शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

बिना पाण्यानेच धावली हैदराबाद दुरंतो एक्सप्रेस; प्रवाशांची तीव्र कुचंबना

By नरेश डोंगरे | Updated: September 10, 2023 20:12 IST

आरडाओरड बेदखल, बल्लारपूरातही झाली नाही व्यवस्था

नागपूर : हैदराबादहून सुटलेली सिकंदराबाद निजामुद्दीन दुरंतो एक्सप्रेस नागपूरपर्यंत बिनापाण्यानेच धावली. प्रवाशांनी याबाबत वारंवार ओरड, तक्रार करूनही पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला होता.

नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल या गाडीत प्रवास करीत होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी १२.५० वाजता ही गाडी हैदराबादहून प्रवाशांना घेऊन निघाली. बी-१ कोचमध्ये बसलेल्या प्रवाशांपैकी काही नैसर्गिक विधीसाठी गेले असता स्वच्छतागृहात पाणीच नसल्याचे लक्षात आले. त्यांनी या संबंधाने अन्य प्रवाशांना माहिती दिली. त्यावेळी तांत्रिक बिघाड झाला असावा, काही वेळेत पाणी सुरू होईल, असा समज करून अनेक प्रवासी गप्प बसले. मात्र, एक तास, दोन तास, तीन तास झाले तरी पाणी काही आले नाही. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पुढच्या स्थानकावर व्यवस्था होईल, असे सांगून त्यावेळी प्रवाशांना गप्प करण्यात आले. मात्र, बल्लारपूर स्थानक आले तरी पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. दरम्यान, या प्रकारामुळे अनेक प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. सर्व डब्यात दुर्गंधी पसरली होती.

नुसत्याच बाता अन् दावे !

प्रवाशांना अधिकाधिक आणि चांगल्यात चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याची बतावणी करणाऱ्या रेल्वे प्रशासनाची या प्रकारामुळे पोलखोल झाली आहे. रेल्वेचे अधिकारी नुसतेच दावे करत असल्याचेही उघड झाले आहे. दरम्यान, या संतापजनक प्रकाराची काही प्रवाशांनी वरिष्ठांकडे तक्रार केल्याची माहिती आहे.

जबाबदार कोण, कोणती होणार कारवाई

या संतापजनक प्रकाराला कोण जबाबदार आहे आणि शेकडो प्रवाशांची कोंडी करणाऱ्या या संतापजनक प्रकरणात दोषींवर कोणती कारवाई केली जाते, त्याकडे रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.