शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
3
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
4
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
5
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
6
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
7
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
8
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
9
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
10
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
11
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
12
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
13
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
14
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
15
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
16
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
17
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
18
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
19
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
20
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

नागपुरातील  ऋत्विकच्या ‘हिट विकेट’ने सारेच संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 20:57 IST

सायंकाळी आई-वडील गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले आणि परतल्यानंतर त्यांना ऋत्विक गळफास घेतलेला आढळला. वडील म्हणतात, अभ्यासाचा ताण नव्हताच. मग या खेळाडूवृत्तीच्या ऋत्विकने स्वत:ची विकेट स्वत:च का घेतली, या प्रश्नाने त्याच्या कुटुंबीयांसह सर्वांनाच संभ्रमात टाकले आहे.

ठळक मुद्देआत्मघात कशासाठी? : वडील म्हणतात, अभ्यासाचा ताण नव्हताच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऋत्विक बोके. एमएचके संचेती स्कूलचा बारावीचा विद्यार्थी. अभ्यासात हुशार आणि खेळातही. क्रिकेट टीमचा बेस्ट बॉलर. सोमवारी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी दिवसभर ऋत्विक घरीच होता. त्याने मनातले काहीच जाणवूही दिले नाही. सायंकाळी आई-वडील गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले आणि परतल्यानंतर त्यांना ऋत्विक गळफास घेतलेला आढळला. वडील म्हणतात, अभ्यासाचा ताण नव्हताच. मग या खेळाडूवृत्तीच्या ऋत्विकने स्वत:ची विकेट स्वत:च का घेतली, या प्रश्नाने त्याच्या कुटुंबीयांसह सर्वांनाच संभ्रमात टाकले आहे.त्रिमूर्तीनगर एनआयटी गार्डनसमोरील मल्लिका अपार्टमेंटमध्ये बोके कुटुंब राहते. दिलीप बोके हे शिक्षक आहेत. ऋत्विक हा वर्धा रोडवरील एमएचके संचेती स्कूलमध्ये बारावीला शिकत होता. बारावीचे वर्ष असल्याने ऋत्विकने खेळाकडे थोडे दुर्लक्ष करून, अभ्यासात लक्ष केंद्रीत केले होते. इंजिनीअर बनण्याचे त्याचे स्वप्न होते. त्या दृष्टीने त्याचे प्रयत्नही सुरू होते. त्याची दैनंदिनी अतिशय व्यस्त होती. क्लासेस, कॉलेज, अभ्यास, मित्र यातच त्याचा भरपूर वेळ जायचा. एक आठ दिवसांपूर्वी वडिलांनी त्याला अभ्यासाबद्दल विचारले, त्याने व्यवस्थित सुरू असल्याचे सांगितले. घरची मंडळी कधीच त्याला अभ्यासाबद्दल एक शब्दसुद्धा बोलली नाही. मुळात ऋत्विक असे काही बोलण्यास जागाच ठेवत नव्हता. अतिशय मनमिळावू, सर्वांशी बोलणारा, कुटुंबात-मित्रात, कॉलनीमध्ये सर्वांचा चाहता होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीतही आत्महत्येचे कुठलेही ठोस कारण पुढे आले नाही.मुलांशी संवाद वाढवाऋत्विक ज्या वयाचा होता त्या वयात अनेकदा चांगल्या-वाईटातील फरक कळत नाही. विवेकावर भावना भारी पडतात. अशा स्थितीत आपल्या माणसांचा भावनिक आधार फारच गरजेचा असतो. परंतु आजच्या व्यस्त जीवनशैलीत पालकांचा मुलांशी फारसा संवादच होत नाही. परिणामी मुलांच्या मनात काय चाललय कळत नाही. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळायची असेल तर मुलांशी संवाद वाढविणे नितांत गरजेचे आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याStudentविद्यार्थी