शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

झोपडीतून फ्लॅटमध्ये, पण रस्ताच नाही!

By admin | Updated: September 15, 2016 02:38 IST

उपराजधानीला ‘झोपडपट्टीमुक्त शहर’ करण्याच्या हेतूने केंद्र सरकारच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

व्यथा कायम : एसआरएच्या योजनेत पाणी व वीज नाहीनागपूर : उपराजधानीला ‘झोपडपट्टीमुक्त शहर’ करण्याच्या हेतूने केंद्र सरकारच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) योजनेंतर्गत महानगरपालिका शहरातील झोपडपट्टीधारकांना मोफत गाळे (फ्लॅट) देण्याची योजना राबवित आहे. यातूनच नारी येथील सम्राट अशोक नगर येथे १६० गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु येथे रस्ता, पाणी, वीज, सिवेज लाईन अशा स्वरूपाच्या मूलभूत सुविधा नाही. त्यामुळे गाळ्यापेक्षा झोपडपट्टी चांगली होती. असे म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. येथून अवघ्या ५०० मीटर अंतरावर नागरी सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागाच्या विकासाचे स्वप्न दाखविणारे नागपूर सुधार प्रन्यास महानगर नियोजन क्षेत्राचा विकास कसा करणार असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.१६० गाळ्यांची योजना झिरो माईलपासून ७.८५ किलोमीटर तर आॅटोमोटिव्ह चौकापासून अवघ्या १.६ किलोमीटर अंतरावर आहे. असे असतानाही कामठी मार्गालतचा हा परिसर विकासापासून दूर आहे. याला नागपूर सुधार प्रन्यास जबाबदार आहे. २००१ च्या शहर विकास आराखड्यात कामठी मार्गावरील स्टार मोटर्स जवळचा ८० फुटांचा डीपीरोड मंजूर आहेत. परंतु १५ वर्षानंतरही येथील रस्त्याचे काम करण्यात आलेले नाही. काही वर्षापूर्वी खडीकरण करण्यात आले होते. परंतु आता हा रस्ता वाहतुकीयोग्य राहिलेला नाही. चांगला रस्ता नसल्याने या भागातील विकास थांबला आहे. १६० गाळ्यांच्या बाजूलाच पुन्हा १०० गाळ्यांचे बांधकाम सुरू आहे. या गाळेधारकांनाही अशाच समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. गाळ्यांचे बांधकाम करताना रस्त्यांचा विचारच करण्यात आलेला नाही. आजूबाजूच्या मोकळ्या प्लाटमधून येथील नागरिक ये-जा करतात. परंतु प्लॉटधारकांनी जागेला संरक्षण भिंत उभारल्यानंतर गाळेधारकांना रस्ताच राहणार नाही. सर्वत्र असते अंधाराचे साम्राज्यनागपूर : चांगला रस्ता नसल्याने विजेचे खांब उभारण्यात आलेले नाही. त्यामुळे या परिसरातून जाणाऱ्या वीज वाहिनीवरून येथील गाळेधारकांनी अवैध वीज जोडणी केली आहे. पाणीपुरवठा व सिवेज लाईन येथील नागरिकांच्या नशिबीच नसल्याचे चित्र आहे. या परिसरात पथदिवे नसल्याने रात्रीच्या सुमारास सर्वत्र अंधाराचे साम्राज्य असते. पावसाळ्याच्या दिवसात या भागातील परिस्थिती दुर्गम भागासारखीच असते. यालाच झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन म्हणणार का, असा प्रश्न झोपडपट्टीधारकांना पडला आहे. (प्रतिनिधी)मनपा-नासुप्र यांच्यात वादनारी येथील एसआरए योजनेसाठी महानगरपालिके ने जागा उपलब्ध केली. परंतु येथील नागरिकांना रस्ते, पाणी व वीज उपलब्ध करण्याची जबाबदारी नासुप्रची आहे. या संदर्भात महानगरपालिकेने नासुप्रला वेळोवेळी पत्र पाठविले. बैठकाही घेण्यात आल्या. परंतु रस्त्याचा प्रशन सुटला नाही. नासुप्रतील अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे रस्त्याचे काम रखडले आहे. चांगल्या रस्त्यासाठी ६० लाखांची गरज आहे. परंतु महानगरपालिका व नासुप्र यांच्या वादात हे काम रखडले आहे. त्यामुळे नागरिकांना कोणत्याही स्वरूपाच्या मूलभूत सुव्धिा उपलब्ध नाही. पिण्यासाठी बोअरवेलचे पाणीमहानगरपालिकेने एसआरए योजनेतून २६० गाळे उभारलेले आहेत. परंतु येथील नागरिकांना नळाव्दारे पाणीपुरवठा केला जात नाही. अधूनमधून टँकर येतो. त्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी बोअरवेलच्या पाण्याचा वापर करावा. लागतो. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.विजेचा प्रश्न केव्हा सुटणार निवासी संकुल वा गाळे उभारताना रस्ता व पाण्यासोबतच वीज पुरवठा होणे आवश्यक आहे. परंतु येथील नागरिकांना वीज पुरवठा करण्यासाठी डीपी उभारण्यात आलेली नाही. वेळोवेळी मागणी करूनही ही समस्या सुटत नसल्याने नागरिकांना नाईलाजाने वीजचोरी करावी लागते. वीज पुरवठ्यासंदर्भात महानगरपालिकेने स्पॅन्को कंपनीला वेळोवेळी पत्रे दिली. परंतु अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही. शेतकऱ्यांना मोबदला कधी मिळणारनारी भागात एसआरए व इतर प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्त्यांची गरज आहे. यासाठी जमीन अधिग्रहीत करावी लागणार आहे. परंतु उप्पलवाडी येथे ८० फुटांचा रस्ता आरक्षित आहे. या रस्त्याचे खडीकरणही करण्यात आले आहे. परंतु शेतकऱ्यांना अद्याप जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे आधी मोबदला नंतर काम अशी भूमिका येथील शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे मोबदला कधी मिळणार, असा प्रश्न आहे. उप्पलवाडी येथे ५५० गाळ्यांची योजना उप्पलवाडी येथे एसआरए योजनेंतर्गत खासगी सहभागातून ५५० गाळे उभारण्याचा प्रकल्प राबविला जात आहे. परंतु येथे जाण्यासाठी रस्ताही नाही. निवासी गाळ्यांचे बांधकाम करतानाच रस्ते, वीज, पाणी व सिवेज लाईन अशा सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे.रस्त्यांमुळे विकास रखडलाकोणत्याही भागाच्या विकासासाठी चांगल्या रस्त्यांची गरज असते. नारी व उप्पलवाडी परिसर शहरालगतच आहे. या परिसरात शासकीय तसेच खासगी प्रकल्प प्रस्तावित आहेत. परंतु रस्ते नसल्याने या भागाचा विकास रखडला आहे. कमी किमतीत घरासाठी उत्तम जागा कामठी मार्गालगतच्या भागात कमी किमतीत घरकुलाची योजना शक्य आहे. शहराच्या हद्दीत हा परिसर येतो. तसेच या भागात जागाही उपलब्ध आहे. मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्यास कमी किमतीत घरे शक्य आहे. नासुप्रसाठी ही जागा चांगला पर्याय होऊ शकते. या परिसरालगतच शैक्षणिक संस्था, बाजारपेठ, औद्योगिक वसाहती आहेत. या भागाचा विकास आराखडा तयार करून रस्ते, पाण्याची लाईन, सिवेज लाईनच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. परंतु यासाठी आवश्यक असलेली जमीन अधिग्रहित करण्यात आली नाही.