शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बिना पाण्यानेच धावली हैदराबाद दुरंतो एक्सप्रेस; प्रवाशांची तीव्र कुचंबना

By नरेश डोंगरे | Updated: September 10, 2023 20:12 IST

आरडाओरड बेदखल, बल्लारपूरातही झाली नाही व्यवस्था

नागपूर : हैदराबादहून सुटलेली सिकंदराबाद निजामुद्दीन दुरंतो एक्सप्रेस नागपूरपर्यंत बिनापाण्यानेच धावली. प्रवाशांनी याबाबत वारंवार ओरड, तक्रार करूनही पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला होता.

नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल या गाडीत प्रवास करीत होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी १२.५० वाजता ही गाडी हैदराबादहून प्रवाशांना घेऊन निघाली. बी-१ कोचमध्ये बसलेल्या प्रवाशांपैकी काही नैसर्गिक विधीसाठी गेले असता स्वच्छतागृहात पाणीच नसल्याचे लक्षात आले. त्यांनी या संबंधाने अन्य प्रवाशांना माहिती दिली. त्यावेळी तांत्रिक बिघाड झाला असावा, काही वेळेत पाणी सुरू होईल, असा समज करून अनेक प्रवासी गप्प बसले. मात्र, एक तास, दोन तास, तीन तास झाले तरी पाणी काही आले नाही. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पुढच्या स्थानकावर व्यवस्था होईल, असे सांगून त्यावेळी प्रवाशांना गप्प करण्यात आले. मात्र, बल्लारपूर स्थानक आले तरी पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. दरम्यान, या प्रकारामुळे अनेक प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. सर्व डब्यात दुर्गंधी पसरली होती.

नुसत्याच बाता अन् दावे !

प्रवाशांना अधिकाधिक आणि चांगल्यात चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याची बतावणी करणाऱ्या रेल्वे प्रशासनाची या प्रकारामुळे पोलखोल झाली आहे. रेल्वेचे अधिकारी नुसतेच दावे करत असल्याचेही उघड झाले आहे. दरम्यान, या संतापजनक प्रकाराची काही प्रवाशांनी वरिष्ठांकडे तक्रार केल्याची माहिती आहे.

जबाबदार कोण, कोणती होणार कारवाई

या संतापजनक प्रकाराला कोण जबाबदार आहे आणि शेकडो प्रवाशांची कोंडी करणाऱ्या या संतापजनक प्रकरणात दोषींवर कोणती कारवाई केली जाते, त्याकडे रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.