शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पुरस्कार, सन्मान मी दुसऱ्याच दिवशी मागे सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 10:22 IST

नाटकाचा परिघ विस्तारण्यासाठी निरंतर प्रयोग हेच माझे लक्ष्य आहे, अशा शब्दात युवा प्रयोगशील नाट्य दिग्दर्शक रूपेश पवार याने आपल्या भविष्यातील प्रवासाबाबत सांगितले.

ठळक मुद्देरूपेश पवारनाटकाचा परिघ विस्तारण्यासाठी निरंतर प्रयोग हेच माझे लक्ष्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाटक माझ्या रक्तात आहे. मी जागा असेल वा झोपलेला डोक्यात विचार नाटकाचाच सुरू असतो. नाटकाप्रतिच्या समर्पणामुळेच ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ‘आणि शेवटी प्रार्थना’ या नाटकासाठी मला सर्वोत्तम दिग्दर्शनाचा प्रथम पुरस्कार मिळाला. या आनंदात नागपुरातील जीवाभावाच्या मंडळींनी माझा मोठा सत्कारही घडवून आणला. यासाठी मी कायम त्यांच्या ऋणात राहील. पण, पुरस्कार आणि सन्मानाचे वलय दुसऱ्याच दिवशी मागे सोडून मी पुढे निघालोय. नाटकाचा परिघ विस्तारण्यासाठी निरंतर प्रयोग हेच माझे लक्ष्य आहे, अशा शब्दात युवा प्रयोगशील नाट्य दिग्दर्शक रूपेश पवार याने आपल्या भविष्यातील प्रवासाबाबत सांगितले. लोकमतला दिलेल्या मुलाखतीत रूपेशने त्याच्या कल्पनेतील नाटकाच्या प्रत्येक कोपऱ्याचे दर्शन घडवले. वाणिज्य शाखेचा विद्यार्थी असलेल्या रूपेशच्या डोक्यात नाटक नावाचे हे खूळ शिरले कसे, याचीही एक वेगळी संहिता आहे. हा मूळचा हिंदी भाषिक़ वडील पोलिसात असल्याने सारखी फिरस्ती सुरू असायची. केळवदच्या आदर्श विद्यालयात पाचवीत असताना कथाकथनातून पहिल्यांदा नाटक गवसले. पुढे नागपूरच्या धनवटे महाविद्यालयात प्रवेशानंतर याच नाटकाच्या प्रेमापोटी राष्ट्रभाषा परिवाराशी रूपेश जुळला आणि नाटकमय झाला. तेव्हा त्याचा भर अभिनयावर होता. पण, प्रेमचंद, किस्मत चुगताई, मंटो, खुशवंत सिंग सलग वाचत आल्याने रूपेशच्या आतही एक लेखक आकार घ्यायला लागला होता. ‘कर्फ्यू’ मंचावर आले आणि त्याच्या आतील लेखकावर शिक्कामोर्तब झाले. यातूनच पुढे चार मोठे नाटक १४ एकांकिका लिहून काढल्या. वर उल्लेखित लेखकांचा प्रभाव असल्याने संहितेला अगदी निसर्गत: विद्रोहाचे आवरण लाभत गेले. रूपेशचा शब्दांवर विश्वास नाही, कारण शब्द फसवे असतात. फसवत नाहीत त्या भावना. म्हणूनच रूपेशची संहिता सलग नसते. तो केवळ आऊट लाईन ठरवतो आणि पात्रांना भूमिकेशी एकरूप करून त्याला जे सांगायचे आहे ते भावनांच्या भाषेत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. त्याचा हा फॉर्म्युला आतापर्यंत तरी यशस्वी ठरलाय आणि मानवी मनात भावनांचा आवास कायम असेपर्यंत तो यशस्वीच ठरत राहणार आहे. सध्या काय आहे डोक्यात विचारल्यावर म्हणाला, एक कथा घोळतेय खरी. पण, त्याआधी कवितांना अभिनयाची जोड देऊन मंचावर आणायचेय. त्यासाठी झपाटल्यागत फिरतोय. रूपेश आणि झपाटलेपणाला नाटकाने हे असे एकरूप करून टाकले आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिक