शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

‘चला बोलू या’ म्हणत शेकडो जोडप्यांनी सावरला संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2023 20:07 IST

Nagpur News कौटुंबिक वाद संवादातून मिटविण्यासाठी राज्यात ‘लेट्स टॉक’ म्हणजे ‘चला बोलू या’ योजना लागू करण्यात आली आहे. ही योजना जिल्हा विधि सेवा प्राधिकरणमार्फत अमलात आणली जात आहे.

 

नागपूर : कौटुंबिक वाद संवादातून मिटविण्यासाठी राज्यात ‘लेट्स टॉक’ म्हणजे ‘चला बोलू या’ योजना लागू करण्यात आली आहे. ही योजना जिल्हा विधि सेवा प्राधिकरणमार्फत अमलात आणली जात आहे. या योजनेंतर्गत राज्यातील विविध कुटुंब न्यायालयांमध्ये ‘चला बोलू या’ केंद्र स्थापित करण्यात आले आहे. नागपूर कुटुंब न्यायालयातील केंद्रामध्ये आतापर्यंत वाद असलेल्या शेकडो दाम्पत्यांनी ‘चला बोलू या’ म्हणत तुटलेली मने पुन्हा जोडली आणि संसाराची नवीन इनिंग सुरू केली.

काय आहे ‘चला बोलू या’ योजना?

नवरा-बायकोमध्ये बिनसले तर त्यांनी वैवाहिक अधिकारांसाठी थेट न्यायालयात दाद मागण्याआधी एकमेकांसोबत संवाद साधावा आणि तडजोड करून वाद मिटवावा, हा ‘चला बोलू या’ योजनेमागील उद्देश आहे. आपसात बोलून वाद मिटविणे शक्य असलेली प्रकरणे कुटुंब न्यायालय प्रशासनाद्वारे ‘चला बोलू या’ केंद्राकडे पाठविली जातात. त्या ठिकाणी तज्ज्ञ समुपदेशकांच्या उपस्थितीत वाद असलेल्या दाम्पत्यांमध्ये चर्चा घडवून आणली जाते व त्यांच्यामधील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला जाताे.

यावर्षी तीन जोडप्यांचे मनोमिलन

यावर्षी जानेवारी ते मार्चपर्यंत २८ प्रकरणे ‘चला बोलू या’ केंद्राकडे तडजोडीसाठी पाठविण्यात आली होती. त्यापैकी तीन जोडप्यांचे मनोमिलन घडवून आणण्यात केंद्राला यश मिळाले. २२ जोडप्यांमध्ये विविध कारणांमुळे तडजोड होऊ शकली नाही. तीन प्रकरणे प्रलंबित आहेत.

कौटुंबिक वाद मिटवायचे असतील तर...

वर्तमान काळात तडजोड करण्याची वृत्ती संपत चालली आहे. परिणामी, क्षुल्लक वादही घटस्फोटापर्यंत पोहोचतो. संसारात सलोखा महत्वाचा आहे. त्यामुळे कौटुंबिक वाद मिटवायचे असतील तर, ‘चला बोलू या’सारख्या केंद्रांचा उपयोग केला गेला पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

तक्रारी काय येतात?

पती सतत चारित्र्यावर संशय घेतो, शारीरिक-मानसिक छळ करतो, पती हुंड्यासाठी मारहाण करतो, पतीला मोबाईलवर बोलणे व मोबाईल पाहणे आवडत नाही, पती दारू पिऊन शिवीगाळ करतो, आदी पत्नीच्या तक्रारी असतात, तर पत्नी कौटुंबिक जबाबदाऱ्यांना न्याय देत नाही, सासू-सासऱ्याची सेवा करीत नाही, पत्नी सतत मोबाइल पाहत राहते, घरातील कामे करीत नाही, क्षुल्लक कारणांवरून भांडण करते, सतत माहेरी जाते, दुसऱ्या महिलेसोबत बोलल्यास संशय घेते, आदी पतीच्या तक्रारी असतात.

कुटुंब न्यायालयात याचिका दाखल करण्यापूर्वी वाद असलेल्या दाम्पत्यांमध्ये तडजोड घडवून आणण्यासाठी 'चला बोलू या' केंद्र स्थापित करण्यात आले आहे. कौटुंबिक भांडणामुळे विभक्त होण्याच्या उंबरठ्यावर आलेले किंवा विभक्त झालेले पती-पत्नी यांनी या समुपदेशन केंद्राचा लाभ घ्यावा.

--- न्या. जयदीप पांडे, सचिव, जिल्हा विधि सेवा प्राधिकरण.

टॅग्स :marriageलग्न