शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जे वाट्याला आलं, ते जीव ओतून साकारलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 10:13 IST

‘भूमिका महत्त्वाची नाही, तर तुम्ही ती किती ताकदीने साकारता ते महत्त्वाचे आहे’, ही भावना व्यक्त करताना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी बोलत्या झाल्या.

ठळक मुद्दे रोहिणी हट्टंगडी बोलत्या झाल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रिचर्ड अ‍ॅटेनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटात कस्तुरबा गांधी यांची भूमिका साकारल्यानंतर आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त झाली. याच भूमिकेसाठी आंतरराष्ट्रीय बाफ्टा पुरस्कार प्राप्त करणाºया त्या एकमेव भारतीय कलावंत आहेत. पण वयाच्या २७ व्या वर्षी ही भूमिका साकारल्यानंतर वृद्ध कलावंताचा शिक्का लागला. पुढे याच प्रकारच्या भूमिका आॅफर होऊ लागल्या. धर्मेंद्र, मिथूनपासून अमिताभ बच्चन यांच्या आईच्या भूमिका येत गेल्या व त्या जीव ओतून साकारत गेल्या. ‘भूमिका महत्त्वाची नाही, तर तुम्ही ती किती ताकदीने साकारता ते महत्त्वाचे आहे’, ही भावना व्यक्त करताना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी बोलत्या झाल्या.‘गांधी’ची कस्तुरबा असो, महेश भट्ट यांच्या ‘सारांश’मधील पार्वती असो की ‘अग्निपथ’मधील अमिताभची आई असो, व्यावसायिक, समानांतर सिनेमा, नाटक अशा प्रत्येक क्षेत्रात आपल्या जिवंत व दमदार अभिनयाने रोहिणी हट्टंगडी यांनी रसिकांच्या मनात कायम स्थान निर्माण केले आहे. आॅरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने अजेय गंपावार यांनी त्यांना बोलते केले, तेव्हा त्यांनी आपला कलापट प्रेक्षकांसमोर मांडला. ही महोत्सवाची समारोपीय मुलाखत होती. चित्रपटापेक्षा नाटकांची आवड असलेल्या रोहिणी यांनी जयदेव हट्टंगडी यांच्या दिग्दर्शनात ‘अविष्कार’ हे नाटक केले. यातील ‘चांगुणा’च्या भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट स्टेट ड्रामा फेस्टिव्हलमध्ये पुरस्कृत करण्यात आले. अ‍ॅटेनबरो यांच्या ‘गांधी’साठी भक्ती बर्वे व स्मिता पाटील यांच्यामधून कस्तुरबासाठी त्यांची निवड झाली. गोविंद निहलानी यांच्या ‘पार्टी’ या समानांतर चित्रपटातील भूमिकेसाठी सहअभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांनी प्राप्त केला.जपानचा ‘काबुकी’ हा एकपात्री प्रयोग साकारणाऱ्या त्या एकमेव भारतीय तर कन्नडच्या ‘यक्षगान’ हा प्रयोग साकारणाऱ्या त्या एकमेव महिला कलावंत आहेत. येत्या काळात ‘आजीची पोतळी’ ही वेबसिरीज व शेफ विष्णू मनोहर यांच्या ‘वन्स मोअर’मधील पुरुष भूमिकेबाबत त्यांनी माहिती दिली.रोहिणी हट्टंगडी यांच्या मुलाखतीनंतर चीनच्या ‘फ्री अ‍ॅन्ड इजी’ या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप झाला. तत्पूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, सहायक आयुक्त रवींद्र देवतळे यांच्यासह आयोजनातील आॅरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशनचे आयोजक सचिव डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. संजय उगेमुगे, सप्तकचे डॉ. उदय गुप्ते, विलास मानेकर, उदय पाटणकर, नितीन सहस्रबुद्धे, प्रदीप मुन्शी, विकास लिमये, रवींद्र डोंगरे, अजेय गंपावार, प्रमोद कळमकर, मिलिंद मराठे आदी उपस्थित होते.

महोत्सवात ३१ चित्रपट सादरमहोत्सवात ३१ चित्रपट सादर करण्यात आले. यामध्ये ७ मराठी व हिंदीसह इतर भाषिक चित्रपटांचा समावेश होता. याशिवाय २९ शॉर्ट फिल्म्सही प्रदर्शित करण्यात आल्याचे डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी सांगितले.

फाऊंटेनच्या विकासात ‘टेंडर’ आडवे येते : गडकरीतेलंगखेडी येथे आंतरराष्ट्रीय संकल्पनेतील म्युझिकल फाऊंटेन साकारण्याची योजना आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री रेवती यावर काम करीत असून त्याचे साहित्य विदेशातून येणार आहे. मात्र सरकारी धोरणानुसार ‘टेंडर’ काढण्याची सूचना वारंवार केली जाते. त्यामुळे हा प्रकल्प रखडत असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले. मात्र हा प्रकल्प पूर्ण करूच असा विश्वास त्यांनी दिला. नागपूर व विदर्भ साहित्य, कला, संस्कृतीच्या क्षेत्रात कमी पडतोय ही खंत त्यांनी व्यक्त केली. चित्रपटांचे चित्रीकरण विदर्भात व्हावे, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव व्हावे, चित्रपट व कला, संस्कृतीला चालना मिळावी ही भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :cultureसांस्कृतिक