शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

काळाने संधीच दिली नाही...!

By admin | Updated: May 31, 2015 02:34 IST

पहाटेची वेळ...हायवेवरून भरधाव जाणाऱ्या गाड्या...क्षणात काय घडले समजलेच नाही....काळाने घाला घातला अन् क्षणातच मृत्यूने गाठले.

नागपूर : पहाटेची वेळ...हायवेवरून भरधाव जाणाऱ्या गाड्या...क्षणात काय घडले समजलेच नाही....काळाने घाला घातला अन् क्षणातच मृत्यूने गाठले. या अपघातात तीन तरुण डॉक्टर, एक वैद्यकीय प्रतिनिधी आणि गरिबीशी झुंज देणाऱ्या तरुणाला हिरावले. या पाचही जीवाला काळाने कसलीही संधी दिली नाही. त्यांना मदतही मिळू दिली नाही. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रच सुन्न झाले आहे.छिंदवाड्याजवळ शनिवारी पहाटे चारच्या सुमारास झालेल्या अपघातात नागपूरचे पाच जण ठार झाले. सकाळीच ही बातमी नागपुरात पोहोचली. शहरातील वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मंडळी सकाळपासूनच फोन, मेसेज, व्हॉटस्अपवरून एकमेकांना विचारणा करीत होती. प्रसारमाध्यमांकडेही चौकशी सुरू होती. उपराजधानीतील सुप्रसिद्ध अस्थिरोग विशेषज्ञ डॉ. अनिल गोल्हर यांचे पुत्र डॉ. साकेत, डॉ. आशिष बाबूराव भांडोले, सत्येंद्र अवधेश सिंग, विजयकुमार मेघशाम ठाकरे आणि डॉ. परमेश्वर लक्षदवार हे पाच जण एका आरोग्य शिबिराच्या निमित्ताने नागपूरहून नरसिंगपूर- सागर(मध्य प्रदेश) कडे जात होते. मात्र, काळ बनून समोर ठाकलेल्या ट्रकने जुगावानी टोल नाक्याजवळ या तरुणांच्या स्वीफ्टवर झडप घातली. स्वीफ्टचा बोनेटपर्यंतचा भाग ट्रकने गिळल्यासारखा केला. तब्बल ४ तासानंतर घटनास्थळी पोलीस पोहचले. तोपर्यंत सारेच संपले होते. हे वृत्त नागपुरात सकाळी ९ च्या सुमारास पोहचले अन् वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्राला जबर धक्का बसला. अनेक जण फोन, मेसेज, व्हॉटस्अपवरून या वृत्ताची शहानिशा करून घेत होते. नंतर अनेकांनी डॉ. गोल्हर यांच्या रामदासपेठेतील रुग्णालयात, निवासस्थानी धाव घेतली. मनमिळावू आणि सौजन्यशीलडॉ. साकेत, डॉ. आशिष आणि डॉ. परमेश्वर हे वानाडोंगरीच्या लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पीजी (आर्थोपेडिक) करीत असल्याची चर्चा होती. मात्र, डॉ. साकेत वगळता अन्य दोघांबाबत रुग्णालयाच्या वरिष्ठांकडेही माहिती नव्हती. साकेत अत्यंत मनमिळावू आणि सौजन्यशील होता, असे त्याचे वरिष्ठ सांगत होते. शुक्रवारी दिवसभर तो ओपीडीत होता. रुग्णांची आस्थेने चौकशी करून त्यांच्यावर उपचार करण्याची डॉ. साकेतची शैली होती. वडील एवढे मोठे डॉक्टर आणि त्याच रुग्णालयात एचओडी असूनही, डॉ. साकेत त्याबाबत बडेजावपणा बाळगत नव्हता. रुग्ण, सहकारी डॉक्टर, कर्मचारी आणि वरिष्ठ या प्रत्येकासोबतच तो नम्रपणे वागायचा. त्याच्याबद्दल काय बोलावे, ते शब्दच सूचत नसल्याचे त्याचे एक वरिष्ठ सहकारी लोकमतशी बोलताना म्हणाले. आक्रित घडलेच कसे?नागपूर : आप्तस्वकीयांचा आक्रोश अन् रुग्णालयातील सहकाऱ्यांची हळहळ मनाला चटका लावणारी होती. हे आक्रित घडलेच कसे, असा प्रत्येकाचा सवाल होता. कुणीच काही बोलायच्या मन:स्थितीत नव्हते. अपघाताच्या वृत्ताने प्रत्येकालाच हादरवले होते. डॉ. गोल्हर यांचे निकटवर्तीय छिंदवाड्याकडे रवाना झाले होते. ते परत आल्यानंतरच काही सांगता येईल, असे सर्वजण सांगत होते. विजयचा मार्गच चुकला या अपघाताने विजय ठाकरेच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांच्या आशाअपेक्षाही संपवल्या. मूळचे गोंदियातील रहिवासी असलेले मेघश्याम ठाकरे यांची परिस्थिती हलाखीची. दुसऱ्याच्या शेतात राबून ते उदरनिर्वाह करायचे. येथे राहिलो तर मुलांनाही हलाखीतच जगावे लागेल, असा विचार करून त्यांनी नागपूरला धाव घेतली. कबाडकष्ट करीत ते विजय आणि त्याचा मोठा भाऊ दुर्गेशला शिकवू लागले. मात्र, शहराचे महागडे शिक्षण अवाक्याबाहेरचे असल्याने ते हतबल झाले. विजय मोखारे कॉलेजमध्ये बी.कॉमला शिकत होता. (प्रतिनिधी)