शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

पुरस्कार, सन्मान मी दुसऱ्याच दिवशी मागे सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 10:22 IST

नाटकाचा परिघ विस्तारण्यासाठी निरंतर प्रयोग हेच माझे लक्ष्य आहे, अशा शब्दात युवा प्रयोगशील नाट्य दिग्दर्शक रूपेश पवार याने आपल्या भविष्यातील प्रवासाबाबत सांगितले.

ठळक मुद्देरूपेश पवारनाटकाचा परिघ विस्तारण्यासाठी निरंतर प्रयोग हेच माझे लक्ष्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाटक माझ्या रक्तात आहे. मी जागा असेल वा झोपलेला डोक्यात विचार नाटकाचाच सुरू असतो. नाटकाप्रतिच्या समर्पणामुळेच ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ‘आणि शेवटी प्रार्थना’ या नाटकासाठी मला सर्वोत्तम दिग्दर्शनाचा प्रथम पुरस्कार मिळाला. या आनंदात नागपुरातील जीवाभावाच्या मंडळींनी माझा मोठा सत्कारही घडवून आणला. यासाठी मी कायम त्यांच्या ऋणात राहील. पण, पुरस्कार आणि सन्मानाचे वलय दुसऱ्याच दिवशी मागे सोडून मी पुढे निघालोय. नाटकाचा परिघ विस्तारण्यासाठी निरंतर प्रयोग हेच माझे लक्ष्य आहे, अशा शब्दात युवा प्रयोगशील नाट्य दिग्दर्शक रूपेश पवार याने आपल्या भविष्यातील प्रवासाबाबत सांगितले. लोकमतला दिलेल्या मुलाखतीत रूपेशने त्याच्या कल्पनेतील नाटकाच्या प्रत्येक कोपऱ्याचे दर्शन घडवले. वाणिज्य शाखेचा विद्यार्थी असलेल्या रूपेशच्या डोक्यात नाटक नावाचे हे खूळ शिरले कसे, याचीही एक वेगळी संहिता आहे. हा मूळचा हिंदी भाषिक़ वडील पोलिसात असल्याने सारखी फिरस्ती सुरू असायची. केळवदच्या आदर्श विद्यालयात पाचवीत असताना कथाकथनातून पहिल्यांदा नाटक गवसले. पुढे नागपूरच्या धनवटे महाविद्यालयात प्रवेशानंतर याच नाटकाच्या प्रेमापोटी राष्ट्रभाषा परिवाराशी रूपेश जुळला आणि नाटकमय झाला. तेव्हा त्याचा भर अभिनयावर होता. पण, प्रेमचंद, किस्मत चुगताई, मंटो, खुशवंत सिंग सलग वाचत आल्याने रूपेशच्या आतही एक लेखक आकार घ्यायला लागला होता. ‘कर्फ्यू’ मंचावर आले आणि त्याच्या आतील लेखकावर शिक्कामोर्तब झाले. यातूनच पुढे चार मोठे नाटक १४ एकांकिका लिहून काढल्या. वर उल्लेखित लेखकांचा प्रभाव असल्याने संहितेला अगदी निसर्गत: विद्रोहाचे आवरण लाभत गेले. रूपेशचा शब्दांवर विश्वास नाही, कारण शब्द फसवे असतात. फसवत नाहीत त्या भावना. म्हणूनच रूपेशची संहिता सलग नसते. तो केवळ आऊट लाईन ठरवतो आणि पात्रांना भूमिकेशी एकरूप करून त्याला जे सांगायचे आहे ते भावनांच्या भाषेत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. त्याचा हा फॉर्म्युला आतापर्यंत तरी यशस्वी ठरलाय आणि मानवी मनात भावनांचा आवास कायम असेपर्यंत तो यशस्वीच ठरत राहणार आहे. सध्या काय आहे डोक्यात विचारल्यावर म्हणाला, एक कथा घोळतेय खरी. पण, त्याआधी कवितांना अभिनयाची जोड देऊन मंचावर आणायचेय. त्यासाठी झपाटल्यागत फिरतोय. रूपेश आणि झपाटलेपणाला नाटकाने हे असे एकरूप करून टाकले आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिक