शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मी ठाले पाटलांचा उमेदवार हा प्रचार चुकीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 01:44 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाची निवडणूक लढवण्यामागे माझी भूमिका स्वच्छ आहे. मराठीच्या हितासाठी मी या रिंगणात उतरलोय.

ठळक मुद्देलक्ष्मीकांत देशमुख : लोकमतजवळ व्यक्त केला गुणवत्तेच्या बळावर निवडून येण्याचा विश्वास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाची निवडणूक लढवण्यामागे माझी भूमिका स्वच्छ आहे. मराठीच्या हितासाठी मी या रिंगणात उतरलोय. मी कौतिकराव ठाले पाटलांचा प्रायोजित उमेदवार आहे, असा प्रचार कुणी करत असेल तर तो चुकीचा आहे. प्रांतवाद मला मान्य नाही. मी अखिल भारतीय उमेदवार आहे आणि वाङ्मयीन क्षेत्रातील माझ्या गुणवत्तेच्या बळावर मी मतदारांना कौल मागतोय, अशा शब्दात ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षदाचे उमेदवार लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपली भूमिका विशद केली. लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी त्यांच्या मराठीच्या विकासाबाबतच्या कल्पना आणि निवडणुकीला उभे राहण्यामागच्या कारणांची चर्चा केली. देशमुख पुढे म्हणाले, ही निवडणूक मला दंगल वाटत नाही.हा शारदेचा उत्सव आहे. भाषेच्या हितासाठी कोणता उमेदवार योग्य राहील, याचा निर्णय सूज्ञ मतदारांनी घ्यायचा आहे. मी माझ्या लेखणीद्वारे सातत्याने वाङ्मयीन योगदान देत आलो आहे. फक्त लेखणीच नव्हे तर कृतीतूनही माझे कार्य अखंड सुरूच आहे. परभणीत माझ्या पुढाकाराने व लोकसहभागातून मराठवाड्याचे प्रसिद्ध कवी बी. रघुनाथ यांचे ८० लाखांचे देखणे स्मारक उभे राहिले. संत ज्ञानेश्वरांच्या आळंदीतूनही मी नवोदितांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत आहे. मतदार या सर्व गोष्टींचा विचार नक्की करतील याचा मला विश्वास आहे, याकडेही लक्ष्मीकांत देशमुख यांनी लक्ष वेधले.संमेलनाध्यक्ष झालो तर हे करणारआज मराठीची अवस्था खरच चिंतनीय आहे. हे चित्र बदलण्यासाठी व मराठीला ग्लोबल भाषा करण्यासोबतच तिला तरुणाईच्या अभिव्यक्तीचे माध्यम बनविण्यासाठी माझ्या काही कल्पना आहेत. त्या कृतीत उतरवण्यासाठी मी संमेलनाध्यक्षपदाचा पूर्ण क्षमतेने वापर करणार आहे. याशिवाय इंग्रजी माध्यमांच्या शाळेतही दहावीपर्यंत मराठी आवश्यक केली जावी, बृहन्महाराष्ट्रातील मराठी साहित्य मंडळांना हक्काचे सभागृह लाभावे, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. यासोबतच मराठी चित्रपट, नाटक आणि काव्याधारित भावसंगीत यांचे महत्त्व लक्षात घेऊन माझे काही चिंतनही मला मांडायचे आहे.