शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नागपूरकरांच्या प्रेमावर मी भाळलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 12:10 IST

Nagpur News रिऍलिटी शोमुळे माझे आयुष्य प्रचंड बदलले आहे. त्यामुळे, माझ्या दैनंदिन कामांना सामाेरे जाताना अवघड होत आहे. परंतु, घरी परतल्यामुळे प्रचंड आनंद होत असल्याचे राहुलने यावेळी सांगितले.

ठळक मुद्दे‘बिगबॉस उपविजेता’ राहुल वैद्य भरपूर पाठिंबा दिल्याने व्यक्त केले आभार

अंकिता देशकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपुरात जन्मलेला प्रसिद्ध गायक राहुल वैद्य याने बहुचर्चित रिऍलिटी शो ‘बिगबॉस १४’चे उपविजेतेपद पटकावले आहे तर दूरचित्रवाणी अभिनेत्री रुबिना दिलैक हिने विजेतेपद पटकावले. राहुलने प्राप्त केलेल्या या यशानंतर ‘लोकमत’ने त्याच्याशी संवाद साधला.

रिऍलिटी शोमुळे माझे आयुष्य प्रचंड बदलले आहे. त्यामुळे, माझ्या दैनंदिन कामांना सामाेरे जाताना अवघड होत आहे. परंतु, घरी परतल्यामुळे प्रचंड आनंद होत असल्याचे राहुलने यावेळी सांगितले. विजेतेपद प्राप्त झाले नाही, हे शल्य नक्कीच राहील. पण, जिंकणे हाच एक हेतू बिगबॉसच्या घरात जाण्याचा नव्हता. मी तेथे होतो, ते महत्त्वाचे आहे. लोकांचे प्रेम आणि पाठबळ मिळविणे, हा हेतू होता आणि मी असाच घडलो आहे, हे त्यातून सिद्ध झाले. ग्रॅण्ड फिनालेमध्ये माझे कुटुंब सहभागी झाले, त्याचा अत्यानंद आहे.

बिगबॉस हाऊसमध्ये असताना अस्वस्थताही होती. सर्वत्र लागलेल्या कॅमेऱ्यांनी खासगी आयुष्य असे राहिलेच नव्हते आणि त्यामुळेच बऱ्याच गोष्टी अनियमित होत होत्या आणि पुरेशी झोपही होत नव्हती, असे राहुल म्हणाला. माझे आजी-आजोबा नागपुरातच राहतात आणि त्यामुळेच मी शहराला वारंवार भेट देत असतो. नागपूरकरांकडून मिळालेल्या प्रेमाने आणि पाठिंब्याने मी भारावून गेलो आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार नागपुरातील काही रेस्तराँनी माझ्यासाठी विशेष मोहीम राबवल्याचे कळले. राहुल वैद्यला मत द्या आणि विशेष सवलत मिळवा, अशी ऑफर ग्राहकांना या रेस्तराँनी दिली होती. असे प्रेम मिळत असेल तर आणखी काय हवे, असा कृतज्ञतापूर्वक प्रतिप्रश्न राहुलने यावेळी व्यक्त केला. या शोचा ऍकर सलमान खान याच्यासोबतच अनुभव अतिशय खास ठरला. त्याने सगळ्यांचे आदरातिथ्य केले आणि सर्वांना सहज वाटेल अशी वातावरणनिर्मितीही केली होती.

ग्रॅण्ड फिनालेच्या समाप्तीनंतर सलमान खानने आईवडिलांसोबत एका खासगी पार्टीत भरपूर वेळही घालविल्याचे राहुल म्हणाला. भविष्यात संधी मिळाली तर सलमान खानसोबत काम करण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली आहे. बिगबॉसच्या घरातून बाहेर आल्यावर मित्र आणि सर्वांसाठी चहा बनविण्याच्या प्रसंगाची खूप आठवण येते. भविष्यात आता कामावर लक्ष केंद्रित करण्यासेाबतच नव्या गाण्यांच्या प्रदर्शनाचा विचार करणार असून, आई-वडील, कुटुंबीय व गर्लफ्रेण्डसोबत भरपूर वेळ घालविणार असल्याचे राहुल म्हणाला. रिऍलिटी शो हा स्क्रिप्टेड असतो, हा केवळ भ्रम आहे. घरात घडणारी प्रत्येक घटना ही सत्य व अचानक घडणारी असल्याचेही राहुलने सांगितले.

राहुल वैद्यला मत द्या आणि विशेष सवलत मिळवा, अशी ऑफर ग्राहकांना नागपुरातील रेस्तराँनी दिली होती, ही आठवण यावेळी राहुल वैद्य याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

 

टॅग्स :rahul vaidyaराहुल वैद्य