शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

‘चला बोलू या’ म्हणत शेकडो जोडप्यांनी सावरला संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2023 20:07 IST

Nagpur News कौटुंबिक वाद संवादातून मिटविण्यासाठी राज्यात ‘लेट्स टॉक’ म्हणजे ‘चला बोलू या’ योजना लागू करण्यात आली आहे. ही योजना जिल्हा विधि सेवा प्राधिकरणमार्फत अमलात आणली जात आहे.

 

नागपूर : कौटुंबिक वाद संवादातून मिटविण्यासाठी राज्यात ‘लेट्स टॉक’ म्हणजे ‘चला बोलू या’ योजना लागू करण्यात आली आहे. ही योजना जिल्हा विधि सेवा प्राधिकरणमार्फत अमलात आणली जात आहे. या योजनेंतर्गत राज्यातील विविध कुटुंब न्यायालयांमध्ये ‘चला बोलू या’ केंद्र स्थापित करण्यात आले आहे. नागपूर कुटुंब न्यायालयातील केंद्रामध्ये आतापर्यंत वाद असलेल्या शेकडो दाम्पत्यांनी ‘चला बोलू या’ म्हणत तुटलेली मने पुन्हा जोडली आणि संसाराची नवीन इनिंग सुरू केली.

काय आहे ‘चला बोलू या’ योजना?

नवरा-बायकोमध्ये बिनसले तर त्यांनी वैवाहिक अधिकारांसाठी थेट न्यायालयात दाद मागण्याआधी एकमेकांसोबत संवाद साधावा आणि तडजोड करून वाद मिटवावा, हा ‘चला बोलू या’ योजनेमागील उद्देश आहे. आपसात बोलून वाद मिटविणे शक्य असलेली प्रकरणे कुटुंब न्यायालय प्रशासनाद्वारे ‘चला बोलू या’ केंद्राकडे पाठविली जातात. त्या ठिकाणी तज्ज्ञ समुपदेशकांच्या उपस्थितीत वाद असलेल्या दाम्पत्यांमध्ये चर्चा घडवून आणली जाते व त्यांच्यामधील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला जाताे.

यावर्षी तीन जोडप्यांचे मनोमिलन

यावर्षी जानेवारी ते मार्चपर्यंत २८ प्रकरणे ‘चला बोलू या’ केंद्राकडे तडजोडीसाठी पाठविण्यात आली होती. त्यापैकी तीन जोडप्यांचे मनोमिलन घडवून आणण्यात केंद्राला यश मिळाले. २२ जोडप्यांमध्ये विविध कारणांमुळे तडजोड होऊ शकली नाही. तीन प्रकरणे प्रलंबित आहेत.

कौटुंबिक वाद मिटवायचे असतील तर...

वर्तमान काळात तडजोड करण्याची वृत्ती संपत चालली आहे. परिणामी, क्षुल्लक वादही घटस्फोटापर्यंत पोहोचतो. संसारात सलोखा महत्वाचा आहे. त्यामुळे कौटुंबिक वाद मिटवायचे असतील तर, ‘चला बोलू या’सारख्या केंद्रांचा उपयोग केला गेला पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

तक्रारी काय येतात?

पती सतत चारित्र्यावर संशय घेतो, शारीरिक-मानसिक छळ करतो, पती हुंड्यासाठी मारहाण करतो, पतीला मोबाईलवर बोलणे व मोबाईल पाहणे आवडत नाही, पती दारू पिऊन शिवीगाळ करतो, आदी पत्नीच्या तक्रारी असतात, तर पत्नी कौटुंबिक जबाबदाऱ्यांना न्याय देत नाही, सासू-सासऱ्याची सेवा करीत नाही, पत्नी सतत मोबाइल पाहत राहते, घरातील कामे करीत नाही, क्षुल्लक कारणांवरून भांडण करते, सतत माहेरी जाते, दुसऱ्या महिलेसोबत बोलल्यास संशय घेते, आदी पतीच्या तक्रारी असतात.

कुटुंब न्यायालयात याचिका दाखल करण्यापूर्वी वाद असलेल्या दाम्पत्यांमध्ये तडजोड घडवून आणण्यासाठी 'चला बोलू या' केंद्र स्थापित करण्यात आले आहे. कौटुंबिक भांडणामुळे विभक्त होण्याच्या उंबरठ्यावर आलेले किंवा विभक्त झालेले पती-पत्नी यांनी या समुपदेशन केंद्राचा लाभ घ्यावा.

--- न्या. जयदीप पांडे, सचिव, जिल्हा विधि सेवा प्राधिकरण.

टॅग्स :marriageलग्न