शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

शेकडाे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जेलभराे आंदाेलन

By निशांत वानखेडे | Updated: January 23, 2024 18:31 IST

सन १९७५ पासून एकात्मिक बालविकास याेजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून अंगणवाडी कर्मचारी अत्यल्प मानधनावर सेवा देत आहे.

नागपूर : राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या कामबंद आंदाेलनाला ५० दिवसांचा काळ लाेटला आहे. मात्र सरकारकडून कुठलीही दखल हाेत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंताेष पसरला आहे. मंगळवारी नागपुरात शेकडाे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी व्हेरायटी चाैकात रास्ता राेकाे आंदाेलन करीत स्वत:ला अटक करवून घेतली. मात्र या आंदाेलनामुळे चाैकातील वाहतुकीचा गाेंधळ उडाला हाेता.

सन १९७५ पासून एकात्मिक बालविकास याेजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून अंगणवाडी कर्मचारी अत्यल्प मानधनावर सेवा देत आहे. वेळाेवेळी त्यांच्या मानधनात वाढ झाली पण ती महागाईच्या प्रमाणात तुटपुंजी हाेती. २०२३ मध्येही १५०० रुपयांची वाढ करण्यात आली पण अत्यल्प आहे. तेव्हापासून हजाराे कर्मचारी निवृत्त झाल्या पण निवृत्तीनंतर त्यांना कुठलाही लाभ मिळाला नाही. शिवाय कुपाेषण नियंत्रण, लसीकरण अशा विविध उपक्रमांमध्ये त्यांची सेवा घेतली जाते पण लाभ मिळत नाही. २०१४ मध्ये सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ देण्याचा शासन निर्णय झाला पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. २००५ मध्ये पेन्शनबाबतचा पहिला शासन निर्णय सन झाला, पण २०२४ येऊनही त्याची अंमलबजावणी झाली नाही.

ग्रॅज्युईटी बाबत सुप्रिम कोर्टाचा आदेश होवून आता दोन वर्षे होतील, पण त्यावरही पाऊल उचलले गेले नाही. कर्मचाऱ्यांचे टीए बिल, नवीन माेबाईल व काेराेना काळातील सुट्यांचा प्रश्न अद्याप कायम आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेत पगारवाढ करून शासकीय याेजनांचा लाभ द्यावा, अशा मागण्या आंदाेलनाद्वारे केल्या जात आहेत. निर्णय हाेईपर्यंत संप व आंदाेलन मागे न घेण्याची घाेषणा आयटकने केली आहे. सरकारने केवळ संघटनांचा, युनियन्सचा द्वेष न बाळगता या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे गंभीरपणे लक्ष द्यावे, अशी मागणी आयटकचे काॅ. श्याम काळे यांनी केली आहे.आंदाेलनात आयटकच्या सचिव ज्योती अंडरसहारे, सरचिटणीस वनिता कापसे तसेच रेखा कोहाड, शालिनी मुरारकर, उषा चारभे, मंगला रंगारी, दिर्घणा कावळे, विशाखा पाटील, आशा पाटील, सीमा गजभिये, शीला लोखंडे, सुरेखा पवार, शैला काकडे, शीला पाटील, उषा सायरे, सुनीता मानकर, कुमुद नवकरीया, प्रमिला चौधरी आदींचा सहभाग हाेता.

टॅग्स :nagpurनागपूर