शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

बिना पाण्यानेच धावली हैदराबाद दुरंतो एक्सप्रेस; प्रवाशांची तीव्र कुचंबना

By नरेश डोंगरे | Updated: September 10, 2023 20:12 IST

आरडाओरड बेदखल, बल्लारपूरातही झाली नाही व्यवस्था

नागपूर : हैदराबादहून सुटलेली सिकंदराबाद निजामुद्दीन दुरंतो एक्सप्रेस नागपूरपर्यंत बिनापाण्यानेच धावली. प्रवाशांनी याबाबत वारंवार ओरड, तक्रार करूनही पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला होता.

नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल या गाडीत प्रवास करीत होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी १२.५० वाजता ही गाडी हैदराबादहून प्रवाशांना घेऊन निघाली. बी-१ कोचमध्ये बसलेल्या प्रवाशांपैकी काही नैसर्गिक विधीसाठी गेले असता स्वच्छतागृहात पाणीच नसल्याचे लक्षात आले. त्यांनी या संबंधाने अन्य प्रवाशांना माहिती दिली. त्यावेळी तांत्रिक बिघाड झाला असावा, काही वेळेत पाणी सुरू होईल, असा समज करून अनेक प्रवासी गप्प बसले. मात्र, एक तास, दोन तास, तीन तास झाले तरी पाणी काही आले नाही. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पुढच्या स्थानकावर व्यवस्था होईल, असे सांगून त्यावेळी प्रवाशांना गप्प करण्यात आले. मात्र, बल्लारपूर स्थानक आले तरी पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. दरम्यान, या प्रकारामुळे अनेक प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. सर्व डब्यात दुर्गंधी पसरली होती.

नुसत्याच बाता अन् दावे !

प्रवाशांना अधिकाधिक आणि चांगल्यात चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याची बतावणी करणाऱ्या रेल्वे प्रशासनाची या प्रकारामुळे पोलखोल झाली आहे. रेल्वेचे अधिकारी नुसतेच दावे करत असल्याचेही उघड झाले आहे. दरम्यान, या संतापजनक प्रकाराची काही प्रवाशांनी वरिष्ठांकडे तक्रार केल्याची माहिती आहे.

जबाबदार कोण, कोणती होणार कारवाई

या संतापजनक प्रकाराला कोण जबाबदार आहे आणि शेकडो प्रवाशांची कोंडी करणाऱ्या या संतापजनक प्रकरणात दोषींवर कोणती कारवाई केली जाते, त्याकडे रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.