शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
5
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
6
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
7
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
8
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
9
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
10
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
11
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
12
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
13
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
14
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
15
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
16
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
17
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
18
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
19
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
20
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी

नागपूर विद्यापीठातील शेकडो विद्यार्थ्यांच्या रोजगाराची संधी हिरावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 10:00 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ‘एमएसडब्लू’च्या शेकडो विद्यार्थ्यांना शासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसला आहे. अभ्यासक्रम बदलूनदेखील विद्यापीठाने शासनाची मान्यता न घेतल्याचे कारण देत विद्यार्थ्यांचे अर्ज शासनाने नाकारले आहेत.

ठळक मुद्देविद्यापीठात विद्यार्थ्यांची पायपीट‘एमएसडब्ल्यू’च्या नव्या अभ्यासक्रमाला शासनाची मान्यताच नाही

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ‘एमएसडब्लू’च्या शेकडो विद्यार्थ्यांना शासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसला आहे. अभ्यासक्रम बदलूनदेखील विद्यापीठाने शासनाची मान्यता न घेतल्याचे कारण देत विद्यार्थ्यांचे अर्ज शासनाने नाकारले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची रोजगाराची संधीच हिरावल्या गेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने पत्रव्यवहार करत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पदरी विद्यापीठ व शासन दोन्ही पातळ््यांवरून निराशाच पडली आहे.नागपूर विद्यापीठात ‘एमएसडब्लू-एलडब्लूपीएम’ (लेबर वेल्फेअर पर्सनल मॅनेजमेन्ट) हा अभ्यासक्रम राबविण्यात येत होता. काही वर्षांपूर्वी यात बदल करण्यात आला व याचे रूपांतर ‘एमएसडब्लू-एचआरएम’ (ह्युमन रिसोर्स मॅनेजमेन्ट) असे करण्यात आले. कारखाने अधिनियम १९४८ (कर्तव्य, अर्हता व सेवाशर्ती) या नियमानुसार कामगार कल्याण अधिकारी नाव नोंदणी शासनाच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय कार्यालयाकडे होत होती. ‘एमएसडब्लू-एचआरएम’ अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर २०१५ साली विद्यार्थ्यांनी कामगार कल्याण अधिकारी नाव नोंदणी करण्यासाठी शासनाकडे अर्ज पाठविला तेव्हा त्यांना धक्काच बसला. संबंधित अभ्यासक्रमाला शासनाची मान्यता नसल्याचे कारण देत त्यांचे अर्ज नाकारण्यात आले. केवळ ‘एमएसडब्लू-एलडब्लूपीएम’ हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचीच नोंद करण्यात येईल, असे सांगण्यात आले. विद्यापीठाने अभ्यासक्रमात बदल केल्यानंतर शासनाकडे यासंदर्भात पाठपुरावा केला नाही, असे कारणदेखील देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षी विद्यापीठाने सुधारित अभ्यासक्रमाची नोंद शासनाकडे करण्यासंदर्भात शासनाशी पत्रव्यवहार केला होता. मात्र यासंदर्भातील पत्रव्यवहार अपूर्ण होता व त्यानंतर विद्यापीठाने पाठपुरावा करण्याची तसदीदेखील घेतली नाही. अभ्यासक्रमाला मान्यता मिळण्यासाठी विद्यापीठाला नव्याने प्रस्ताव तयार करून तो पुन्हा शासनाकडे पाठवावा लागणार आहे. मात्र त्यासंदर्भातदेखील विद्यापीठाने पुढाकार घेतला नाही, असा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.

उदासीन भूमिकेचा विद्यार्थ्यांना फटकायासंदर्भात विद्यापीठाच्या कुलगुरूंशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र उपकुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांनी विद्यापीठाने सर्व प्रक्रिया राबविल्याचे स्पष्ट केले. आम्ही औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या संचालकांना प्रस्ताव पाठविला होता व त्यानंतर पाठपुरावादेखील केला. मात्र त्यांच्याकडून अद्याप त्यावर काहीही निर्णय घेण्यात आलेला नाही. केवळ नागपूर विद्यापीठच नव्हे तर राज्यात अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना ही अडचण येत आहे. जर नव्याने प्रस्ताव पाठविण्याचे पत्र आम्हाला आले, तर आम्ही निश्चितपणे परत प्रस्ताव पाठवू, असे त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थी म्हणतात, आमचा काय दोष ?दरम्यान, या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप आहे. विद्यापीठ व शासनाकडून आमच्या अडचणीला समजून घेण्यासाठीदेखील वेळ देण्यात आलेला नाही. शासनाच्या संदर्भीय कार्यालयाअंतर्गत महाराष्ट्र कामगार कल्याण अधिकारी म्हणून नाव नोंदणी व्हावी, यासाठी विद्यार्थी ‘एमएसडब्लू-एचआरएम’ हा विशेष अभ्यासक्रम घेतात. आमची कुठलीही चूक नसताना आम्हाला संघर्ष करावा लागत आहे अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ