शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
3
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
4
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
5
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
7
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
8
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
9
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
10
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
11
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
12
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
13
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
15
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
17
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
18
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
19
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
20
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?

भुकेचा अंत भिकेने नाही तर जाणिवेने होतो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सध्या एक पोस्ट खूप व्हायरल होत आहे. प्रसिद्ध उद्योजक आशुतोष शेवाळकर यांची ती पोस्ट ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सध्या एक पोस्ट खूप व्हायरल होत आहे. प्रसिद्ध उद्योजक आशुतोष शेवाळकर यांची ती पोस्ट अतिशय भावुक तर आहेच; सोबत जाणिवा जागृत करण्यासाठी चिंतनाची जोड त्यात आहे. म्हणायला हा मराठी-हिंदी चित्रपटातील एक प्रसंग वाटावा. कोरोनाकाळात असे अनेक सीन्स देशभरातला माणूस याची देही याची डोळा पाहतो आहे आणि विदारक परिस्थितीचे दर्शन घेत आहे. भुकेचा अंत भिकेने नाही तर भुकेने आखडणाऱ्या पोटातील वेदनेच्या जाणिवेने होतो. शासनाने त्या जाणीव मजबूत करणे अपेक्षित आहे आणि कदाचित हाच हेतू या पोस्टचा आहे.

४५ वर्षे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा रिक्षावाला, आज अचानक हाताची ओंजळी पुढे का करतो? अनेक स्वाभिमानी मजूर, कष्टकऱ्यांची व दररोज हातावर पोट असणाऱ्यांची हीच स्थिती आहे. गेल्या महिन्याभरापासून रस्त्यावर कोणी भटकंतीसाठी उतरला नाही आणि त्यामुळे, रिक्षात बसणार कोण? रिक्षात बसणार नाही; तर पैसा मिळणार कसा आणि पैसा नसेल तर घरातील चूल पेटणार कशी आणि चूल पेटणार नाही तर मग जगायचे कसे? असे प्रश्न यातून निर्माण झाले.

दीक्षाभूमीसमोरील चित्रकला महाविद्यालयापुढे एक रिक्षावाला हाताची ओंजळ पुढे करून अनवानी उभा होता. किंतु-परंतुचा विचार करीत असतानाच शेवाळकर रिक्षावाल्याकडे गेले आणि त्याच्यापुढे एक नोट, दोन नोट काढते झाले. तिसरीही काढायची तर मदतीसाठी घरी बोलावून घेण्याचा निर्णय झाला. एक कारवाला श्रीमंत माणूस हा पुढाकार घेतो तर सोबतीला इतर कारवालेही थांबायला लागले. दुसऱ्या एकाने चप्पल देतो, दुकानात येऊन जा, असे म्हटले तेव्हा स्वत:च्या पायातील जोडा देण्याची तयारी झाली. मात्र, पाय पोळले असल्याने घालता येणार नाही, हे रिक्षावाल्याने स्पष्ट केले. विशेष म्हणजे, तो रिक्षावाला भुकेच्या माराने व कुटुंबाच्या जबाबदारीने आणि इतर सर्व कारवाले कोरोनाच्या माराने पिळलेले होते. कुणाचा धंदा बसला, कुणाचे आप्त हॉस्पिटलमध्ये तर कुणी बिल भरण्यासाठी प्रयत्नरत अशा आशयातले. असा हा सारा गहिवरून टाकणारा पट डोळ्यांत अंजन घालणारा आणि सणकन चपराक मारणारा आहे. हीच स्थिती शहरातील, राज्यातील आणि देशातील अनेकांची आहे आणि अशा वेळी शासकीय मदत केवळ घोषणेपुरतीच का ठरावी? मदतीच्या अपेक्षेत असलेले आपला सारा स्वाभिमान हरवून बसतील तेव्हा ती मदत भिकेला लागलेल्या भिकाऱ्यासाठी असेल, भारताच्या नागरिकासाठी नाही, हीच भावना यातून स्पष्ट होते.