शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

हायड्रोजन हाच जगाचा भविष्यातील उर्जा तारणहार; वाढते तापमान पृथ्वीच्‍या अस्तित्वासाठी धोक्याची घंटा

By जितेंद्र ढवळे | Updated: February 10, 2024 19:26 IST

जगाचे तापमान 2027 पर्यंत 1.5 अंश सेल्सिअसने वाढेल, असे भाकित खगोल, पर्यावरण आणि हवामान तज्ज्ञांनी मांडले आहे.

नागपूर: जगाचे तापमान 2027 पर्यंत 1.5 अंश सेल्सिअसने वाढेल, असे भाकित खगोल, पर्यावरण आणि हवामान तज्ज्ञांनी मांडले आहे. दरवर्षी उत्सर्जित होणारे 34.4 अब्ज टन कार्बन उत्सर्जनामुळे हे घडत आहे. यात एकट्या भारताचा वाटा 2.622 अब्ज टन आहे. पृथ्वीच्‍या अस्तित्वासाठी ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे पर्यायी हरित उर्जेचा वापर करण्यासाठी हायड्रोजन हाच जगाचा उर्जा तारणहार ठरेल, असे शास्त्रीय निरीक्षण  रसायनशास्त्रज्ञ गणपती यादव यांनी शनिवारी येथे नोंदविले. 

इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया) व आयईईई (नागपूर उपविभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रीन हायड्रोजन अँड क्लिन एनर्जी’ या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्‍यात आले आहे. शनिवारी वनामती येथे एलआयटीच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष पद्मश्री गणपती यादव यांच्‍या हस्‍ते परिषदेचे उद्घाटन झाले. मंचावर पावर ग्रीडचे माजी संचालक डॉ. व्ही. के. खरे, मॉईलचे शाखा व्यवस्थापक अखिलेश रॉय, इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सचे सचिव महेश शुक्ला, संयोजक एस. एफ. लांजेवार उपस्थित होते. 

भविष्यात पर्यावरणाला वाचवायचे असेल तर आपल्याला 840 मिलीयन मेट्रिक टन हायड्रोजन लागेल, असे सुरुवातीलाच नमूद करीत यादव म्हणाले, चीन, अमेरिका, युरोपियन संघानंतर भारत हा कार्बन उत्सर्जन करणारा चौथा देश आहे. वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या कार्बन उत्सर्जनापेक्षा बांधकाम क्षेत्रात उत्सर्जित होणारे कार्बन सर्वाधिक आहे. बांधकाम उद्योगाचा कार्बन उत्सर्जनातील वाटा 33 टक्के आहे. हे घातक आहे. जगाचे तापमान वाढत असल्याने पर्यावरणातले संतुलनही ढासळत आहे. त्यासाठी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या इंधनापेक्षा सौर, पवन आणि हायड्रोजन उर्जेचा पर्याय निवडणे ही मानवाचीच नाही, तर पृथ्वीची गरज आहे, असे ते म्‍हणाले.  

पर्यायी उर्जा हेच भविष्यातील इंधन यावर आणखी शास्त्रीय प्रकाश टाकताना पावरग्रीडचे माजी संचालक डॉ. खरे म्हणाले, इलेक्टिकवर धावणाऱ्या गाड्या वापरल्या म्हणजे आपण पर्यावरण प्रेमी आहोत, असे होत नाही. या गाड्या चार्ज करण्यासाठी जी वीज लागते तिची निर्मिती करण्यासाठी कोळसा जाळला जातो. त्यामुळे कार्बन उत्सर्जन होत असेल तर ते काहीही कामाचे नाही. त्यामुळे कार्बन उत्सर्जन न करणारे पवन, सौर आणि हायड्रोजन हेच भविष्यातील इंधन आणि उर्जेचा पर्याय आहे. प्रारंभी समन्वयक लांजेवार यांनी प्रास्ताविकातून परिषदेमागची भूमिका मांडली. सतिश रायपूरे यांनी परिषदेला उपस्थित पाहुण्यांचे स्‍वागत केले. या दोन दिवसीय परिषदेत देश-विदेशातून 350 प्रतिनिधी सहभागी होत असून 70 हून अधिक शोधनिंबध सादर केले जाणार आहेत.

टॅग्स :nagpurनागपूर