शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
3
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
4
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
5
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
6
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
7
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
8
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
9
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
10
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
11
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
12
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
13
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
14
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
15
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
16
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
17
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
18
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
19
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
20
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

मी ठाले पाटलांचा उमेदवार हा प्रचार चुकीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 01:44 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाची निवडणूक लढवण्यामागे माझी भूमिका स्वच्छ आहे. मराठीच्या हितासाठी मी या रिंगणात उतरलोय.

ठळक मुद्देलक्ष्मीकांत देशमुख : लोकमतजवळ व्यक्त केला गुणवत्तेच्या बळावर निवडून येण्याचा विश्वास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाची निवडणूक लढवण्यामागे माझी भूमिका स्वच्छ आहे. मराठीच्या हितासाठी मी या रिंगणात उतरलोय. मी कौतिकराव ठाले पाटलांचा प्रायोजित उमेदवार आहे, असा प्रचार कुणी करत असेल तर तो चुकीचा आहे. प्रांतवाद मला मान्य नाही. मी अखिल भारतीय उमेदवार आहे आणि वाङ्मयीन क्षेत्रातील माझ्या गुणवत्तेच्या बळावर मी मतदारांना कौल मागतोय, अशा शब्दात ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षदाचे उमेदवार लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपली भूमिका विशद केली. लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी त्यांच्या मराठीच्या विकासाबाबतच्या कल्पना आणि निवडणुकीला उभे राहण्यामागच्या कारणांची चर्चा केली. देशमुख पुढे म्हणाले, ही निवडणूक मला दंगल वाटत नाही.हा शारदेचा उत्सव आहे. भाषेच्या हितासाठी कोणता उमेदवार योग्य राहील, याचा निर्णय सूज्ञ मतदारांनी घ्यायचा आहे. मी माझ्या लेखणीद्वारे सातत्याने वाङ्मयीन योगदान देत आलो आहे. फक्त लेखणीच नव्हे तर कृतीतूनही माझे कार्य अखंड सुरूच आहे. परभणीत माझ्या पुढाकाराने व लोकसहभागातून मराठवाड्याचे प्रसिद्ध कवी बी. रघुनाथ यांचे ८० लाखांचे देखणे स्मारक उभे राहिले. संत ज्ञानेश्वरांच्या आळंदीतूनही मी नवोदितांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत आहे. मतदार या सर्व गोष्टींचा विचार नक्की करतील याचा मला विश्वास आहे, याकडेही लक्ष्मीकांत देशमुख यांनी लक्ष वेधले.संमेलनाध्यक्ष झालो तर हे करणारआज मराठीची अवस्था खरच चिंतनीय आहे. हे चित्र बदलण्यासाठी व मराठीला ग्लोबल भाषा करण्यासोबतच तिला तरुणाईच्या अभिव्यक्तीचे माध्यम बनविण्यासाठी माझ्या काही कल्पना आहेत. त्या कृतीत उतरवण्यासाठी मी संमेलनाध्यक्षपदाचा पूर्ण क्षमतेने वापर करणार आहे. याशिवाय इंग्रजी माध्यमांच्या शाळेतही दहावीपर्यंत मराठी आवश्यक केली जावी, बृहन्महाराष्ट्रातील मराठी साहित्य मंडळांना हक्काचे सभागृह लाभावे, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. यासोबतच मराठी चित्रपट, नाटक आणि काव्याधारित भावसंगीत यांचे महत्त्व लक्षात घेऊन माझे काही चिंतनही मला मांडायचे आहे.