शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
3
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
4
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
5
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
6
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
7
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
8
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
9
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
10
चांदीसाठी किलोला ‘जीएसटी’सह मोजा दोन लाख रुपये ! दोन हजारांच्या वाढीसह पोहोचली १,९४,००० रुपयांवर
11
इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
12
भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
13
विमा क्षेत्रात १०० टक्के ‘एफडीआय’ला मंजुरी; आतापर्यंत एफडीआयमार्फत ८२,००० कोटींची परकीय गुंतवणूक
14
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
15
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
16
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
17
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
18
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
19
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
20
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
Daily Top 2Weekly Top 5

भुकेचा अंत भिकेने नाही तर जाणिवेने होतो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सध्या एक पोस्ट खूप व्हायरल होत आहे. प्रसिद्ध उद्योजक आशुतोष शेवाळकर यांची ती पोस्ट ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सध्या एक पोस्ट खूप व्हायरल होत आहे. प्रसिद्ध उद्योजक आशुतोष शेवाळकर यांची ती पोस्ट अतिशय भावुक तर आहेच; सोबत जाणिवा जागृत करण्यासाठी चिंतनाची जोड त्यात आहे. म्हणायला हा मराठी-हिंदी चित्रपटातील एक प्रसंग वाटावा. कोरोनाकाळात असे अनेक सीन्स देशभरातला माणूस याची देही याची डोळा पाहतो आहे आणि विदारक परिस्थितीचे दर्शन घेत आहे. भुकेचा अंत भिकेने नाही तर भुकेने आखडणाऱ्या पोटातील वेदनेच्या जाणिवेने होतो. शासनाने त्या जाणीव मजबूत करणे अपेक्षित आहे आणि कदाचित हाच हेतू या पोस्टचा आहे.

४५ वर्षे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा रिक्षावाला, आज अचानक हाताची ओंजळी पुढे का करतो? अनेक स्वाभिमानी मजूर, कष्टकऱ्यांची व दररोज हातावर पोट असणाऱ्यांची हीच स्थिती आहे. गेल्या महिन्याभरापासून रस्त्यावर कोणी भटकंतीसाठी उतरला नाही आणि त्यामुळे, रिक्षात बसणार कोण? रिक्षात बसणार नाही; तर पैसा मिळणार कसा आणि पैसा नसेल तर घरातील चूल पेटणार कशी आणि चूल पेटणार नाही तर मग जगायचे कसे? असे प्रश्न यातून निर्माण झाले.

दीक्षाभूमीसमोरील चित्रकला महाविद्यालयापुढे एक रिक्षावाला हाताची ओंजळ पुढे करून अनवानी उभा होता. किंतु-परंतुचा विचार करीत असतानाच शेवाळकर रिक्षावाल्याकडे गेले आणि त्याच्यापुढे एक नोट, दोन नोट काढते झाले. तिसरीही काढायची तर मदतीसाठी घरी बोलावून घेण्याचा निर्णय झाला. एक कारवाला श्रीमंत माणूस हा पुढाकार घेतो तर सोबतीला इतर कारवालेही थांबायला लागले. दुसऱ्या एकाने चप्पल देतो, दुकानात येऊन जा, असे म्हटले तेव्हा स्वत:च्या पायातील जोडा देण्याची तयारी झाली. मात्र, पाय पोळले असल्याने घालता येणार नाही, हे रिक्षावाल्याने स्पष्ट केले. विशेष म्हणजे, तो रिक्षावाला भुकेच्या माराने व कुटुंबाच्या जबाबदारीने आणि इतर सर्व कारवाले कोरोनाच्या माराने पिळलेले होते. कुणाचा धंदा बसला, कुणाचे आप्त हॉस्पिटलमध्ये तर कुणी बिल भरण्यासाठी प्रयत्नरत अशा आशयातले. असा हा सारा गहिवरून टाकणारा पट डोळ्यांत अंजन घालणारा आणि सणकन चपराक मारणारा आहे. हीच स्थिती शहरातील, राज्यातील आणि देशातील अनेकांची आहे आणि अशा वेळी शासकीय मदत केवळ घोषणेपुरतीच का ठरावी? मदतीच्या अपेक्षेत असलेले आपला सारा स्वाभिमान हरवून बसतील तेव्हा ती मदत भिकेला लागलेल्या भिकाऱ्यासाठी असेल, भारताच्या नागरिकासाठी नाही, हीच भावना यातून स्पष्ट होते.