची आवश्यकता आहे. निर्यात वाढविण्यासाठी संशाेधन व तंत्रज्ञान विकसित करावे लागणार आहे. या फळांच्या मूल्यवर्धित उत्पादनासाठी विशेष कार्यक्रम राबविला जाईल. त्यातून प्रशिक्षण दिले जाईल. निर्यातीसाठी फळांची मानक पद्धती (एसओपी) विकसित केली जाईल. फळ ताेडणीपूर्वी व ताेडणीनंतरचे व्यवस्थापन, विषाक्त अवशेष नियंत्रण, ताेडणीनंतरचे अंतर, फळ टिकण्याचा काळ या बाबींवर प्राधान्याने काम केले जाणार आहे, असेही डाॅ. दिलीप घाेष यांनी सांगितले.

संत्रा उत्पादक जिल्ह्यांमध्ये सक्रिय शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने स्थानिक पातळीवर निर्यातीभिमुख विस्तार कार्यक्रम राबविला जाईल. यातून टिकाऊ मूल्य साखळी तयार केली जाईल. चांगल्या मालवाहतुकीला तसेच सेंद्रिय संत्रा व माेसंबी उत्पादनाला प्राेत्साहन दिले जाईल. कीड व राेग नियंत्रणासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचेही ‘आयसीएआर-सीसीआरआय’चे संचालक डाॅ. दिलीप घाेष यांनी सांगितले.

करारातील उद्दिष्टे

या दाेन्ही संस्थांच्या संयुक्त सहभागाने नागपुरी संत्रा व माेसंबी जागतिक बाजाराशी जाेडली जाईल. त्यातून निर्यात बास्केट, वाहतूक व दर्जेदार उत्पादनास मदत हाेईल. जागतिक पातळीवर ‘ब्रँड इंडिया’ स्थापन करून उच्च दर्जाच्या संत्रा व माेसंबीचे उत्पादन करून निर्यात वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. संत्रा व माेसंबीच्या बाजाराचा विकास, स्थानिक वैशिष्ट्यपूर्णता, ब्रँडिंग, पॅकिंग, बाजार व व्यापार काैशल्य, दर्जेदार उत्पादन, व्यापार व निर्यातीला प्राेत्साहन देण्यासाठी शेतकरी, उद्याेजक, निर्यातदार व इतर भागधारकांचे काैशल्य व क्षमता वाढविणे, शेतकरी उत्पादन कंपन्यांना (एफपीसी) प्राेत्साहन देणे, त्यांना जागतिक बाजाराशी जाेडणे, तंत्रज्ञान विकसित करणे, हस्तांतरण व तांत्रिक काैशल्य वाढविणे, प्रयाेगशाळांचे बळकटीकरण करणे, आयात करणाऱ्या देशांच्या गरजेनुसार चाचण्यांची साेय करून त्यावर विशेष भर दिला जाईल, असेही डाॅ. दिलीप घाेष यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेती