शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

नागपूर जिल्ह्यातल्या उमरेडमध्ये दारूबंदीसाठी शेकडो महिला एकवटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 11:19 IST

शहरात राजरोसपणे सुरू असलेले अवैध दारूचे धंदे बंद झाले पाहिजे, या मागणीसाठी उमरेड उपविभागीय कार्यालयात सोमवारी शेकडो महिला धडकल्या.

ठळक मुद्देतहसील कार्यालयावर धडक मोर्चाउपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात राजरोसपणे सुरू असलेले अवैध दारूचे धंदे बंद झाले पाहिजे, या मागणीसाठी उमरेड उपविभागीय कार्यालयात सोमवारी शेकडो महिला धडकल्या. पार्बता मांढरे यांच्या नेतृत्वात शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात आलेल्या या मोर्चात महिलांनी दारूबंदी झालीच पाहिजे, अशी जोरदार नारेबाजी केली. उपविभागीय अधिकारी जनार्दन लोंढे यांच्याकडे निवेदन सोपविण्यात आले.शहरात अनेक ठिकाणी अवैध दारूचे धंदे सुरू आहेत. यामुळे असंख्य कुटुंब उद्ध्वस्त होत असून परिसरातील सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेलाही याची झळ सोसावी लागत असल्याची कैफियत यावेळी महिलांनी मांडली. असंख्य बीपीएलधारकांचे धान्य बंद झाले आहे. दुसरीकडे अनेक जण नियमावलीत येत नसूनही बीपीएलच्या यादीत ‘लाभार्थी’ ठरले आहेत. अशीही बाब यावेळी महिलांनी मांडली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जयस्वाल, पोलीस निरीक्षक प्रकाश हाके यांनाही याबाबतचे निवेदन देण्यात आले. सदर निवेदनावर बेबी मराठे, शोभा मराठे, कल्पना मांढरे, रेखा मराठे, दुर्गा मांढरे, वैशाली दलाल, कविता मराठे, देवीदास मराठे, उषा शेगावकर, सुनीता नान्हे, सुमित्रा वाघ, उषा मांढळकर, मनीषा सोनारघरे, कमला मेहरे, अशोक शेगावकर आदींसह अनेक महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आंदोलनादरम्यान नगरसेविका पुष्पा कारगावकर, प्रहार जनशक्ती पक्षाचे संदीप कांबळे यांची उपस्थिती होती. यासंदर्भात तातडीने पाऊल उचलण्यात आले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा पार्बता मांढरे यांनी दिला आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी