शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कार, सन्मान मी दुसऱ्याच दिवशी मागे सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 10:22 IST

नाटकाचा परिघ विस्तारण्यासाठी निरंतर प्रयोग हेच माझे लक्ष्य आहे, अशा शब्दात युवा प्रयोगशील नाट्य दिग्दर्शक रूपेश पवार याने आपल्या भविष्यातील प्रवासाबाबत सांगितले.

ठळक मुद्देरूपेश पवारनाटकाचा परिघ विस्तारण्यासाठी निरंतर प्रयोग हेच माझे लक्ष्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाटक माझ्या रक्तात आहे. मी जागा असेल वा झोपलेला डोक्यात विचार नाटकाचाच सुरू असतो. नाटकाप्रतिच्या समर्पणामुळेच ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ‘आणि शेवटी प्रार्थना’ या नाटकासाठी मला सर्वोत्तम दिग्दर्शनाचा प्रथम पुरस्कार मिळाला. या आनंदात नागपुरातील जीवाभावाच्या मंडळींनी माझा मोठा सत्कारही घडवून आणला. यासाठी मी कायम त्यांच्या ऋणात राहील. पण, पुरस्कार आणि सन्मानाचे वलय दुसऱ्याच दिवशी मागे सोडून मी पुढे निघालोय. नाटकाचा परिघ विस्तारण्यासाठी निरंतर प्रयोग हेच माझे लक्ष्य आहे, अशा शब्दात युवा प्रयोगशील नाट्य दिग्दर्शक रूपेश पवार याने आपल्या भविष्यातील प्रवासाबाबत सांगितले. लोकमतला दिलेल्या मुलाखतीत रूपेशने त्याच्या कल्पनेतील नाटकाच्या प्रत्येक कोपऱ्याचे दर्शन घडवले. वाणिज्य शाखेचा विद्यार्थी असलेल्या रूपेशच्या डोक्यात नाटक नावाचे हे खूळ शिरले कसे, याचीही एक वेगळी संहिता आहे. हा मूळचा हिंदी भाषिक़ वडील पोलिसात असल्याने सारखी फिरस्ती सुरू असायची. केळवदच्या आदर्श विद्यालयात पाचवीत असताना कथाकथनातून पहिल्यांदा नाटक गवसले. पुढे नागपूरच्या धनवटे महाविद्यालयात प्रवेशानंतर याच नाटकाच्या प्रेमापोटी राष्ट्रभाषा परिवाराशी रूपेश जुळला आणि नाटकमय झाला. तेव्हा त्याचा भर अभिनयावर होता. पण, प्रेमचंद, किस्मत चुगताई, मंटो, खुशवंत सिंग सलग वाचत आल्याने रूपेशच्या आतही एक लेखक आकार घ्यायला लागला होता. ‘कर्फ्यू’ मंचावर आले आणि त्याच्या आतील लेखकावर शिक्कामोर्तब झाले. यातूनच पुढे चार मोठे नाटक १४ एकांकिका लिहून काढल्या. वर उल्लेखित लेखकांचा प्रभाव असल्याने संहितेला अगदी निसर्गत: विद्रोहाचे आवरण लाभत गेले. रूपेशचा शब्दांवर विश्वास नाही, कारण शब्द फसवे असतात. फसवत नाहीत त्या भावना. म्हणूनच रूपेशची संहिता सलग नसते. तो केवळ आऊट लाईन ठरवतो आणि पात्रांना भूमिकेशी एकरूप करून त्याला जे सांगायचे आहे ते भावनांच्या भाषेत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. त्याचा हा फॉर्म्युला आतापर्यंत तरी यशस्वी ठरलाय आणि मानवी मनात भावनांचा आवास कायम असेपर्यंत तो यशस्वीच ठरत राहणार आहे. सध्या काय आहे डोक्यात विचारल्यावर म्हणाला, एक कथा घोळतेय खरी. पण, त्याआधी कवितांना अभिनयाची जोड देऊन मंचावर आणायचेय. त्यासाठी झपाटल्यागत फिरतोय. रूपेश आणि झपाटलेपणाला नाटकाने हे असे एकरूप करून टाकले आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिक