शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

झोपडीतून फ्लॅटमध्ये, पण रस्ताच नाही!

By admin | Updated: September 15, 2016 02:38 IST

उपराजधानीला ‘झोपडपट्टीमुक्त शहर’ करण्याच्या हेतूने केंद्र सरकारच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

व्यथा कायम : एसआरएच्या योजनेत पाणी व वीज नाहीनागपूर : उपराजधानीला ‘झोपडपट्टीमुक्त शहर’ करण्याच्या हेतूने केंद्र सरकारच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) योजनेंतर्गत महानगरपालिका शहरातील झोपडपट्टीधारकांना मोफत गाळे (फ्लॅट) देण्याची योजना राबवित आहे. यातूनच नारी येथील सम्राट अशोक नगर येथे १६० गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु येथे रस्ता, पाणी, वीज, सिवेज लाईन अशा स्वरूपाच्या मूलभूत सुविधा नाही. त्यामुळे गाळ्यापेक्षा झोपडपट्टी चांगली होती. असे म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. येथून अवघ्या ५०० मीटर अंतरावर नागरी सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागाच्या विकासाचे स्वप्न दाखविणारे नागपूर सुधार प्रन्यास महानगर नियोजन क्षेत्राचा विकास कसा करणार असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.१६० गाळ्यांची योजना झिरो माईलपासून ७.८५ किलोमीटर तर आॅटोमोटिव्ह चौकापासून अवघ्या १.६ किलोमीटर अंतरावर आहे. असे असतानाही कामठी मार्गालतचा हा परिसर विकासापासून दूर आहे. याला नागपूर सुधार प्रन्यास जबाबदार आहे. २००१ च्या शहर विकास आराखड्यात कामठी मार्गावरील स्टार मोटर्स जवळचा ८० फुटांचा डीपीरोड मंजूर आहेत. परंतु १५ वर्षानंतरही येथील रस्त्याचे काम करण्यात आलेले नाही. काही वर्षापूर्वी खडीकरण करण्यात आले होते. परंतु आता हा रस्ता वाहतुकीयोग्य राहिलेला नाही. चांगला रस्ता नसल्याने या भागातील विकास थांबला आहे. १६० गाळ्यांच्या बाजूलाच पुन्हा १०० गाळ्यांचे बांधकाम सुरू आहे. या गाळेधारकांनाही अशाच समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. गाळ्यांचे बांधकाम करताना रस्त्यांचा विचारच करण्यात आलेला नाही. आजूबाजूच्या मोकळ्या प्लाटमधून येथील नागरिक ये-जा करतात. परंतु प्लॉटधारकांनी जागेला संरक्षण भिंत उभारल्यानंतर गाळेधारकांना रस्ताच राहणार नाही. सर्वत्र असते अंधाराचे साम्राज्यनागपूर : चांगला रस्ता नसल्याने विजेचे खांब उभारण्यात आलेले नाही. त्यामुळे या परिसरातून जाणाऱ्या वीज वाहिनीवरून येथील गाळेधारकांनी अवैध वीज जोडणी केली आहे. पाणीपुरवठा व सिवेज लाईन येथील नागरिकांच्या नशिबीच नसल्याचे चित्र आहे. या परिसरात पथदिवे नसल्याने रात्रीच्या सुमारास सर्वत्र अंधाराचे साम्राज्य असते. पावसाळ्याच्या दिवसात या भागातील परिस्थिती दुर्गम भागासारखीच असते. यालाच झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन म्हणणार का, असा प्रश्न झोपडपट्टीधारकांना पडला आहे. (प्रतिनिधी)मनपा-नासुप्र यांच्यात वादनारी येथील एसआरए योजनेसाठी महानगरपालिके ने जागा उपलब्ध केली. परंतु येथील नागरिकांना रस्ते, पाणी व वीज उपलब्ध करण्याची जबाबदारी नासुप्रची आहे. या संदर्भात महानगरपालिकेने नासुप्रला वेळोवेळी पत्र पाठविले. बैठकाही घेण्यात आल्या. परंतु रस्त्याचा प्रशन सुटला नाही. नासुप्रतील अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे रस्त्याचे काम रखडले आहे. चांगल्या रस्त्यासाठी ६० लाखांची गरज आहे. परंतु महानगरपालिका व नासुप्र यांच्या वादात हे काम रखडले आहे. त्यामुळे नागरिकांना कोणत्याही स्वरूपाच्या मूलभूत सुव्धिा उपलब्ध नाही. पिण्यासाठी बोअरवेलचे पाणीमहानगरपालिकेने एसआरए योजनेतून २६० गाळे उभारलेले आहेत. परंतु येथील नागरिकांना नळाव्दारे पाणीपुरवठा केला जात नाही. अधूनमधून टँकर येतो. त्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी बोअरवेलच्या पाण्याचा वापर करावा. लागतो. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.विजेचा प्रश्न केव्हा सुटणार निवासी संकुल वा गाळे उभारताना रस्ता व पाण्यासोबतच वीज पुरवठा होणे आवश्यक आहे. परंतु येथील नागरिकांना वीज पुरवठा करण्यासाठी डीपी उभारण्यात आलेली नाही. वेळोवेळी मागणी करूनही ही समस्या सुटत नसल्याने नागरिकांना नाईलाजाने वीजचोरी करावी लागते. वीज पुरवठ्यासंदर्भात महानगरपालिकेने स्पॅन्को कंपनीला वेळोवेळी पत्रे दिली. परंतु अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही. शेतकऱ्यांना मोबदला कधी मिळणारनारी भागात एसआरए व इतर प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्त्यांची गरज आहे. यासाठी जमीन अधिग्रहीत करावी लागणार आहे. परंतु उप्पलवाडी येथे ८० फुटांचा रस्ता आरक्षित आहे. या रस्त्याचे खडीकरणही करण्यात आले आहे. परंतु शेतकऱ्यांना अद्याप जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे आधी मोबदला नंतर काम अशी भूमिका येथील शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे मोबदला कधी मिळणार, असा प्रश्न आहे. उप्पलवाडी येथे ५५० गाळ्यांची योजना उप्पलवाडी येथे एसआरए योजनेंतर्गत खासगी सहभागातून ५५० गाळे उभारण्याचा प्रकल्प राबविला जात आहे. परंतु येथे जाण्यासाठी रस्ताही नाही. निवासी गाळ्यांचे बांधकाम करतानाच रस्ते, वीज, पाणी व सिवेज लाईन अशा सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे.रस्त्यांमुळे विकास रखडलाकोणत्याही भागाच्या विकासासाठी चांगल्या रस्त्यांची गरज असते. नारी व उप्पलवाडी परिसर शहरालगतच आहे. या परिसरात शासकीय तसेच खासगी प्रकल्प प्रस्तावित आहेत. परंतु रस्ते नसल्याने या भागाचा विकास रखडला आहे. कमी किमतीत घरासाठी उत्तम जागा कामठी मार्गालगतच्या भागात कमी किमतीत घरकुलाची योजना शक्य आहे. शहराच्या हद्दीत हा परिसर येतो. तसेच या भागात जागाही उपलब्ध आहे. मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्यास कमी किमतीत घरे शक्य आहे. नासुप्रसाठी ही जागा चांगला पर्याय होऊ शकते. या परिसरालगतच शैक्षणिक संस्था, बाजारपेठ, औद्योगिक वसाहती आहेत. या भागाचा विकास आराखडा तयार करून रस्ते, पाण्याची लाईन, सिवेज लाईनच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. परंतु यासाठी आवश्यक असलेली जमीन अधिग्रहित करण्यात आली नाही.